शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

भटक्या गोपाळ समाजबांधवांना गावकऱ्यांची अन्नधान्याची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 5:00 AM

कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वत्र लॉकडाऊनमुळे भटक्या जमातीच्या‘गोपाळ’ समाज बांधवावर दोन वेळच्या भोजनाची गंभीर समस्या निर्माण झाली. बोदरा-देऊळगाव ग्रामपंचायतने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्या गोपाळ समाजाच्या ५ कुटुंबांना तांदूळ, जीवनावश्यक वस्तू तसेच समाजाशील शिक्षक प्रदीप ढवळे यांच्याकडून रोख मदत करून हातभार लावला.

ठळक मुद्देबोदरा-देऊळगाव ग्रामपंचायतचे दायित्व : भटक्या गोपाळ समाजाच्या मदतीसाठी पुढे या

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : जवळच्या बोदरा-देऊळगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत देऊळगाव येथे भटक्या जमातीमधील ‘गोपाळ’ समाज मागील काही वर्षांपासून ५-६ कुटुंब कायमस्वरूपी वास्तव्याने राहत आहेत. गावोगावी बिºहाड नेऊन अंग मोहनतीचे खेळ दाखवून पोटाची खडगी भरतात. घरातील महिला भगिनी लहान मुलांसह गावा-गावात भिक्षा मागतात यावरच त्यांच्या घरची चूल पेटते. कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वत्र लॉकडाऊनमुळे भटक्या जमातीच्या‘गोपाळ’ समाज बांधवावर दोन वेळच्या भोजनाची गंभीर समस्या निर्माण झाली. बोदरा-देऊळगाव ग्रामपंचायतने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्या गोपाळ समाजाच्या ५ कुटुंबांना तांदूळ, जीवनावश्यक वस्तू तसेच समाजाशील शिक्षक प्रदीप ढवळे यांच्याकडून रोख मदत करून हातभार लावला.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील देऊळगाव-बोदरा येथे भटक्या जमातीचे गोपाळ समाजाचे शंकर राऊत, किशोर राऊत, अशोक राऊत,हिरामन नेवारे, दिलीप नेवारे यांच्या ५ कुटुंबात १९ लोक राहतात. आपल्या कुटुंबाचा गाडा पुढे रेटण्यासाठी ही लोक आपल्या कुटुंबासह बाहेरी राज्यात जावून पोटाची खडगी भरतात. देऊळगावात कायम स्वरूपी वास्तव्याने असणारा गोपाळा समाज आजही गावात सकाळच्यावेळी भीक्षा मागून दारोदार फिरून मिळेल त्या भिक्षेनी भूक भागवितात. गावात मिळाले त्या कामावर पुरूष मंडळी जातात. मात्र महिला भगिनी दारोदार फिरून भिक्षा पात्रात मिळालेल्या अन्नधान्यावरच त्यांच्या घरची चूल पेटते.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानी गोपाळ समाजाला गावात भिक्षा मागण्यासाठी जाणे सुध्दा आता कठीण झाले आहे. अशा स्थितीत त्यांना मदत करण्यासाठी सरपंच शंकर उईके पुढे आले. ग्रामपंचायत, गावातील प्रतिष्ठित दानदात्यांच्या सहभागाने प्रत्येक कुटुंबाला २० किलो तांदूळ जीवनावश्यक वस्तु रोख स्वरुपात मदत दिली.देऊळगावचे स्वस्त धान्य दुकानदार शामराव झोळे, बोदराचे भागवत झोळे या दोघांनी १०० किलो तांदूळ उपलब्ध करून दिले. अन्नधान्यासह जीवनोपयोगी वस्तुंचे वाटप करताना सरपंच शंकर उईके, उपसरपंच गजानन शहारे, ग्रामसेवक व्ही.आर.ढोक, सदस्य सुनील बनकर, दिनेश चौधरी, योगेश्वर झोळे, देवकाबाई खोटेले, अंगला वटी, जयवंता झोळे, रविना जांभुळकर, सुनिता कांबळे, पोलीस पाटील नचिकेत कापगते, शिक्षक प्रदीप ढवळे, पवन जांभुळकर, वैशाली राऊत, भुमिता शहारे उपस्थित होते.गोपाळ समाजाला नाथाची गरजदररोज गावोगावी फिरून भिक्षा मागणाऱ्या भटक्या जमातीच्या गोपाळ समाजबांधवाची चूल तुमच्या-आमच्या दिलेल्या मुठभर अन्नधान्यावरच पेटली जाते. सर्वत्र संचारबंदीत त्या ५ कुटुंबावर आघात होत आहे. त्यांना या स्थितीत मदतीसाठी आज ‘नाथा’ची गरज आहे. भिक्षा पात्रात आणणे व पानावर खाणारा हा गोपाळ समाज आजच्या परिस्थितीत भरडल्या जावू नये. यासाठी प्रशासनाने सुध्दा त्यांना मदत करण्याची गरज आहे.

टॅग्स :Socialसामाजिकsocial workerसमाजसेवक