शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

यापुढे रस्त्यांवर कुणाचेही सामान नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 05:00 IST

शहरातील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यात बाजारातील दुकानदार आपल्या दुकानातील सामान, बोर्ड, पुतळे आदी साहित्य दुकानांसमोर ठेवतात. यामध्ये तेवढी जागा नाहक व्यापली जात असून, वाहनांना ठेवायला जागा राहत नाही. अशात नागरिक दुकानात आले व त्यांना जागा न मिळाल्यास ते रस्त्यावरच वाहन ठेवतात. अख्ख्या बाजारातच हा प्रकार सुरू असून बाजारात वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. परिणामी जागोजागी ट्रॅफिक जाम होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  बाजारातील दुकानदार आपल्या दुकानातील सामान रस्त्यावर ठेवत असल्याने वाहनांना जागा उरत नसून ते रस्त्यावर येतात. अशात वाहतुकीची कोंडी होत असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो; मात्र आता यापुढे कुणाचेही सामान रस्त्यावर असल्यास जप्त केले जाणार आहे. यासाठी पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून वाहतूक नियंत्रण शाखा व नगर परिषदेने मंगळवारपासून (दि.८) संयुक्तरित्या मोहीम राबविली. शहरातील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यात बाजारातील दुकानदार आपल्या दुकानातील सामान, बोर्ड, पुतळे आदी साहित्य दुकानांसमोर ठेवतात. यामध्ये तेवढी जागा नाहक व्यापली जात असून, वाहनांना ठेवायला जागा राहत नाही. अशात नागरिक दुकानात आले व त्यांना जागा न मिळाल्यास ते रस्त्यावरच वाहन ठेवतात. अख्ख्या बाजारातच हा प्रकार सुरू असून बाजारात वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. परिणामी जागोजागी ट्रॅफिक जाम होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबतच्या तक्रारी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यापर्यंत गेल्या असून त्यांनाही असाच अनुभव आला आहे. यावर त्यांनी मंगळवारी (दि.८) वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक दिनेश तायडे, शहर ठाणेदार महेश बनसोडे, नगर परिषद बांधकाम विभागाचे अभियंता अनिल दाते, रवींद्र कावडे यांच्यासोबत बाजारात पाहणी करून रस्ते मोकळे करण्यासाठी मोहीम राबविण्याबाबत निर्देश दिले. त्यानुसार, मंगळवारी (दि.८) बाजारात मोहीम राबवून रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानदारांनी ठेवलेले सामान त्यांना उचलण्यास सांगितले. 

अन्यथा सामान केले जाणार जप्त 

- दुकानदारांकडून रस्त्यावर सामान ठेवणे हा नित्याचाच प्रकार झाला आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी अधिकाऱ्यांनी मोहीम राबविल्यानंतर काही दुकानदारांनी त्यांचे बोर्ड रस्त्यावर आणून ठेवल्याचे दिसले; मात्र आता ही मोहीम सातत्याने राबविली जाणार असून कुणाचेही सामान रस्त्यावर दिसून आल्यास मात्र काहीही न सांगता ते जप्त केले जाणार आहे. यामुळे आता दुकानदारांनी रस्त्यावर सामान ठेवणे त्यांच्यासाठीच नुकसानीचे ठरणार आहे. 

बाजारातील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. अशात दुकानदार त्यावर सामान ठेवत असल्याने वाहतुकीला अडचण होते; मात्र आता दुकानदारांनी रस्त्यावर सामान न ठेवता सहकार्य करावे. अन्यथा त्यांचे सामान जप्त केले जाणार. - दिनेश तायडेनिरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा 

दुकानदारांकडून रस्त्यावर सामान ठेवले जात असल्याने वाहनचालकांना जागा मिळत नाही व ते रस्त्यावर वाहन ठेवतात. यामुळे वाहतुकीला अडचण होते व नागरिकांना त्रास होतो; मात्र आता दुकानदारांनी रस्त्यावर सामान ठेवू नये. - करण चव्हाण मुख्याधिकारी, नगर परिषद

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण