शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

शेतकऱ्यांच्या नावावर धान खपविण्यासाठी खटाटोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 5:00 AM

जिल्ह्यात खरीप आणि रब्बी अश्या दोन्ही हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत धान खरेदी केली जाते. सध्या रब्बी हंगामातील धान खरेदी सुरू आहे. शासनाने रब्बीतील धानासाठी १८१५ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशने रब्बी हंगामात १५ लाख क्विंटल तर आदिवासी विकास महामंडळाने ५ लाख क्विंटल धान खरेदीचे नियोजन केले होते.

ठळक मुद्दे शासकीय धान खरेदी : खरेदीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदी करण्याची मुदत ३० जूनपर्यंत असून याला मुदतवाढ देण्यात यावी अशी ओरड सध्या सुरू आहे. मात्र ही ओरड शेतकऱ्यांची नसून व्यापाऱ्यांची असल्याची बाब पुढे आली आहे. शेतकऱ्यांचे सातबारा गोळा करुन त्यांच्या नावावर शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धानाची विक्री करण्यासाठी काही व्यापाऱ्यांचा खटाटोप सुरू आहे. याला जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांनी सुध्दा दुजोरा दिल्याने शेतकऱ्यांच्या नावावर धानाची विक्री करु पाहणाऱ्या व्यापाऱ्यांचा खरा चेहरा पुढे आला आहे.जिल्ह्यात खरीप आणि रब्बी अश्या दोन्ही हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत धान खरेदी केली जाते. सध्या रब्बी हंगामातील धान खरेदी सुरू आहे. शासनाने रब्बीतील धानासाठी १८१५ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशने रब्बी हंगामात १५ लाख क्विंटल तर आदिवासी विकास महामंडळाने ५ लाख क्विंटल धान खरेदीचे नियोजन केले होते. त्यानुसार २६ जूनपर्यंत जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने एकूण २० लाख क्विंटल धान खरेदी केली आहे. त्यामुळे या दोन्ही विभागाच्या अपेक्षित अंदाजानुसार धान खरेदी पूर्ण झाली आहे. शिवाय आता शेतकऱ्यांकडे सुध्दा रब्बीतील धान नाहीच्या बरोबरीत आहे. तर रब्बीतील धान खरेदी ही ३० जूनपर्यंत केली जाते. त्यामुळे येत्या चार दिवसात दोन्ही विभागाकडून शासकीय धान खरेदी बंद केली जाणार असल्याची माहिती आहे.जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कमी दराने धानाची खरेदी केली आहे.आता हाच धान शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने विक्री करुन प्रती क्विंटल तीनशे ते चारशे रुपये नफा मिळवून घेण्याच्या तयारीत काही व्यापारी आहेत. यासाठीच त्यांनी शेतकऱ्यांना पुढे करुन शासकीय धान खरेदीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याची ओरड सुरू केली आहे.व्यापाऱ्यांना थेट शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करता येत नसल्याने त्यांनी काही शेतकऱ्यांना आमीष दाखवून त्यांचे सातबारा गोळा करुन आणि कोऱ्या विड्रॉलवर त्यांच्या सह्या घेवून ठेवल्याची माहिती आहे. ही बाब लोकमतने यापूर्वी देखील उघडकीस आणली होती. त्याला आता जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सुध्दा दुजोरा दिला आहे.त्यामुळे काही व्यापारी शेतकऱ्यांच्या नावावर धानाची विक्री करण्यासाठी खटाटोप करीत असल्याचा प्रकार सुध्दा जिल्ह्यात काही ठिकाणी उघडकीस आला आहे. मात्र प्रशासनाने याची दखल घेवून कारवाई करण्याऐवजी मौन धारण केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सातबाऱ्यावरील नोंदणीची चाचपणी करणे कठीणजिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात ३५ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. मात्र ज्या शेतकºयांनी रब्बीतील धानाची लागवड केली नाही व ज्यांच्या शेतात दुसरीच पिके लावण्यात आली त्यांच्या सातबारावर रब्बीतील धानाची लागवड केल्याची नोंद काही तलाठ्यांच्या मदतीने करण्यात आल्याची माहिती आहे. व्यापारी याच गोष्टीचा फायदा घेवून आणि आमीष दाखवून त्यांच्यावर धानाची विक्री करीत आहे.मात्र सातबाऱ्यावरील नोंदी या खऱ्या आहेत का याची चाचपणी करण्याची प्रक्रिया कठीण असल्याने याची चौकशी करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती आहे.सखोल चौकशी केल्यास फुटणार बिंगशासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या नावावर काही व्यापारी आपल्या धानाची विक्री करुन नफा कमवित आहे. ही बाब आता लपून राहिलेली नाही.शिवाय खरेदीची प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणेने सुध्दा याला दुजोरा दिला आहे.त्यामुळे याची सखोल चौकशी केल्यास आणि शेतकऱ्यांनी जोडलेल्या सातबारानुसार खरोखरच त्यांनी रब्बी धानाची लागवड केली का याची मौका चौकशी केल्यास यातील घोळाचे बिंग फुटण्याची शक्यता आहे. तसेच शेतकऱ्यांच्या नावावर नफा कमावून पाहणाऱ्यांना धडा शिकवून कारवाई करणे देखील शक्य होणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड