शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

२०१५ व १६ मध्ये गोंदियात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By कपिल केकत | Updated: December 21, 2023 17:48 IST

प्रत्येकी ३१ शेतकऱ्यांनी मरण पत्करले.

कपिल केकत,गोंदिया : जगाचा अन्नदाता म्हणून ओळख असलेला शेतकरी आजही कर्जबाजारी व उपाशीपोटी राहात आहे. हेच कारण आहे की, अशा जगण्यापेक्षा तो मरण पत्करत आहे. जिल्ह्यातही सन २००२पासून शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. मात्र, सन २०१५ व २०१६ मध्ये सर्वाधिक ६२ शेतकऱ्यांनी मरण पत्करले. ही दोन वर्ष रक्तरंजित करणारी ठरली असून, यामुळेच या दोन वर्षांची आठवण न केलेलीच बरी अशी स्थिती आहे.

जग झपाट्याने प्रगती करत आहे. त्याव्दारे प्रत्येकजण आपली प्रगती साधत आहे. मात्र, शेतकरी होता तसाच आहे. काही शेतकरी परिस्थितीवर मात करून पुढे निघून गेले यातही शंका नाही. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांच्या नशिबी आजही दोनवेळची भाकरी नाही. कधी निसर्ग व तर कधी परिस्थिती अवघ्या जगाचे पोट भरणाऱ्या अन्नदात्याशी खेळ खेळतच आहे. हेच कारण आहे की, अन्नदाता स्वत:च उपाशी असून, कित्येकांवर कर्जाचे डोंगर उभे आहे. अशात या कर्जाची परतफेड शिवाय कुटुंबाचे भरण पोषण करण्यातही अपयशी ठरत असल्याने शेतकरी या स्थितीपेक्षा मरण पत्करत आहेत. हेच कारण आहे की, शेतकरी आत्महत्येने अवघे राज्य ग्रासले असून, यापासून गोंदिया जिल्हाही सुटलेला नाही. जिल्ह्यात सन २००२पासून शेतकरी आत्महत्यांची मोजदाद सुरू झाली.

सन २००२ मध्ये जेमतेम एक शेतकरी आत्महत्येची नोंद असून, त्यानंतर हे मरणसत्र आतापर्यंत अखंडितपणे सुरूच आहे. मात्र, सन २०१५ व २०१६ ही दोन वर्ष जिल्ह्यासाठी सर्वाधिक दु:खाची ठरली आहेत. सन २०१५ मध्ये ३१ तर सन २०१६ मध्येही ३१ अशा एकूण ६२ आत्महत्यांची नोंद घेण्यात आली आहे. २३ वर्षांच्या या लेखाजोखात या दोन वर्षांतच सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.

४२ कुटुंबीय मदतीपासून वंचित:

सन २०१५ मध्ये ३१ तर २०१६ मध्येही ३१ अशा सर्वाधिक आत्महत्यांची नोंद घेण्यात आली आहे. या एकूण ६२ आत्महत्यांमध्ये फक्त २० आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत देण्यात आली आहे. तर तब्बल ४२ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आल्याने या कुटुंबीयांना शासनाकडून मदत मिळालेली नाही. यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या निकषांची आडकाठी आली आहे.

२००६ व १० मध्येही ४४ शेतकरी आत्महत्या :

सन २०१५ व २०१६ मध्ये सर्वाधिक ६२ शेतकरी आत्महत्यांची नोंद असतानाच त्यानंतर सन २००६ व २०१० मध्येही प्रत्येकी २२ अशा एकूण ४४ आत्महत्यांची नोंद घेण्यात आली आहे. यातील २००६ मधील १७ तर २०१० मधील १६ प्रकरणे पात्र ठरली असून, शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळाली आहे. मात्र, ११ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली असून, या कुटुंबीयांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागले आहे.

दोन अंकातील शेतकरी आत्महत्येचे वर्ष -

वर्ष - आकडेवारी

२००६ - २२

२००७ - १९२००८ - १८

२००९ - १२२०१० - २२

२०११ - १३२०१२ - १०

२०१४ - १७२०१५ - ३१

२०१६ - ३१२०१७ - १७

२०१८ - १७२०१९ - १०

२०२१ - १६

टॅग्स :gondiya-acगोंदियाFarmerशेतकरी