शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
6
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
7
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
8
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
9
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
10
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
11
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
12
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
13
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
14
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
15
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
16
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
17
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
18
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
19
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
20
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

'हर घर नल से जल'ला निधीच मिळेना; कामांसाठी ४५ कोटी रुपयांच्या निधीची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 19:57 IST

जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनेची १०४५ कामे मंजूर : मात्र निधीअभावी अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र व राज्य शासनाच्या 'हर घर नल से जल' योजनेंतर्गत जिल्ह्यात जि. प. ग्रामीण भागात पाणीपुरवठा विभागांतर्गत नळ योजनेची एकूण १०४५ कामे मंजूर करण्यात आली. या कामांसाठी सुरुवातीला १९५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. या निधीतून काही कामे पूर्ण करण्यात आली; पण गेल्या दोन वर्षांपासून केंद्र व राज्याकडून निधी मिळत नसल्याने नळ योजनेची कामे कासव गतीने सुरू आहेत. परिणामी, 'हर घर नल से जल'चे स्वप्न अधुरेच असल्याचे चित्र आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी केंद्र व राज्य शासनाने 'हर घर नल से जल' योजनेतंर्गत गावागावांत पाणी योजनांना मंजुरी दिली. याच अंतर्गत जिल्ह्यात सुद्धा १०४५ कामे मंजूर करण्यात आली. सुरुवातीला निधी नियमित मिळाल्याने ६०० नळ व पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण झाली; पण गेल्या वर्षीपासून या योजनेला निधीचे ग्रहण लागले आहे. योजनेची कामे पूर्ण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची गरज असताना तुलनेने अल्प निधी दिला जात आहे. मार्च २०२५ पूर्वी केंद्र व राज्य जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला १६ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत; पण केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे सध्या सुमारे ३०० कामे पूर्णपणे ठप्प पडली आहेत तर १२५ कामे निधीच्या अभावामुळे अर्धवट असल्याची माहिती आहे. 

कामे मार्गी लावण्यासाठी ४५ कोटी रुपयांच्या निधीची गरजपाणीपुरवठा व नळ योजनेची कामे पूर्ण करण्यासाठी त्वरित ४५ कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. या निधीच्या मागणीसाठी संबंधित विभागाने शासनाकडे पाठपुरावा केला आहे; पण अद्यापही निधी उपलब्ध न झाल्याने योजनाच संकटात आल्याचे चित्र आहे.

गावकऱ्यांची बोंबाबोंबजिल्ह्यातील अनेक गावांत पाणीपुरवठा व नळ योजनेच्या कामासाठी रस्त्याचे खोदकाम करून ठेवण्यात आले आहे; पण गेल्या दोन वर्षांपासून या कामाची प्रगती अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे गावकऱ्यांना याचा फटका बसत आहे. तर कामे केव्हा पूर्ण करणार, यासाठी गावकऱ्यांची बोंब कायम आहे.

"जि. प. ग्रामीण पुरवठा विभागांतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा व नळ योजनेच्या कामासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. निधी उपलब्ध होताच ही कामे युद्धपातळीवर पूर्ण केली जाईल."- सुमित बेलपत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :gondiya-acगोंदिया