शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

२०१५ व १६ मध्ये गोंदियात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By कपिल केकत | Updated: December 21, 2023 17:48 IST

प्रत्येकी ३१ शेतकऱ्यांनी मरण पत्करले.

कपिल केकत,गोंदिया : जगाचा अन्नदाता म्हणून ओळख असलेला शेतकरी आजही कर्जबाजारी व उपाशीपोटी राहात आहे. हेच कारण आहे की, अशा जगण्यापेक्षा तो मरण पत्करत आहे. जिल्ह्यातही सन २००२पासून शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. मात्र, सन २०१५ व २०१६ मध्ये सर्वाधिक ६२ शेतकऱ्यांनी मरण पत्करले. ही दोन वर्ष रक्तरंजित करणारी ठरली असून, यामुळेच या दोन वर्षांची आठवण न केलेलीच बरी अशी स्थिती आहे.

जग झपाट्याने प्रगती करत आहे. त्याव्दारे प्रत्येकजण आपली प्रगती साधत आहे. मात्र, शेतकरी होता तसाच आहे. काही शेतकरी परिस्थितीवर मात करून पुढे निघून गेले यातही शंका नाही. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांच्या नशिबी आजही दोनवेळची भाकरी नाही. कधी निसर्ग व तर कधी परिस्थिती अवघ्या जगाचे पोट भरणाऱ्या अन्नदात्याशी खेळ खेळतच आहे. हेच कारण आहे की, अन्नदाता स्वत:च उपाशी असून, कित्येकांवर कर्जाचे डोंगर उभे आहे. अशात या कर्जाची परतफेड शिवाय कुटुंबाचे भरण पोषण करण्यातही अपयशी ठरत असल्याने शेतकरी या स्थितीपेक्षा मरण पत्करत आहेत. हेच कारण आहे की, शेतकरी आत्महत्येने अवघे राज्य ग्रासले असून, यापासून गोंदिया जिल्हाही सुटलेला नाही. जिल्ह्यात सन २००२पासून शेतकरी आत्महत्यांची मोजदाद सुरू झाली.

सन २००२ मध्ये जेमतेम एक शेतकरी आत्महत्येची नोंद असून, त्यानंतर हे मरणसत्र आतापर्यंत अखंडितपणे सुरूच आहे. मात्र, सन २०१५ व २०१६ ही दोन वर्ष जिल्ह्यासाठी सर्वाधिक दु:खाची ठरली आहेत. सन २०१५ मध्ये ३१ तर सन २०१६ मध्येही ३१ अशा एकूण ६२ आत्महत्यांची नोंद घेण्यात आली आहे. २३ वर्षांच्या या लेखाजोखात या दोन वर्षांतच सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.

४२ कुटुंबीय मदतीपासून वंचित:

सन २०१५ मध्ये ३१ तर २०१६ मध्येही ३१ अशा सर्वाधिक आत्महत्यांची नोंद घेण्यात आली आहे. या एकूण ६२ आत्महत्यांमध्ये फक्त २० आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत देण्यात आली आहे. तर तब्बल ४२ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आल्याने या कुटुंबीयांना शासनाकडून मदत मिळालेली नाही. यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या निकषांची आडकाठी आली आहे.

२००६ व १० मध्येही ४४ शेतकरी आत्महत्या :

सन २०१५ व २०१६ मध्ये सर्वाधिक ६२ शेतकरी आत्महत्यांची नोंद असतानाच त्यानंतर सन २००६ व २०१० मध्येही प्रत्येकी २२ अशा एकूण ४४ आत्महत्यांची नोंद घेण्यात आली आहे. यातील २००६ मधील १७ तर २०१० मधील १६ प्रकरणे पात्र ठरली असून, शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळाली आहे. मात्र, ११ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली असून, या कुटुंबीयांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागले आहे.

दोन अंकातील शेतकरी आत्महत्येचे वर्ष -

वर्ष - आकडेवारी

२००६ - २२

२००७ - १९२००८ - १८

२००९ - १२२०१० - २२

२०११ - १३२०१२ - १०

२०१४ - १७२०१५ - ३१

२०१६ - ३१२०१७ - १७

२०१८ - १७२०१९ - १०

२०२१ - १६

टॅग्स :gondiya-acगोंदियाFarmerशेतकरी