शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कॉरिडॉर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
3
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
4
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
5
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
6
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
7
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
8
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
9
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
10
शिक्षकांसाठीच्या परीक्षेत झाला गोंधळ; अनेक विवाहित महिला परीक्षेपासून वंचित
11
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
12
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई
13
‘आरटीई’साठी १७६ कोटी मंजूर; पहिली ते आठवीपर्यंतच्या ४.७ लाख विद्यार्थ्यांना लाभ
14
९०३ जलसंधारण योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द; रखडलेल्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा दणका
15
तीन कोटींचे बक्षीस असलेला नक्षली नेता सुधाकर ठार; सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक
16
चर्चगेट स्थानकात आगीमुळे पळापळ; ऐन गर्दीच्या वेळी दुर्घटना; फलाटांवर धुराचे लोट
17
वाशी- मानखुर्द प्रवास आता सुसाट वाशी खाडी पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे लोकार्पण
18
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
19
मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते; एलन मस्क यांनी पुन्हा साधला निशाणा
20
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित

अखेर कंत्राटी कर्मचाऱ्याचा हृदयघाताने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:30 IST

गोंदिया : मागील १०-१२ वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवा दिली. आता शासन सगळ्या पदांचे आऊटसोर्सिंग करीत आहेत. त्यामुळे आपली ...

गोंदिया : मागील १०-१२ वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवा दिली. आता शासन सगळ्या पदांचे आऊटसोर्सिंग करीत आहेत. त्यामुळे आपली नोकरी जाईल या विवंचनेत जिल्हा परिषदेतील स्वच्छ भारत मिशन कक्षात कार्यरत कंत्राटी कर्मचारी देवानंद बोपचे (४१) यांचे शुक्रवारी (दि. १५) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. घरी तथा गावातील मित्रांकडे ते सारखे फेब्रुवारी महिन्यात नोकरी जाण्याविषयी बोलत असल्याचे त्याची पत्नी रेखा बोपचे आणि भाऊ प्रकाश बोपचे यांचे म्हणणे आहे.

शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केल्यानंतर साधारणत: १६ ते १७ वर्षांपासून विविध विभागात कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या कंत्राटी कर्मचाऱ्यांची शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी आहे. मात्र, शासनस्तरावरून कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याऐवजी त्यांचे पद बाह्यसंस्थेच्या माध्यमातून भरण्याचा घाट घालण्यात आला आहे. जुलै महिन्यात शासनस्तरावरून जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन आणि तालुकास्तरावरील गट संसाधन केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्याचे पत्र काढण्यात आले. कंत्राटी कर्मचारी या विरोधात न्यायालयात गेले. राज्यातील विविध मंत्री व आमदारांना याविषयी निवेदने देण्यात आली. त्यामुळे शासनाने तात्पुरत्या स्वरूपात जुुलै महिन्यातील पत्राला स्थगिती दिली. मात्र, जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पदांना मंजुरी दिल्यानंतर सर्व पद बाह्यसंस्थेच्या माध्यमातून भरण्याचे शासनाचे पत्र आले. शिवाय गेल्या १६ ते १७ वर्षांपासून कार्यरत पदांना व्यपगत करण्याचासुध्दा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आपले पद जाणार व मुलांच्या शिक्षणाचे काय होईल, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्व भरती प्रक्रिया बंद केल्याने नव्याने नोकरी कुठून शोधणार, आता वयाच्या एक उंबरठा पार पडला, त्यामुळे शासकीय नोकरीची वयोमर्यादा गेल्याने आपले कुटुंब उघड्यावर येईल अशा विवंचनेत देवानंद बोपचे होते. अनेक मित्रांकडे माझी नोकरी जाणार असल्याचेच बोलत असल्याचे त्यांचे मित्र व गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

एका कंत्राटी सहकारी मित्राच्या अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांतून रोष व्यक्त करण्यात येत आहे. उल्लेखनीय म्हणजे, कंत्राटी कर्मचारी अत्यंत तुटपुंज्या वेतनावर कार्यरत आहेत. त्यातच त्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनस्तरावर कोणतेच पाऊल उचलले जात नाही. देवानंद बोपचे यांच्या अकाली निधनामुळे त्यांचे दोन मुले आणि पत्नी उघड्यावर आली असून त्यांच्या जीवनयापनाचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.

----------------

कर्मचाऱ्यांत असा भेद का?

पदभरती करण्यात येत नसल्यामुळे अनेक होतकरू तरुण कंत्राटी पदावर नोकरीला तयार होतात. त्यांना अल्प मानधन दिले जाते. कामाचा प्रचंड व्याप, नोकरीतील असुरक्षितात, वरिष्ठांची मर्जी सांभाळणे, नोकरी गेल्यास भविष्यातील निर्वाहाची समस्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पाचविलाच पुजलेली आहे. विशेष म्हणजे, शासनाने १४ जानेवारी रोजी परिपत्रक काढून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ केली. तर दुसरीकडे कायम करण्याची मागणी करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पद व्यपगत करून त्यांना बाह्यसंस्थेच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचे वेतन अर्ध्यावर येईल. शिवाय नोकरीसुध्दा बेभरवशाची राहणार आहे. आपल्याच दोन कर्मचाऱ्यांत असा भेद का करण्यात येत आहे, असा सवाल कंत्राटी कर्मचाऱ्यांतून केला जात आहे.