शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

शेतकºयांना बसणार फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:48 IST

यंदा पावसाअभावी जिल्ह्यातील ७० हजार हेक्टर क्षेत्रावर रोवणीच झाली नसल्याचा अंदाज वर्तविला जात होता. जिल्हा परिषद कृषी विभागाने शासनाला पाठविलेल्या अहवालात ६२ हजार हेक्टर क्षेत्र पडीक असल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्देपडीक क्षेत्रावरुन संभ्रम : समन्वयाचा अभाव, कृषी विभागाचा घोळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा पावसाअभावी जिल्ह्यातील ७० हजार हेक्टर क्षेत्रावर रोवणीच झाली नसल्याचा अंदाज वर्तविला जात होता. जिल्हा परिषद कृषी विभागाने शासनाला पाठविलेल्या अहवालात ६२ हजार हेक्टर क्षेत्र पडीक असल्याचे म्हटले आहे. तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने ४७ हजार हेक्टर क्षेत्र पावसाअभावी पडीक असल्याचा अहवाल पाठविला. दरम्यान पडीक क्षेत्रावरुन कृषी विभागातच समन्वय नसल्याने त्याचा आर्थिक फटका शेतकºयांना बसण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत केवळ अर्धाच पाऊस झाला. त्यातही सातत्य नसल्याने शेतकºयांना रोवणी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात ७० हजार हेक्टरवर पावसाअभावी रोवणी झाली नसल्याचा अहवाल जिल्हा परिषद कृषी विभागाने तयार केला होता. सप्टेंबर महिन्यात देखील समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी केलेली रोवणी वाचविण्यासाठी शेतकºयांना मोठी धडपड करावी लागली.जिल्ह्यात यंदा १ लाख ८५ हजार हेक्टरवर धानाच्या रोवणीचे नियोजन कृषी विभागाने केले होते. पण, यंदा सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिल्याने हजारो हेक्टरमधील रोवणी झाली नाही. शेतकºयांना शेती पडीक ठेवण्याची वेळ आली.एकंदरीत जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. सर्वच राजकीय पक्ष आणि शेतकºयांनी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. त्याच पार्श्वभूमिवर शासनाने कृषी विभागाला जिल्ह्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी, झालेली रोवणी, पडीक क्षेत्र यांचा अहवाल मागविला होता. त्यानुसार नुकताच या विभागाने शासनाला अहवाल पाठविला.जिल्हा परिषद कृषी विभागाने पावसाअभावी जिल्ह्यात ६२ हजार हेक्टर क्षेत्रावर रोवणीच झाली नसल्याचा अहवाल तयार करुन पाठविला. तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने ४७ हजार हेक्टरवर रोवणी झाली नसल्याचे म्हटले आहे. एकाच जिल्ह्यातील कृषी विभागाने पाठविलेल्या दोन अहवालातील आकडेवारीमध्ये तफावत आहे.त्यामुळे नेमके पडीक क्षेत्र किती, असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. दरम्यान या दोन्ही विभागातील समन्वयचा अभावाचा फटका जिल्ह्यातील शेतकºयांना बसण्याची शक्यता आहे. शेतकºयांना शासनाकडून दिल्या जाणाºया नुकसान भरपाईवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.सदस्यांनी धरले अधिकाºयांना धारेवरपावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती आहे. शेतकरी आर्थिक संकटात आहे. मात्र यानंतरही कृषी विभाग शेतकºयांच्या प्रश्नावर गंभीर नाही. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यात केवळ ४७ हजार हेक्टवर रोवणी न झाल्याचा अहवाल शासनाला पाठविला. हा अहवाल कार्यालयात बसून तयार केला. प्रत्येक्षात शेतावर जावून पाहणी केली नाही. यामुळे शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहिल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करित जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्यासह अन्य सदस्यांनी कृषी विभागाच्या अधिकाºयांना स्थायी समितीच्या सभेत धारेवर धरल्याची माहिती आहे.परतीच्या पावसाचा पिकांना फटकाजिल्ह्यात तीन चार दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाचा फटका पिकांना बसला. या पावसाने हलक्या धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे या नुकसानीचे सर्वेक्षण करुन त्याचा अहवाल शासनाला पाठविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.