शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अवकाळी पावसाने केला कहर; पिकांची नासाडी, घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 17:02 IST

मंगळवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. काही ठिकाणी अनेक घरांचे कौल व पत्रेदेखील उडून गेले.

ठळक मुद्देजिल्ह्यात बरसला सरासरी ३८.८ मिमी पाऊसग्राम मुंडीपार येथे गारपिटीसह झालेल्या पावसात अनेक घरांचे नुकसान

गोंदिया : जिल्ह्यात थंडीचा जोर कमी होत असतानाच मंगळवारी (दि.२८) अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात ३८.८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली असून, या पावसामुळे पुन्हा थंडीचा जोर वाढला आहे.

दरवर्षी वर्षाची शेवट व नववर्षाची सुरुवात अवकाळी पावसाच्या हजेरीने होत असल्याचे दिसून येते. त्यानुसार, अचानकच मंगळवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

ढगांचा कडकडाट होत बरसलेल्या पावसामुळे आता पावसाळा सुरू झाल्याचा अनुभव येत आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान वाढत असल्याने थंडीचा जोर कमी होताना दिसत होता. मात्र, मंगळवारी सायंकाळी अचानकच पावसाने हजेरी लावली त्यामुळे पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला आहे. बुधवारीही (दि.२९) ढगाळ वातावरण होतेच व थंडीचा जोर दिसून आला. मंगळवारी बरसलेल्या पावसासोबतच सडक-अर्जुनी तालुक्यात काही ठिकाणी गारा पडल्या. यानंतर आता जिल्हावासीयांना स्वेटर घालावे की रेनकोट, असा प्रश्न पडत आहे.

तिरोडा तालुक्यात सर्वाधिक ५४.१ मिमी पाऊस

मंगळवारी जिल्ह्यात सरासरी ३८.८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली असताना सर्वाधिक ५४.१ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. तर सर्वांत कमी २२.८ मिमी पाऊस गोंदिया तालुक्यात बरसल्याचे दिसत आहे. मात्र, अवघ्या जिल्ह्यातच पावसाने हजेरी लावली असून अवघा जिल्हाच पाणीदार झाला आहे.

सुकडी-डाकराम येथे गारपिटीसह झालेल्या पावसामुळे परिसरातील तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गारपीटमुळे अनेक गावकऱ्यांच्या कौलारू घराचे तसेच रब्बी धान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

ग्राम मुंडीपार येथे विजेचा कडकडाट व गारपिटीसह पाऊस झाल्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. सायंकाळी साडेचार वाजेदरम्यान सुसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट झाल्याने अनेक घरांचे कौल आणि पत्रेदेखील उडून गेले. वीजपुरवठादेखील खंडित झाला. गारपीट एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली की सर्व ठिकाणी गारपिटीचा थर जमा झाला होता. या गारपिटीमुळे शेतातील पालेभाज्यांचेदेखील प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. एकीकडे कोरोनामुळे शेतकरी संकटात सापडला असताना आता पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यातल्या अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली.

पिकांना बसला फटका

शेतकऱ्यांनी सध्या हरभरा, गहू, लाखोळी, जवस, मोहरी तसेच भाजीपाला लावला आहे. तर काही शेतकऱ्यांनी आता रब्बीसाठी नर्सरी लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र, मंगळवारच्या या अवकाळी पावसामुळे या सर्वच पिकांना फटका बसला आहे. एकीकडे खरिपातील पिकाची पाऊस व कीडरोगांनी नासाडी केल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यातच आता अवकाळी पावसामुळे या रब्बी पिकांची नासाडी झाल्यास शेतकरी आणखीच अडचणीत येणार, यात शंका नाही.

तालुकानिहाय बरसलेल्या पावसाचा तक्ता

तालुका- पाऊस

गोंदिया- २२.८

आमगाव- ३२.६

तिरोडा- ५४.१

गोरेगाव- ५०.२

सालेकसा-३३.९

देवरी-४२.३

अर्जुनी-मोरगाव-५२.३

सडक-अर्जुनी-२९.१

एकूण - ३८.८

टॅग्स :weatherहवामानRainपाऊसHailstormगारपीटenvironmentपर्यावरणagricultureशेतीFarmerशेतकरी