१ लाख ९० हेक्टरमधील धानपिकावर अवकाळीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST2019-10-26T06:00:00+5:302019-10-26T06:00:16+5:30
जिल्ह्यातील बरेच शेतकरी हलक्या धानाची लागवड करतात. हलका धान दिवाळीपूर्वी निघत असल्याने या धानाची लवकर मळणी करुन शेतकरी धान विक्रीसाठी बाजारपेठेत नेतात. यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करण्यास आणि खरीप हंगामासाठी घेतलेली उधार उसणवारी फेडण्यास मदत होते.

१ लाख ९० हेक्टरमधील धानपिकावर अवकाळीचे संकट
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ लाख ९० हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली. यंदा धानाला अनुकुल असा पाऊस झाल्याने धानाची चांगली वाढ झाली.त्यामुळे धानाचे बंफर उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे १ लाख ९० हजार हेक्टरमधील धानावर ओल्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले.त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.
जिल्ह्यातील बरेच शेतकरी हलक्या धानाची लागवड करतात. हलका धान दिवाळीपूर्वी निघत असल्याने या धानाची लवकर मळणी करुन शेतकरी धान विक्रीसाठी बाजारपेठेत नेतात. यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करण्यास आणि खरीप हंगामासाठी घेतलेली उधार उसणवारी फेडण्यास मदत होते.
यंदा खरीपातील धान असा अनुकुल असा पाऊस आणि वातावरण मिळाल्याने धानाची चांगली वाढ झाली. त्यामुळे कृषी विभागाने सुध्दा धानाच्या हेक्टरी उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. तर जवळपास १० हजार हेक्टरमधील हलक्या धानाच्या कापणीला सुध्दा शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. मात्र मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या धानाच्या कळपा भिजल्या, तर काही ठिकाणी बांध्यामध्ये पाणी साचून राहिल्याने मोठ्या प्रमाणात धान सडला. परिणामी शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागला.
सध्या ७० ते ८० टक्के धान कापणी योग्य झाला असून अवकाळी पावसामुळे धानाची कापणी करायची कशी असा बिकट प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.त्यामुळे कृषी आणि महसूल विभागाने धानाची पंचनामे करुन शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे.
मिरची लागवडीवर परिणाम
ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे मिरचीची लागवड सुध्दा लांबणीवर पडली आहे. याचा मिरचीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव, देवरी, सडक अर्जुनी, गोंदिया या भागात जवळपास ४०० हेक्टरवर मिरचीची लागवड केली जाते. मात्र अवकाळी पावसामुळे यंदा मिरचीची लागवड लांबणीवर पडल्याने मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे.
अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील खरीप हंगामातील धानाला मोठ्या प्रमाणात फटका बसला.अनेक शेतकºयांचा तोंडी आलेला घास हिरावल्या गेला. त्यामुळे शासनाने नुकसानीचे पंचनामे करुन शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी.
- गंगाधर परशुरामकर, जि.प.सदस्य.
धान पाखड होण्याची शक्यता
अवकाळी पावसाचा कापणी केलेल्या धानाला फटका बसल्याने मोठ्या प्रमाणात धान पाखड झाला आहे.पाखड झालेला धान खरेदी करण्यास व्यापारी तयारी होत नाही.शासकीय धान खरेदी केंद्रावर सुध्दा या धानाला कमी दर मिळतो त्यामुळे शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
धानाच्या दर्जावर परिणाम
अवकाळी पावसाचा फटका बसल्याने धानावर काजळी चढत असून पाखड देखील होत आहे.त्यामुळे याचा धानाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.त्यामुळे उच्च प्रतीच्या धानाला चांगला दर मिळण्यापासून शेतकºयांना वंचित राहावे लागत आहे.