शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या निर्देशानंतरही अनेक ठिकाणी शाळा सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST

महाविद्यालय आणि अंगणवाड्या सुध्दा बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते.मात्र यानंतरही सोमवारी गोंदियासह, सालेकसा, देवरी,आमगावसह काही भागातील शाळा आणि महाविद्यालये सुरूच होती. त्यामुळे त्यांच्यापर्यंत शासनाचे आदेश पोहचले नाही का असा सवाल उपस्थित केला जात असून यावरुन पालकांमध्ये सुध्दा संभ्रमाचे वातावरण होते.

ठळक मुद्देशासन निर्देशाचा पडला विसर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देशात झपाट्याने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रातील सर्वच महापालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्या सुध्दा बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते.मात्र यानंतरही सोमवारी गोंदियासह, सालेकसा, देवरी,आमगावसह काही भागातील शाळा आणि महाविद्यालये सुरूच होती. त्यामुळे त्यांच्यापर्यंत शासनाचे आदेश पोहचले नाही का असा सवाल उपस्थित केला जात असून यावरुन पालकांमध्ये सुध्दा संभ्रमाचे वातावरण होते.कोरोनो आजाराला प्रतिबंध लावण्यासाठी आणि याचा प्रसार रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून विविध उपाय योजना केल्या जात आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने महानगरपालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश सर्व जिल्हा प्रशासनला दिले. तसेच यासंबंधिचे परिपत्रक सुध्दा काढले. मात्र यानंतरही सोमवारी (दि.१६) गोंदिया, देवरी,आमगाव आणि सालेकसा येथील अनेक शाळा आणि महाविद्यालय सुरू होती. तर काही शाळांमध्ये परीक्षा सुध्दा सुरू होत्या. दरम्यान काही पालकांना ही बाब खटकल्याने त्यांनी शाळा आणि महाविद्यालयात जावून याबाबत विचारणा केली तेव्हा मंगळवारपासून शाळा आणि महाविद्यालय बंद ठेऊ असे सांगितले.तर काही शाळेच्या व्यवस्थापनाने आमच्यापर्यंत आदेश पोहचले नसल्याचे सांगितले. दरम्यान पालकांनी आमच्या पाल्यांच्या आरोग्याची जवाबदारी कोण घेणार असा सवाल करीत याची जिल्ह्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली. याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आदेशाचे पालन न करणाºया शाळांवर कारवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आहे.ग्रामीण भागातील शाळा आजपासून बंद राहणारकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने पूर्वी केवळ महानगरपालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत क्षेत्रातील शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सोमवारी (दि.१६) ग्रामीण भागातीलही शाळा, महाविद्यालय,अंगणवाड्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहे. यासंबंधिचे आदेश सुध्दा सोमवारी काढण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा सुध्दा बंद ठेवण्यात याव्या ही पालकांची मागणी मार्गी लागली आहे.मंगळवारपासून (दि.१७) जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये सुध्दा आता बंद राहणार आहे.पाचवी ते नववीपर्यंतच्या परीक्षा सुध्दा ३१ मार्चनंतर घेण्यात येणार आहे.शासकीय कार्यालयांमध्ये उपाय योजना नाहीकोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र दक्षता बाळगण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र विविध कामासाठी नागरिकांची गर्दी होणाऱ्या शासकीय कार्यालयांमध्ये कसलीच उपाय योजना केली जात नव्हती. जि.प., पंचायत समिती कार्यालय, तहसील कार्यालय, प्रशासकीय, बस स्थानक, बँक कार्यालयात मास्क वापरण्याचा अभाव दिसून आला. तर काही कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्वत:च मास्क खरेदी करुन लावले होते.

टॅग्स :corona virusकोरोना