शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

जिल्ह्यात अवकाळी पावसाने केला कहर; पिकांची नासाडी, घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 17:02 IST

मंगळवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. काही ठिकाणी अनेक घरांचे कौल व पत्रेदेखील उडून गेले.

ठळक मुद्देजिल्ह्यात बरसला सरासरी ३८.८ मिमी पाऊसग्राम मुंडीपार येथे गारपिटीसह झालेल्या पावसात अनेक घरांचे नुकसान

गोंदिया : जिल्ह्यात थंडीचा जोर कमी होत असतानाच मंगळवारी (दि.२८) अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात ३८.८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली असून, या पावसामुळे पुन्हा थंडीचा जोर वाढला आहे.

दरवर्षी वर्षाची शेवट व नववर्षाची सुरुवात अवकाळी पावसाच्या हजेरीने होत असल्याचे दिसून येते. त्यानुसार, अचानकच मंगळवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

ढगांचा कडकडाट होत बरसलेल्या पावसामुळे आता पावसाळा सुरू झाल्याचा अनुभव येत आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान वाढत असल्याने थंडीचा जोर कमी होताना दिसत होता. मात्र, मंगळवारी सायंकाळी अचानकच पावसाने हजेरी लावली त्यामुळे पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला आहे. बुधवारीही (दि.२९) ढगाळ वातावरण होतेच व थंडीचा जोर दिसून आला. मंगळवारी बरसलेल्या पावसासोबतच सडक-अर्जुनी तालुक्यात काही ठिकाणी गारा पडल्या. यानंतर आता जिल्हावासीयांना स्वेटर घालावे की रेनकोट, असा प्रश्न पडत आहे.

तिरोडा तालुक्यात सर्वाधिक ५४.१ मिमी पाऊस

मंगळवारी जिल्ह्यात सरासरी ३८.८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली असताना सर्वाधिक ५४.१ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. तर सर्वांत कमी २२.८ मिमी पाऊस गोंदिया तालुक्यात बरसल्याचे दिसत आहे. मात्र, अवघ्या जिल्ह्यातच पावसाने हजेरी लावली असून अवघा जिल्हाच पाणीदार झाला आहे.

सुकडी-डाकराम येथे गारपिटीसह झालेल्या पावसामुळे परिसरातील तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गारपीटमुळे अनेक गावकऱ्यांच्या कौलारू घराचे तसेच रब्बी धान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

ग्राम मुंडीपार येथे विजेचा कडकडाट व गारपिटीसह पाऊस झाल्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. सायंकाळी साडेचार वाजेदरम्यान सुसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट झाल्याने अनेक घरांचे कौल आणि पत्रेदेखील उडून गेले. वीजपुरवठादेखील खंडित झाला. गारपीट एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली की सर्व ठिकाणी गारपिटीचा थर जमा झाला होता. या गारपिटीमुळे शेतातील पालेभाज्यांचेदेखील प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. एकीकडे कोरोनामुळे शेतकरी संकटात सापडला असताना आता पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यातल्या अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली.

पिकांना बसला फटका

शेतकऱ्यांनी सध्या हरभरा, गहू, लाखोळी, जवस, मोहरी तसेच भाजीपाला लावला आहे. तर काही शेतकऱ्यांनी आता रब्बीसाठी नर्सरी लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र, मंगळवारच्या या अवकाळी पावसामुळे या सर्वच पिकांना फटका बसला आहे. एकीकडे खरिपातील पिकाची पाऊस व कीडरोगांनी नासाडी केल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यातच आता अवकाळी पावसामुळे या रब्बी पिकांची नासाडी झाल्यास शेतकरी आणखीच अडचणीत येणार, यात शंका नाही.

तालुकानिहाय बरसलेल्या पावसाचा तक्ता

तालुका- पाऊस

गोंदिया- २२.८

आमगाव- ३२.६

तिरोडा- ५४.१

गोरेगाव- ५०.२

सालेकसा-३३.९

देवरी-४२.३

अर्जुनी-मोरगाव-५२.३

सडक-अर्जुनी-२९.१

एकूण - ३८.८

टॅग्स :weatherहवामानRainपाऊसHailstormगारपीटenvironmentपर्यावरणagricultureशेतीFarmerशेतकरी