शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

गोंदिया-गडचिरोली जिल्ह्यात हत्ती अभयारण्य; पाठविला प्राथमिक प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 15:24 IST

राज्यातील पहिलाच प्रकल्प

गोंदिया : मागील वर्षभरापासून गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात पश्चिम बंगालमधून आलेल्या हत्तींच्या कळपाचा वावर आहे. हा कळप या दोन्ही जिल्ह्यांतील जंगलांमध्ये स्थिरावला आहे. याच अनुषंगाने गोंदिया-गडचिरोली जिल्ह्यात राज्यातील पहिले हत्ती अभयारण्य स्थापन करण्याचा प्राथमिक प्रस्ताव मुख्य वन्यजीवरक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व वनसंरक्षक जयराम गौडा यांनी सांगितले.

गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत महाराष्ट्रातील पहिले हत्ती अभयारण्य स्थापन करण्यासाठी अनुकूल स्थिती आहे काय, त्यासाठी कुठल्या उपाययोजना आणि सोयीसुविधा निर्माण करण्याची गरज आहे, या प्रकल्पाचे नेमके फायदे-तोटे काय आहेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी नेमका किती निधी लागेल, अभयारण्य स्थापन करण्यासाठी कुठल्या गोष्टी करण्याची गरज आहे, यासंदर्भातील प्राथमिक प्रस्ताव तयार करून तो राज्याच्या मुख्य वन्यजीवरक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मुख्य वन्यजीवरक्षक कार्यालयाने मंजुरी दिल्यानंतर तो प्रस्ताव राज्य वन्यजीव मंडळ व नंतर केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास जिल्ह्यातील वैभवात पुन्हा भर पडणार असून, व्याघ्र प्रकल्पासह हत्ती अभयारण्याची जोड मिळणार आहे.

मागील वर्षी दाखल झाला होता कळप

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात ओडिशाहून छत्तीसगडमार्गे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात २३ हत्तींचा कळप महाराष्ट्रात दाखल झाला होता. त्यानंतर या कळपाने गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यांतील काही भागांत धुमाकूळ घातला. गोंदिया जिल्ह्यात या हत्तींच्या कळपाने येरंडी दर्रे येथील एका शेतकऱ्याचा बळीसुद्धा घेतला होता. तर शेकडो हेक्टरमधील धानपिकाचे नुकसान केले होते.

दोन जिल्ह्यांत स्थिरावले

मागील वर्षी ओडिशाहून आलेले हत्तींचा कळप गोंदिया आणि गडचिरोलीच्या सीमेवरून अनेकदा ये-जा करीत होता. हा कळप परत ओडिशा राज्यात जाईल, असा अंदाज लावला जात होता. पण, मागील वर्षभरापासून तो याच भागात स्थिरावला आहे.

हत्तींची येथे वारंवार होणारी हालचाल लक्षात घेता, हत्ती राखीव विभागाला अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्यास मदत होईल. त्याच दृष्टिकोनातून हत्ती अभयारण्य स्थापन करण्याचा विचार केला जात आहे.

पर्यटनास चालना व रोजगार निर्मितीस मदत

हत्ती अभयारण्य स्थापन करण्यास मंजुरी मिळाल्यानंतर पर्यटनास चालना मिळणार असून, त्यातून राेजगार निर्मिती व आर्थिक उत्पन्न वाढविण्यास मदत होणार आहे. राज्यात हत्तींची संख्या जास्त नाही. त्यामुळे हा प्रकल्प त्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मुख्य वन्यजीवरक्षक कार्यालयाची मंजुरीची सध्या प्रतीक्षा आहे. या प्रकल्पासाठी गोंदिया, गडचिरोली आणि छत्तीसगड राज्याचे सीमांकन केले जाणार आहे. हत्ती अभयारण्यासाठी प्रस्तावित क्षेत्र ४ हजार किमीपेक्षा थोडे अधिक प्रस्तावित केले असल्याचे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व वनसंरक्षक जयराम गौडा यांनी सांगितले.

टॅग्स :environmentपर्यावरणwildlifeवन्यजीवgondiya-acगोंदिया