शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:00 IST

सालेकसा तालुक्याच्या मोठा भूभाग घनदाट वनाने आच्छादीत असून येथील जंगलात तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्याची संख्या भरपूर आहे. येथील जंगल इतर राज्यांच्या घनदाट वनक्षेत्राशी जुळलेले असल्यामुळे हिंसक प्राण्यांसह सर्वच प्राण्यांचा वावर बघायला मिळत आहे. या घनदाट जंगलांना लागून गेलेले पक्के रस्ते व त्या रस्त्यावर प्रवासी आणि वाहनांची सतत ये-जा यामुळे वन्यप्राण्यांना मुक्तसंचार करणे कठीण झाले होते.

ठळक मुद्देकॅरिडोरमधून निघू लागले बाहेर : ‘लॉकडाऊन’मुळे झाले मुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी सरकारने ‘लॉकडाऊन’ केला असून याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होताना दिसत आहे. परंतु वन्यप्राण्यांसाठी हा ‘लॉकडाऊन’ पर्वणी ठरत असून माणसाला घरी रहावे लागत असताना वन्यप्राणी बिनधास्त मुक्त संचार करीत आहेत.सालेकसा तालुक्याच्या मोठा भूभाग घनदाट वनाने आच्छादीत असून येथील जंगलात तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्याची संख्या भरपूर आहे. येथील जंगल इतर राज्यांच्या घनदाट वनक्षेत्राशी जुळलेले असल्यामुळे हिंसक प्राण्यांसह सर्वच प्राण्यांचा वावर बघायला मिळत आहे. या घनदाट जंगलांना लागून गेलेले पक्के रस्ते व त्या रस्त्यावर प्रवासी आणि वाहनांची सतत ये-जा यामुळे वन्यप्राण्यांना मुक्तसंचार करणे कठीण झाले होते. परंतु ‘लॉकडाऊन’मुळे एवढा बदल झाला की रस्त्यावर माणूस व वाहनांचे येणे जाणे बंद झाल्याने हे वन्यप्राणी आता स्वच्छंद विहार करताना दिसत आहेत.तालुक्यात सालेकसा ते दरेकसा व पुढे चांदसूरजपर्यत राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे. तसेच दरेकसा, बिजेपार, पिपरिया परिसरात व इतर परिसरात सुध्दा सधन वन परिसर आहे. अशात वन्यप्राणी एका भागातून दुसऱ्या भागात जाताना ठराविक कॅरिडोर मधूनच आपला प्रवास करतात. अशात त्यांच्या कॅरिडोर मार्गावर मानव निर्मित पक्के रस्ते आडवे येतात आणि त्या रस्त्यावर धावणारे वाहन वन्यप्राण्यांना प्रवासात अडचण निर्माण करीत आहेत. याला मानवाद्वारे वन्यप्राण्यांच्या साम्राज्यावर अतिक्रमण म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.राज्य महामार्गावर नवाटोलानंतर हाजराफॉल परिसर दरेकसा आणि चौकीदरम्यान येणारा परिसर व इतर काही ठिकाणी वन्यप्राण्यांचे कॅरिडोर असून या ठिकाणी ते एका भागातून दुसºया भागात जाण्यासाठी रस्ता ओलांडताना अनेकवेळा मानवी आक्रमणाला बळी सुध्दा पडतात. हीच परिस्थिती तालुक्यातील आतील भागातील जंगल परिसरात असून वन्यजीवांची शिकार होते. परंतु ‘लॉकडाऊन’मुळे वन्यप्राणी कदाचित स्वत: खूपच नशीबवान समजत असतील असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.पर्यावरणात मोठा बदल‘लॉकडाऊन’मुळे रस्त्यावरुन लोकांचे व वाहनांचे येण-जाणे बंद झाले.त्यामुळे वाहनांतून निघणारा धूर जो हवेला प्रदूषित करीत होता तो नाहीसा झाल्याने आॅक्सीजनचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे हवेत वाढलेले आॅक्सीजन मानवी जीवनासह वन्यजीव पशू पक्ष्यांसाठी लाभदायी ठरत आहे. नैसर्गिकरित्या विचार केला तर ‘लॉकडाऊन’ करणे सृष्टी वाचविण्यासाठी मोलाचे योगदान करण्यासारखे आहे.

टॅग्स :forestजंगलwildlifeवन्यजीव