शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

हंडाभर पाण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात चार कि.मी.ची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 2:52 PM

अख्खं आयुष्य सरले, पण आमच्या डोईवरचा हंडा काय खाली उतरला न्हाय, सरकारला आम्हा अतिदुर्गम भागातील नागरिकांची केव्हा कीव येणार, अन् आमच्या डोईवरचा हंडा केव्हा खाली येणार? हे शब्द आहेत गोरेगाव तालुक्याच्या पूर्व दिशेला वसलेल्या गौरीटोला या अतिदुर्गम गावातील महिलांचे.

ठळक मुद्देशेतातील विहिरींचा आधारपाणी पुरवठा योजनेचा अभाव

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अख्खं आयुष्य सरले, पण आमच्या डोईवरचा हंडा काय खाली उतरला न्हाय, सरकारला आम्हा अतिदुर्गम भागातील नागरिकांची केव्हा कीव येणार, अन् आमच्या डोईवरचा हंडा केव्हा खाली येणार? हे शब्द आहेत गोरेगाव तालुक्याच्या पूर्व दिशेला वसलेल्या गौरीटोला या अतिदुर्गम गावातील महिलांचे. मागील पाच महिन्यापासून या गावातील महिलांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. शेतातील विहिरी आणि बोअरवेलचे पाणी आणून येथील गावकरी आपली तहान भागवित असल्याचे चित्र आहे.गोरेगाव तालुक्यातील गौरीटोला हे गाव. या गावाला जाण्यासाठी दोन वर्षापूर्वी साधे रस्तेही नव्हते. रस्ते झाले असले तरी येथील पाण्याचा प्रश्न अद्यापही कायम आहे.मागील वर्षी जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने आणि परिसरातील तलाव आणि सिंचन प्रकल्पांनी तळ गाठल्याने जानेवारी महिन्यापासून गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सातशे लोकसंख्या असलेल्या या गावात खासगी १२ विहिरी व ५ बोअरवेल आहेत. मात्र विहिरींना जानेवारी महिन्यापासूनच पाणी नाही तर बोअरवेलनी सुध्दा तळ गाठला आहे. आता शेतातील बोअरवेल आणि विहिरीचे पाणी आणून कसाबसा उन्हाळा काढायचे असे धोरण गावकऱ्यांनी अवलंबविले आहे. येथील पाणी टंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी गावातील महिलांना तीन ते चार किमी पायपीट करावी लागत आहे. मागील पाच महिन्यांपासून येथील गावकºयांची पाण्यासाठी पायपीट कायम आहे. तर तापमानात सुध्दा सातत्याने वाढ होत असल्याने हळूहळू शेतातील विहिरींनी सुध्दा तळ गाठण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात पाऊस न झाल्यास ही समस्या पुन्हा गंभीर होण्याची शक्यता आहे. पाणी टंचाईचा विचार करुनच गावकºयांची झोप उडत असल्याचे चित्र आहे. तिल्ली ग्रामपंचायत अधिनस्थ गौरीटोला हे गाव येते.मात्र येथील लोकांना भौतिक सुविधांचाही दुष्काळ आहे. दुष्काळाच्या झळांनी कोरड्या पडणाऱ्या घशाची तहान भागविण्यासाठी प्रशासन कधी जागेल असा प्रश्न गावकरी उपस्थित करीत आहेत.सहा बोअरवेल व एक विहीरगौरीटोला येथे शासनाने ६ बोअरवेल व एक विहीर तयार केली आहे. वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या आवारात असलेल्या या विहिरीला थोडेफार पाणी आहे. पण बोअरवेलची बिकट स्थिती आहे. या बोअरवेलमधून पिण्यायोग्य पाणी येत नाही, अशी गावकऱ्यांची तक्रार आहे.

गावात पाणी पुरवठ्याची साधने अपुरी असल्याने दरवर्षी गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मात्र मागील पंधरा वीस वर्षांत यंदा प्रथमच पाणी टंचाईची बिकट समस्या निर्माण झाली. मागील पाच महिन्यापासून आम्ही शेतातील विहिरीचे पाणी आणून तहान भागवित आहोत.-भिमराज चौरागडे, गावकरी, गौरीेटोला.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई