शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळाला किसान सन्मान योजनेचा हप्ता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 16:55 IST

अपात्र शेतकऱ्यांकडून रक्कम केली जाणार वसूल : अडीच लाख शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकऱ्यांना प्रतीक्षा असलेला पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता सोमवारी (दि.३) ई-केवायसी केलेल्या दोन लाख २० हजार ५७५ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेद्वारे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांद्वारे सहा हजार रुपयांचा लाभत्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केला जातो. यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया केलेली आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. काही अपात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभघेतल्याचे निदर्शनास आल्याने आता योजनेमध्ये प्रत्येक लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. शिवाय अपात्र शेतकऱ्यांजवळून त्यांनी घेतलेला लाभ परत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. जर चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला व रक्कम शासनजमा न केल्यास ती रक्कम त्यांच्या सात-बारावर बोजा चढविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता याच पात्र शेतकऱ्यांना लवकर मिळणार आहे. १९ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा नमो शेतकरी महासन्मान योजनेप्रती बळावल्या असून शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे. ज्यांनी केवायसी केली आहे, अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी केवायसी करुन घेणे गरजेचे आहे. 

लाभार्थी संख्येत झाली घटयोजनेत ई-केवायसी न केलेल्या हजारो शेतकऱ्यांना १९ व्या हप्त्याचा लाभमिळालेला नाही. प्रशासनाने सूचना दिल्यानंतरही प्रक्रिया करण्यात आलेली नसल्याने लाभ रोखण्यात आला आहे. ई-केवायसी न केल्या आता त्यांना लाभ मिळणार नसून परिणामी योजनेतील लाभार्थी संख्येत घट होणार आहे.

१९ व्या हप्त्याचे झाले सोमवारी वितरणपीएम किसान सन्मान योजनेत ई-केवायसी व आधार लिंक केलेल्या दोन लाख २० हजार ५७५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांचा लाभसोमवारी जमा झालेला आहे. 

अपात्र शेतकऱ्यांकडून रक्कम होणार वसूलयोजनेच्या निकषात अपात्र असताना काही शेतकऱ्यांनी योजनेत नोंदणी करून लाभ घेतला. यापैकी काही शेतकऱ्यांनी रक्कम शासन जमा केली असली तरी अद्याप लाखो रुपयांची रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल व्हायची आहे. त्यामुळे अपात्र शेतकऱ्यांकडून रक्कम वसुल करण्यासाठी महसूल विभागाद्वारे कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाgondiya-acगोंदियाfarmingशेतीFarmerशेतकरी