शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

२०१५ व १६ मध्ये गोंदियात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By कपिल केकत | Updated: December 21, 2023 17:48 IST

प्रत्येकी ३१ शेतकऱ्यांनी मरण पत्करले.

कपिल केकत,गोंदिया : जगाचा अन्नदाता म्हणून ओळख असलेला शेतकरी आजही कर्जबाजारी व उपाशीपोटी राहात आहे. हेच कारण आहे की, अशा जगण्यापेक्षा तो मरण पत्करत आहे. जिल्ह्यातही सन २००२पासून शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. मात्र, सन २०१५ व २०१६ मध्ये सर्वाधिक ६२ शेतकऱ्यांनी मरण पत्करले. ही दोन वर्ष रक्तरंजित करणारी ठरली असून, यामुळेच या दोन वर्षांची आठवण न केलेलीच बरी अशी स्थिती आहे.

जग झपाट्याने प्रगती करत आहे. त्याव्दारे प्रत्येकजण आपली प्रगती साधत आहे. मात्र, शेतकरी होता तसाच आहे. काही शेतकरी परिस्थितीवर मात करून पुढे निघून गेले यातही शंका नाही. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांच्या नशिबी आजही दोनवेळची भाकरी नाही. कधी निसर्ग व तर कधी परिस्थिती अवघ्या जगाचे पोट भरणाऱ्या अन्नदात्याशी खेळ खेळतच आहे. हेच कारण आहे की, अन्नदाता स्वत:च उपाशी असून, कित्येकांवर कर्जाचे डोंगर उभे आहे. अशात या कर्जाची परतफेड शिवाय कुटुंबाचे भरण पोषण करण्यातही अपयशी ठरत असल्याने शेतकरी या स्थितीपेक्षा मरण पत्करत आहेत. हेच कारण आहे की, शेतकरी आत्महत्येने अवघे राज्य ग्रासले असून, यापासून गोंदिया जिल्हाही सुटलेला नाही. जिल्ह्यात सन २००२पासून शेतकरी आत्महत्यांची मोजदाद सुरू झाली.

सन २००२ मध्ये जेमतेम एक शेतकरी आत्महत्येची नोंद असून, त्यानंतर हे मरणसत्र आतापर्यंत अखंडितपणे सुरूच आहे. मात्र, सन २०१५ व २०१६ ही दोन वर्ष जिल्ह्यासाठी सर्वाधिक दु:खाची ठरली आहेत. सन २०१५ मध्ये ३१ तर सन २०१६ मध्येही ३१ अशा एकूण ६२ आत्महत्यांची नोंद घेण्यात आली आहे. २३ वर्षांच्या या लेखाजोखात या दोन वर्षांतच सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.

४२ कुटुंबीय मदतीपासून वंचित:

सन २०१५ मध्ये ३१ तर २०१६ मध्येही ३१ अशा सर्वाधिक आत्महत्यांची नोंद घेण्यात आली आहे. या एकूण ६२ आत्महत्यांमध्ये फक्त २० आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत देण्यात आली आहे. तर तब्बल ४२ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आल्याने या कुटुंबीयांना शासनाकडून मदत मिळालेली नाही. यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या निकषांची आडकाठी आली आहे.

२००६ व १० मध्येही ४४ शेतकरी आत्महत्या :

सन २०१५ व २०१६ मध्ये सर्वाधिक ६२ शेतकरी आत्महत्यांची नोंद असतानाच त्यानंतर सन २००६ व २०१० मध्येही प्रत्येकी २२ अशा एकूण ४४ आत्महत्यांची नोंद घेण्यात आली आहे. यातील २००६ मधील १७ तर २०१० मधील १६ प्रकरणे पात्र ठरली असून, शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळाली आहे. मात्र, ११ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली असून, या कुटुंबीयांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागले आहे.

दोन अंकातील शेतकरी आत्महत्येचे वर्ष -

वर्ष - आकडेवारी

२००६ - २२

२००७ - १९२००८ - १८

२००९ - १२२०१० - २२

२०११ - १३२०१२ - १०

२०१४ - १७२०१५ - ३१

२०१६ - ३१२०१७ - १७

२०१८ - १७२०१९ - १०

२०२१ - १६

टॅग्स :gondiya-acगोंदियाFarmerशेतकरी