शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

एक लाख हेक्टरमधील धानपिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:23 IST

मागील वीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील एक लाख हेक्टरमधील धानपिके धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती : धरणांमध्ये मोजकाच पाणीसाठा धरणातील पाणीसाठाइटियाडोह - २९.३ टक्केशिरपूर- ३.५३ टक्केपूजारीटोला - १.६८ टक्केकालीसराड- ५.७४ टक्केसंजयसरोवर- २२.७९ टक्केगोसेखुर्द -१९.७८ टक्केधापेवाडा- २१.३८ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील एक लाख हेक्टरमधील धानपिके धोक्यात आली आहे. पावसाअभावी धान वाळत चालल्याने ती वाचविण्यासाठी शेतकºयांची केविलवाणी धडपड सुरू असल्याचे बिकट चित्र जिल्ह्यात आहे.खरीपात जिल्ह्यात एकूण १ लाख ७८ हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाते. त्यात सर्वाधिक धानाची १ लाख हेक्टरवर लागवड केली जाते. यंदा सुरूवातीपासूनच पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकºयांनी सुध्दा सावध भूमिका घेत धानाचे पºहे टाकले.जुलै महिन्यात थोडा समाधानकारक पाऊस झाला. आॅगस्ट महिना संपत येत असताना अद्यापही दमदार पाऊस न झाल्याने पºहे करपत असल्याचे चित्र आहे. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांनी कसे बसे पºहे वाचवून रोवणी आटोपली. तर काहींनी जलाशयाचा पाण्याचा आधार घेत रोवणी केली. पण, सुरूवातीपासूनच जलाशयाचे पाणी वापरले तर पुढे काय असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.जिल्ह्यात गेल्या वीस वर्षांत प्रथमच अशी दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने बळीराजा चिंतातूर आहे. पाऊस लांबल्याने रोवण्या खोळंबल्या असून त्याचा उत्पादनावर परिणामी होण्याची शक्यता आहे. येत्या चार पाच दिवसांत पाऊस न झाल्यास १ लाख हेक्टरमधील धानपिके धोक्यात येण्याची शक्यता आहे.धरणामध्ये १० ते १५ टक्के पाणीजिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यावर बºयाच प्रमाणात शेती अवलंबून आहे. शिवाय यावरच भूजल पातळी अवलंबून असते. मात्र जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये सुध्दा १० ते १५ टक्केच पाणीसाठा असल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईची बिकट समस्या निर्माण होण्याची शक्यता आहेकेवळ ५८ टक्केच पाऊस१ जून ते २१ आॅगस्टदरम्यान जिल्ह्यात सरासरी १३४९ मि.मी.पाऊस पडतो. मात्र यंदा या कालावधी केवळ ५६० मि.मी.पावसाची नोंद झाली असून केवळ ५८ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील पावसाची सरासरी उणे आहे.दोन जिल्हे कोरडेचदोन दिवसांपूर्वी विदर्भात गोंदिया व भंडारा जिल्हा वगळता सर्वत्र दमदार पाऊस झाला. मात्र हे दोन्ही जिल्हे अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आॅगस्ट महिना पूर्णपणे कोरडा गेल्यास जिल्हा पिकांची बिकट परिस्थिती निर्माण होण्याची नाकारता येत नाही.कृषी विभागाने वर्तविली शक्यताआॅगस्ट महिना संपत येत असताना जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने केलेली रोवणी संकटात आली आहे. तर पºहे देखील वाळत चालली आहे. दमदार पाऊस न झाल्यास जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. त्यासंबंधीचा अहवाल कृषी आयुक्त आणि शासनाकडे पाठविला आहे.