शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

जुन्या पेंशनच्या मागणीसाठी कर्मचारी एकसंघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:40 IST

सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, वेतनत्रृटी दूर कराव्यात,अनुकंपाची भरती करावी, विविध खात्यातील कंत्राटीकरण धोरण रद्द करावे, मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयाची उपासमार थांबवून त्यांना त्यांच्या हक्काचे कुटुंब निवृत्तीवेतन त्वरीत देण्यात यावे आदी मागण्याबाबत शासन उदासीन असून वेळकाढू धोरण अवलंबवित असल्याने सर्वच शासकीय, निमशासकीय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.

ठळक मुद्देआंदोलनामुळे शाळा बंद : शिक्षकांसह विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश, आंदोलन तीव्र करणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सन २००५ नंतर शासकीत सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू करण्यात यावी या मुख्य मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचारी शिक्षक,शिक्षकेत्तर समन्वय समिती गोंदियाच्या नेतृत्त्वात सोमवारी (दि.९) जिल्हास्तरावर आणि प्रत्येक तालुक्यात संप पुकारण्यात आला. जुन्या पेशंनच्या मागणीसाठी जिल्हाभरातील पाच हजारावर कर्मचारी एकसंघ झाले होते. कर्मचाºयांनी येथील जि.प.समोर निदर्शने केली.सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, वेतनत्रृटी दूर कराव्यात,अनुकंपाची भरती करावी, विविध खात्यातील कंत्राटीकरण धोरण रद्द करावे, मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयाची उपासमार थांबवून त्यांना त्यांच्या हक्काचे कुटुंब निवृत्तीवेतन त्वरीत देण्यात यावे आदी मागण्याबाबत शासन उदासीन असून वेळकाढू धोरण अवलंबवित असल्याने सर्वच शासकीय, निमशासकीय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.१ नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचाºयांना हक्काच्या वेतन कपातीवर आधारित अंशदायी पेंशन योजना शासनाने लागू केली आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रातील शेकडो मृत कर्मचाºयांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. केंद्र सरकार आणि इतर राज्य सरकाराप्रमाणे त्यांना हक्काचे कुटुंब निवृत्तीवेतन लागू करण्याची मागणी केली. आंदोलने करुन व मागण्याबाबत चर्चा करुनही शासनाने या मागण्या अद्यापही मार्गी लावल्या नाहीत. त्यामुळे सर्वच कर्मचाºयांमध्ये तीव्र असंतोष आहे. कर्मचाºयांच्या वेतनामध्ये त्रृटी आहेत. शासन सर्वच क्षेत्रात खाजगीकरणाचे धोरण अवलंबित असून कंत्राटीकरण सुरु करीत आहे. कर्मचारी भरती व अनुकंपा भरती रखडली आहे.२५ आॅगस्ट रोजी सर्व कर्मचारी संघटना पुणे येथे एकत्र आल्या.यापुढे कर्मचारी हक्कासाठी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ५ सप्टेंबरपासून काळ्या फिती लावून काम करणे, ९ सप्टेंबर रोजी एक दिवसीय संप आणि मागण्या मान्य न झाल्यास ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.सोमवारी सर्व कार्यालये, शाळा, महाविद्यालय बंद होती. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ११ सप्टेंबरपासून सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.आंदोलनात शिक्षक संघाचे अध्यक्ष विरेंद्र कटरे, सरचिटणीस अनिरूध्द मेश्राम, एस.यू.वंजारी, डी.टी.कावळे, केदार गोटेफोडे, एल.यु.खोब्रागडे, शिक्षक परिषदेचे कार्यवाह गुनीला फुंडे, जुनी पेंशन हक्क समितीचे जिल्हाध्यक्ष राज कडव, प्रसिध्दी प्रमुख संदीप सोमवंशी,सचिन राठोड, मुकेश राठोड, रवी अंबुले, शालीक कठाणे, चंद्रकुमार कोसरकर, क्रिष्णा कापसे, संजय उके,मोहन बिसेन,ओमप्रकाश वासनिक, चंदू दुर्गे, लिकेश हिरापुरे, भूषण लोहारे, प्रितम लाडे, सुनील चौरागडे, अजय कोटेवार, प्रदीप गणवीर, यशोधरा सोनवाने,जयश्री सिरसाटे, प्राजक्ता रणदिवे, सरीता भरणे, स्रेहल ब्राम्हणकर, आरती सतदेवे, संगीता गायधने, वंदना वहाणे, कल्पना बनकर यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन