शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
3
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
4
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
5
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
6
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
7
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
8
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
9
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
10
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
11
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
12
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
13
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
14
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
15
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
16
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
17
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
18
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
19
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
20
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया-गडचिरोली जिल्ह्यात हत्ती अभयारण्य; पाठविला प्राथमिक प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 15:24 IST

राज्यातील पहिलाच प्रकल्प

गोंदिया : मागील वर्षभरापासून गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात पश्चिम बंगालमधून आलेल्या हत्तींच्या कळपाचा वावर आहे. हा कळप या दोन्ही जिल्ह्यांतील जंगलांमध्ये स्थिरावला आहे. याच अनुषंगाने गोंदिया-गडचिरोली जिल्ह्यात राज्यातील पहिले हत्ती अभयारण्य स्थापन करण्याचा प्राथमिक प्रस्ताव मुख्य वन्यजीवरक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व वनसंरक्षक जयराम गौडा यांनी सांगितले.

गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत महाराष्ट्रातील पहिले हत्ती अभयारण्य स्थापन करण्यासाठी अनुकूल स्थिती आहे काय, त्यासाठी कुठल्या उपाययोजना आणि सोयीसुविधा निर्माण करण्याची गरज आहे, या प्रकल्पाचे नेमके फायदे-तोटे काय आहेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी नेमका किती निधी लागेल, अभयारण्य स्थापन करण्यासाठी कुठल्या गोष्टी करण्याची गरज आहे, यासंदर्भातील प्राथमिक प्रस्ताव तयार करून तो राज्याच्या मुख्य वन्यजीवरक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मुख्य वन्यजीवरक्षक कार्यालयाने मंजुरी दिल्यानंतर तो प्रस्ताव राज्य वन्यजीव मंडळ व नंतर केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास जिल्ह्यातील वैभवात पुन्हा भर पडणार असून, व्याघ्र प्रकल्पासह हत्ती अभयारण्याची जोड मिळणार आहे.

मागील वर्षी दाखल झाला होता कळप

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात ओडिशाहून छत्तीसगडमार्गे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात २३ हत्तींचा कळप महाराष्ट्रात दाखल झाला होता. त्यानंतर या कळपाने गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यांतील काही भागांत धुमाकूळ घातला. गोंदिया जिल्ह्यात या हत्तींच्या कळपाने येरंडी दर्रे येथील एका शेतकऱ्याचा बळीसुद्धा घेतला होता. तर शेकडो हेक्टरमधील धानपिकाचे नुकसान केले होते.

दोन जिल्ह्यांत स्थिरावले

मागील वर्षी ओडिशाहून आलेले हत्तींचा कळप गोंदिया आणि गडचिरोलीच्या सीमेवरून अनेकदा ये-जा करीत होता. हा कळप परत ओडिशा राज्यात जाईल, असा अंदाज लावला जात होता. पण, मागील वर्षभरापासून तो याच भागात स्थिरावला आहे.

हत्तींची येथे वारंवार होणारी हालचाल लक्षात घेता, हत्ती राखीव विभागाला अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्यास मदत होईल. त्याच दृष्टिकोनातून हत्ती अभयारण्य स्थापन करण्याचा विचार केला जात आहे.

पर्यटनास चालना व रोजगार निर्मितीस मदत

हत्ती अभयारण्य स्थापन करण्यास मंजुरी मिळाल्यानंतर पर्यटनास चालना मिळणार असून, त्यातून राेजगार निर्मिती व आर्थिक उत्पन्न वाढविण्यास मदत होणार आहे. राज्यात हत्तींची संख्या जास्त नाही. त्यामुळे हा प्रकल्प त्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मुख्य वन्यजीवरक्षक कार्यालयाची मंजुरीची सध्या प्रतीक्षा आहे. या प्रकल्पासाठी गोंदिया, गडचिरोली आणि छत्तीसगड राज्याचे सीमांकन केले जाणार आहे. हत्ती अभयारण्यासाठी प्रस्तावित क्षेत्र ४ हजार किमीपेक्षा थोडे अधिक प्रस्तावित केले असल्याचे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व वनसंरक्षक जयराम गौडा यांनी सांगितले.

टॅग्स :environmentपर्यावरणwildlifeवन्यजीवgondiya-acगोंदिया