शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

यापुढे रस्त्यांवर कुणाचेही सामान नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 05:00 IST

शहरातील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यात बाजारातील दुकानदार आपल्या दुकानातील सामान, बोर्ड, पुतळे आदी साहित्य दुकानांसमोर ठेवतात. यामध्ये तेवढी जागा नाहक व्यापली जात असून, वाहनांना ठेवायला जागा राहत नाही. अशात नागरिक दुकानात आले व त्यांना जागा न मिळाल्यास ते रस्त्यावरच वाहन ठेवतात. अख्ख्या बाजारातच हा प्रकार सुरू असून बाजारात वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. परिणामी जागोजागी ट्रॅफिक जाम होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  बाजारातील दुकानदार आपल्या दुकानातील सामान रस्त्यावर ठेवत असल्याने वाहनांना जागा उरत नसून ते रस्त्यावर येतात. अशात वाहतुकीची कोंडी होत असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो; मात्र आता यापुढे कुणाचेही सामान रस्त्यावर असल्यास जप्त केले जाणार आहे. यासाठी पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून वाहतूक नियंत्रण शाखा व नगर परिषदेने मंगळवारपासून (दि.८) संयुक्तरित्या मोहीम राबविली. शहरातील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यात बाजारातील दुकानदार आपल्या दुकानातील सामान, बोर्ड, पुतळे आदी साहित्य दुकानांसमोर ठेवतात. यामध्ये तेवढी जागा नाहक व्यापली जात असून, वाहनांना ठेवायला जागा राहत नाही. अशात नागरिक दुकानात आले व त्यांना जागा न मिळाल्यास ते रस्त्यावरच वाहन ठेवतात. अख्ख्या बाजारातच हा प्रकार सुरू असून बाजारात वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. परिणामी जागोजागी ट्रॅफिक जाम होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबतच्या तक्रारी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यापर्यंत गेल्या असून त्यांनाही असाच अनुभव आला आहे. यावर त्यांनी मंगळवारी (दि.८) वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक दिनेश तायडे, शहर ठाणेदार महेश बनसोडे, नगर परिषद बांधकाम विभागाचे अभियंता अनिल दाते, रवींद्र कावडे यांच्यासोबत बाजारात पाहणी करून रस्ते मोकळे करण्यासाठी मोहीम राबविण्याबाबत निर्देश दिले. त्यानुसार, मंगळवारी (दि.८) बाजारात मोहीम राबवून रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानदारांनी ठेवलेले सामान त्यांना उचलण्यास सांगितले. 

अन्यथा सामान केले जाणार जप्त 

- दुकानदारांकडून रस्त्यावर सामान ठेवणे हा नित्याचाच प्रकार झाला आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी अधिकाऱ्यांनी मोहीम राबविल्यानंतर काही दुकानदारांनी त्यांचे बोर्ड रस्त्यावर आणून ठेवल्याचे दिसले; मात्र आता ही मोहीम सातत्याने राबविली जाणार असून कुणाचेही सामान रस्त्यावर दिसून आल्यास मात्र काहीही न सांगता ते जप्त केले जाणार आहे. यामुळे आता दुकानदारांनी रस्त्यावर सामान ठेवणे त्यांच्यासाठीच नुकसानीचे ठरणार आहे. 

बाजारातील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. अशात दुकानदार त्यावर सामान ठेवत असल्याने वाहतुकीला अडचण होते; मात्र आता दुकानदारांनी रस्त्यावर सामान न ठेवता सहकार्य करावे. अन्यथा त्यांचे सामान जप्त केले जाणार. - दिनेश तायडेनिरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा 

दुकानदारांकडून रस्त्यावर सामान ठेवले जात असल्याने वाहनचालकांना जागा मिळत नाही व ते रस्त्यावर वाहन ठेवतात. यामुळे वाहतुकीला अडचण होते व नागरिकांना त्रास होतो; मात्र आता दुकानदारांनी रस्त्यावर सामान ठेवू नये. - करण चव्हाण मुख्याधिकारी, नगर परिषद

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण