शहरं
Join us  
Trending Stories
1
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या प्रवाशांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
2
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
3
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
4
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
5
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
6
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
7
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
8
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
9
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
10
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
11
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
12
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
13
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
14
अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी
15
अबोल वेदना, गोंधळलेली मने : पुरुषांच्या मानसिक आरोग्याची वेळीच दखल घ्या! मानसोपचारतज्ज्ञांचे आवाहन
16
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
17
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
18
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
19
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
20
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव

वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:00 IST

सालेकसा तालुक्याच्या मोठा भूभाग घनदाट वनाने आच्छादीत असून येथील जंगलात तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्याची संख्या भरपूर आहे. येथील जंगल इतर राज्यांच्या घनदाट वनक्षेत्राशी जुळलेले असल्यामुळे हिंसक प्राण्यांसह सर्वच प्राण्यांचा वावर बघायला मिळत आहे. या घनदाट जंगलांना लागून गेलेले पक्के रस्ते व त्या रस्त्यावर प्रवासी आणि वाहनांची सतत ये-जा यामुळे वन्यप्राण्यांना मुक्तसंचार करणे कठीण झाले होते.

ठळक मुद्देकॅरिडोरमधून निघू लागले बाहेर : ‘लॉकडाऊन’मुळे झाले मुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी सरकारने ‘लॉकडाऊन’ केला असून याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होताना दिसत आहे. परंतु वन्यप्राण्यांसाठी हा ‘लॉकडाऊन’ पर्वणी ठरत असून माणसाला घरी रहावे लागत असताना वन्यप्राणी बिनधास्त मुक्त संचार करीत आहेत.सालेकसा तालुक्याच्या मोठा भूभाग घनदाट वनाने आच्छादीत असून येथील जंगलात तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्याची संख्या भरपूर आहे. येथील जंगल इतर राज्यांच्या घनदाट वनक्षेत्राशी जुळलेले असल्यामुळे हिंसक प्राण्यांसह सर्वच प्राण्यांचा वावर बघायला मिळत आहे. या घनदाट जंगलांना लागून गेलेले पक्के रस्ते व त्या रस्त्यावर प्रवासी आणि वाहनांची सतत ये-जा यामुळे वन्यप्राण्यांना मुक्तसंचार करणे कठीण झाले होते. परंतु ‘लॉकडाऊन’मुळे एवढा बदल झाला की रस्त्यावर माणूस व वाहनांचे येणे जाणे बंद झाल्याने हे वन्यप्राणी आता स्वच्छंद विहार करताना दिसत आहेत.तालुक्यात सालेकसा ते दरेकसा व पुढे चांदसूरजपर्यत राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे. तसेच दरेकसा, बिजेपार, पिपरिया परिसरात व इतर परिसरात सुध्दा सधन वन परिसर आहे. अशात वन्यप्राणी एका भागातून दुसऱ्या भागात जाताना ठराविक कॅरिडोर मधूनच आपला प्रवास करतात. अशात त्यांच्या कॅरिडोर मार्गावर मानव निर्मित पक्के रस्ते आडवे येतात आणि त्या रस्त्यावर धावणारे वाहन वन्यप्राण्यांना प्रवासात अडचण निर्माण करीत आहेत. याला मानवाद्वारे वन्यप्राण्यांच्या साम्राज्यावर अतिक्रमण म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.राज्य महामार्गावर नवाटोलानंतर हाजराफॉल परिसर दरेकसा आणि चौकीदरम्यान येणारा परिसर व इतर काही ठिकाणी वन्यप्राण्यांचे कॅरिडोर असून या ठिकाणी ते एका भागातून दुसºया भागात जाण्यासाठी रस्ता ओलांडताना अनेकवेळा मानवी आक्रमणाला बळी सुध्दा पडतात. हीच परिस्थिती तालुक्यातील आतील भागातील जंगल परिसरात असून वन्यजीवांची शिकार होते. परंतु ‘लॉकडाऊन’मुळे वन्यप्राणी कदाचित स्वत: खूपच नशीबवान समजत असतील असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.पर्यावरणात मोठा बदल‘लॉकडाऊन’मुळे रस्त्यावरुन लोकांचे व वाहनांचे येण-जाणे बंद झाले.त्यामुळे वाहनांतून निघणारा धूर जो हवेला प्रदूषित करीत होता तो नाहीसा झाल्याने आॅक्सीजनचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे हवेत वाढलेले आॅक्सीजन मानवी जीवनासह वन्यजीव पशू पक्ष्यांसाठी लाभदायी ठरत आहे. नैसर्गिकरित्या विचार केला तर ‘लॉकडाऊन’ करणे सृष्टी वाचविण्यासाठी मोलाचे योगदान करण्यासारखे आहे.

टॅग्स :forestजंगलwildlifeवन्यजीव