शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अवकाळी पावसाने केला कहर; पिकांची नासाडी, घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 17:02 IST

मंगळवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. काही ठिकाणी अनेक घरांचे कौल व पत्रेदेखील उडून गेले.

ठळक मुद्देजिल्ह्यात बरसला सरासरी ३८.८ मिमी पाऊसग्राम मुंडीपार येथे गारपिटीसह झालेल्या पावसात अनेक घरांचे नुकसान

गोंदिया : जिल्ह्यात थंडीचा जोर कमी होत असतानाच मंगळवारी (दि.२८) अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात ३८.८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली असून, या पावसामुळे पुन्हा थंडीचा जोर वाढला आहे.

दरवर्षी वर्षाची शेवट व नववर्षाची सुरुवात अवकाळी पावसाच्या हजेरीने होत असल्याचे दिसून येते. त्यानुसार, अचानकच मंगळवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

ढगांचा कडकडाट होत बरसलेल्या पावसामुळे आता पावसाळा सुरू झाल्याचा अनुभव येत आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान वाढत असल्याने थंडीचा जोर कमी होताना दिसत होता. मात्र, मंगळवारी सायंकाळी अचानकच पावसाने हजेरी लावली त्यामुळे पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला आहे. बुधवारीही (दि.२९) ढगाळ वातावरण होतेच व थंडीचा जोर दिसून आला. मंगळवारी बरसलेल्या पावसासोबतच सडक-अर्जुनी तालुक्यात काही ठिकाणी गारा पडल्या. यानंतर आता जिल्हावासीयांना स्वेटर घालावे की रेनकोट, असा प्रश्न पडत आहे.

तिरोडा तालुक्यात सर्वाधिक ५४.१ मिमी पाऊस

मंगळवारी जिल्ह्यात सरासरी ३८.८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली असताना सर्वाधिक ५४.१ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. तर सर्वांत कमी २२.८ मिमी पाऊस गोंदिया तालुक्यात बरसल्याचे दिसत आहे. मात्र, अवघ्या जिल्ह्यातच पावसाने हजेरी लावली असून अवघा जिल्हाच पाणीदार झाला आहे.

सुकडी-डाकराम येथे गारपिटीसह झालेल्या पावसामुळे परिसरातील तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गारपीटमुळे अनेक गावकऱ्यांच्या कौलारू घराचे तसेच रब्बी धान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

ग्राम मुंडीपार येथे विजेचा कडकडाट व गारपिटीसह पाऊस झाल्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. सायंकाळी साडेचार वाजेदरम्यान सुसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट झाल्याने अनेक घरांचे कौल आणि पत्रेदेखील उडून गेले. वीजपुरवठादेखील खंडित झाला. गारपीट एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली की सर्व ठिकाणी गारपिटीचा थर जमा झाला होता. या गारपिटीमुळे शेतातील पालेभाज्यांचेदेखील प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. एकीकडे कोरोनामुळे शेतकरी संकटात सापडला असताना आता पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यातल्या अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली.

पिकांना बसला फटका

शेतकऱ्यांनी सध्या हरभरा, गहू, लाखोळी, जवस, मोहरी तसेच भाजीपाला लावला आहे. तर काही शेतकऱ्यांनी आता रब्बीसाठी नर्सरी लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र, मंगळवारच्या या अवकाळी पावसामुळे या सर्वच पिकांना फटका बसला आहे. एकीकडे खरिपातील पिकाची पाऊस व कीडरोगांनी नासाडी केल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यातच आता अवकाळी पावसामुळे या रब्बी पिकांची नासाडी झाल्यास शेतकरी आणखीच अडचणीत येणार, यात शंका नाही.

तालुकानिहाय बरसलेल्या पावसाचा तक्ता

तालुका- पाऊस

गोंदिया- २२.८

आमगाव- ३२.६

तिरोडा- ५४.१

गोरेगाव- ५०.२

सालेकसा-३३.९

देवरी-४२.३

अर्जुनी-मोरगाव-५२.३

सडक-अर्जुनी-२९.१

एकूण - ३८.८

टॅग्स :weatherहवामानRainपाऊसHailstormगारपीटenvironmentपर्यावरणagricultureशेतीFarmerशेतकरी