शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कंत्राटी कर्मचाऱ्याचा हृदयघाताने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:30 IST

गोंदिया : मागील १०-१२ वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवा दिली. आता शासन सगळ्या पदांचे आऊटसोर्सिंग करीत आहेत. त्यामुळे आपली ...

गोंदिया : मागील १०-१२ वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवा दिली. आता शासन सगळ्या पदांचे आऊटसोर्सिंग करीत आहेत. त्यामुळे आपली नोकरी जाईल या विवंचनेत जिल्हा परिषदेतील स्वच्छ भारत मिशन कक्षात कार्यरत कंत्राटी कर्मचारी देवानंद बोपचे (४१) यांचे शुक्रवारी (दि. १५) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. घरी तथा गावातील मित्रांकडे ते सारखे फेब्रुवारी महिन्यात नोकरी जाण्याविषयी बोलत असल्याचे त्याची पत्नी रेखा बोपचे आणि भाऊ प्रकाश बोपचे यांचे म्हणणे आहे.

शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केल्यानंतर साधारणत: १६ ते १७ वर्षांपासून विविध विभागात कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या कंत्राटी कर्मचाऱ्यांची शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी आहे. मात्र, शासनस्तरावरून कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याऐवजी त्यांचे पद बाह्यसंस्थेच्या माध्यमातून भरण्याचा घाट घालण्यात आला आहे. जुलै महिन्यात शासनस्तरावरून जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन आणि तालुकास्तरावरील गट संसाधन केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्याचे पत्र काढण्यात आले. कंत्राटी कर्मचारी या विरोधात न्यायालयात गेले. राज्यातील विविध मंत्री व आमदारांना याविषयी निवेदने देण्यात आली. त्यामुळे शासनाने तात्पुरत्या स्वरूपात जुुलै महिन्यातील पत्राला स्थगिती दिली. मात्र, जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पदांना मंजुरी दिल्यानंतर सर्व पद बाह्यसंस्थेच्या माध्यमातून भरण्याचे शासनाचे पत्र आले. शिवाय गेल्या १६ ते १७ वर्षांपासून कार्यरत पदांना व्यपगत करण्याचासुध्दा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आपले पद जाणार व मुलांच्या शिक्षणाचे काय होईल, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्व भरती प्रक्रिया बंद केल्याने नव्याने नोकरी कुठून शोधणार, आता वयाच्या एक उंबरठा पार पडला, त्यामुळे शासकीय नोकरीची वयोमर्यादा गेल्याने आपले कुटुंब उघड्यावर येईल अशा विवंचनेत देवानंद बोपचे होते. अनेक मित्रांकडे माझी नोकरी जाणार असल्याचेच बोलत असल्याचे त्यांचे मित्र व गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

एका कंत्राटी सहकारी मित्राच्या अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांतून रोष व्यक्त करण्यात येत आहे. उल्लेखनीय म्हणजे, कंत्राटी कर्मचारी अत्यंत तुटपुंज्या वेतनावर कार्यरत आहेत. त्यातच त्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनस्तरावर कोणतेच पाऊल उचलले जात नाही. देवानंद बोपचे यांच्या अकाली निधनामुळे त्यांचे दोन मुले आणि पत्नी उघड्यावर आली असून त्यांच्या जीवनयापनाचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.

----------------

कर्मचाऱ्यांत असा भेद का?

पदभरती करण्यात येत नसल्यामुळे अनेक होतकरू तरुण कंत्राटी पदावर नोकरीला तयार होतात. त्यांना अल्प मानधन दिले जाते. कामाचा प्रचंड व्याप, नोकरीतील असुरक्षितात, वरिष्ठांची मर्जी सांभाळणे, नोकरी गेल्यास भविष्यातील निर्वाहाची समस्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पाचविलाच पुजलेली आहे. विशेष म्हणजे, शासनाने १४ जानेवारी रोजी परिपत्रक काढून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ केली. तर दुसरीकडे कायम करण्याची मागणी करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पद व्यपगत करून त्यांना बाह्यसंस्थेच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचे वेतन अर्ध्यावर येईल. शिवाय नोकरीसुध्दा बेभरवशाची राहणार आहे. आपल्याच दोन कर्मचाऱ्यांत असा भेद का करण्यात येत आहे, असा सवाल कंत्राटी कर्मचाऱ्यांतून केला जात आहे.