शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
3
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
4
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
5
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
6
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
7
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
8
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
9
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
10
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
11
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
12
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
13
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
14
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
15
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
16
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
17
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
18
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
19
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
20
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा

२०१५ व १६ मध्ये गोंदियात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By कपिल केकत | Updated: December 21, 2023 17:48 IST

प्रत्येकी ३१ शेतकऱ्यांनी मरण पत्करले.

कपिल केकत,गोंदिया : जगाचा अन्नदाता म्हणून ओळख असलेला शेतकरी आजही कर्जबाजारी व उपाशीपोटी राहात आहे. हेच कारण आहे की, अशा जगण्यापेक्षा तो मरण पत्करत आहे. जिल्ह्यातही सन २००२पासून शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. मात्र, सन २०१५ व २०१६ मध्ये सर्वाधिक ६२ शेतकऱ्यांनी मरण पत्करले. ही दोन वर्ष रक्तरंजित करणारी ठरली असून, यामुळेच या दोन वर्षांची आठवण न केलेलीच बरी अशी स्थिती आहे.

जग झपाट्याने प्रगती करत आहे. त्याव्दारे प्रत्येकजण आपली प्रगती साधत आहे. मात्र, शेतकरी होता तसाच आहे. काही शेतकरी परिस्थितीवर मात करून पुढे निघून गेले यातही शंका नाही. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांच्या नशिबी आजही दोनवेळची भाकरी नाही. कधी निसर्ग व तर कधी परिस्थिती अवघ्या जगाचे पोट भरणाऱ्या अन्नदात्याशी खेळ खेळतच आहे. हेच कारण आहे की, अन्नदाता स्वत:च उपाशी असून, कित्येकांवर कर्जाचे डोंगर उभे आहे. अशात या कर्जाची परतफेड शिवाय कुटुंबाचे भरण पोषण करण्यातही अपयशी ठरत असल्याने शेतकरी या स्थितीपेक्षा मरण पत्करत आहेत. हेच कारण आहे की, शेतकरी आत्महत्येने अवघे राज्य ग्रासले असून, यापासून गोंदिया जिल्हाही सुटलेला नाही. जिल्ह्यात सन २००२पासून शेतकरी आत्महत्यांची मोजदाद सुरू झाली.

सन २००२ मध्ये जेमतेम एक शेतकरी आत्महत्येची नोंद असून, त्यानंतर हे मरणसत्र आतापर्यंत अखंडितपणे सुरूच आहे. मात्र, सन २०१५ व २०१६ ही दोन वर्ष जिल्ह्यासाठी सर्वाधिक दु:खाची ठरली आहेत. सन २०१५ मध्ये ३१ तर सन २०१६ मध्येही ३१ अशा एकूण ६२ आत्महत्यांची नोंद घेण्यात आली आहे. २३ वर्षांच्या या लेखाजोखात या दोन वर्षांतच सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.

४२ कुटुंबीय मदतीपासून वंचित:

सन २०१५ मध्ये ३१ तर २०१६ मध्येही ३१ अशा सर्वाधिक आत्महत्यांची नोंद घेण्यात आली आहे. या एकूण ६२ आत्महत्यांमध्ये फक्त २० आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत देण्यात आली आहे. तर तब्बल ४२ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आल्याने या कुटुंबीयांना शासनाकडून मदत मिळालेली नाही. यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या निकषांची आडकाठी आली आहे.

२००६ व १० मध्येही ४४ शेतकरी आत्महत्या :

सन २०१५ व २०१६ मध्ये सर्वाधिक ६२ शेतकरी आत्महत्यांची नोंद असतानाच त्यानंतर सन २००६ व २०१० मध्येही प्रत्येकी २२ अशा एकूण ४४ आत्महत्यांची नोंद घेण्यात आली आहे. यातील २००६ मधील १७ तर २०१० मधील १६ प्रकरणे पात्र ठरली असून, शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळाली आहे. मात्र, ११ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली असून, या कुटुंबीयांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागले आहे.

दोन अंकातील शेतकरी आत्महत्येचे वर्ष -

वर्ष - आकडेवारी

२००६ - २२

२००७ - १९२००८ - १८

२००९ - १२२०१० - २२

२०११ - १३२०१२ - १०

२०१४ - १७२०१५ - ३१

२०१६ - ३१२०१७ - १७

२०१८ - १७२०१९ - १०

२०२१ - १६

टॅग्स :gondiya-acगोंदियाFarmerशेतकरी