शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

एक लाख हेक्टरमधील धानपिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:23 IST

मागील वीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील एक लाख हेक्टरमधील धानपिके धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती : धरणांमध्ये मोजकाच पाणीसाठा धरणातील पाणीसाठाइटियाडोह - २९.३ टक्केशिरपूर- ३.५३ टक्केपूजारीटोला - १.६८ टक्केकालीसराड- ५.७४ टक्केसंजयसरोवर- २२.७९ टक्केगोसेखुर्द -१९.७८ टक्केधापेवाडा- २१.३८ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील एक लाख हेक्टरमधील धानपिके धोक्यात आली आहे. पावसाअभावी धान वाळत चालल्याने ती वाचविण्यासाठी शेतकºयांची केविलवाणी धडपड सुरू असल्याचे बिकट चित्र जिल्ह्यात आहे.खरीपात जिल्ह्यात एकूण १ लाख ७८ हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाते. त्यात सर्वाधिक धानाची १ लाख हेक्टरवर लागवड केली जाते. यंदा सुरूवातीपासूनच पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकºयांनी सुध्दा सावध भूमिका घेत धानाचे पºहे टाकले.जुलै महिन्यात थोडा समाधानकारक पाऊस झाला. आॅगस्ट महिना संपत येत असताना अद्यापही दमदार पाऊस न झाल्याने पºहे करपत असल्याचे चित्र आहे. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांनी कसे बसे पºहे वाचवून रोवणी आटोपली. तर काहींनी जलाशयाचा पाण्याचा आधार घेत रोवणी केली. पण, सुरूवातीपासूनच जलाशयाचे पाणी वापरले तर पुढे काय असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.जिल्ह्यात गेल्या वीस वर्षांत प्रथमच अशी दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने बळीराजा चिंतातूर आहे. पाऊस लांबल्याने रोवण्या खोळंबल्या असून त्याचा उत्पादनावर परिणामी होण्याची शक्यता आहे. येत्या चार पाच दिवसांत पाऊस न झाल्यास १ लाख हेक्टरमधील धानपिके धोक्यात येण्याची शक्यता आहे.धरणामध्ये १० ते १५ टक्के पाणीजिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यावर बºयाच प्रमाणात शेती अवलंबून आहे. शिवाय यावरच भूजल पातळी अवलंबून असते. मात्र जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये सुध्दा १० ते १५ टक्केच पाणीसाठा असल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईची बिकट समस्या निर्माण होण्याची शक्यता आहेकेवळ ५८ टक्केच पाऊस१ जून ते २१ आॅगस्टदरम्यान जिल्ह्यात सरासरी १३४९ मि.मी.पाऊस पडतो. मात्र यंदा या कालावधी केवळ ५६० मि.मी.पावसाची नोंद झाली असून केवळ ५८ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील पावसाची सरासरी उणे आहे.दोन जिल्हे कोरडेचदोन दिवसांपूर्वी विदर्भात गोंदिया व भंडारा जिल्हा वगळता सर्वत्र दमदार पाऊस झाला. मात्र हे दोन्ही जिल्हे अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आॅगस्ट महिना पूर्णपणे कोरडा गेल्यास जिल्हा पिकांची बिकट परिस्थिती निर्माण होण्याची नाकारता येत नाही.कृषी विभागाने वर्तविली शक्यताआॅगस्ट महिना संपत येत असताना जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने केलेली रोवणी संकटात आली आहे. तर पºहे देखील वाळत चालली आहे. दमदार पाऊस न झाल्यास जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. त्यासंबंधीचा अहवाल कृषी आयुक्त आणि शासनाकडे पाठविला आहे.