शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
5
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
6
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
7
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
8
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
9
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
10
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
11
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
12
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
13
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
14
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
15
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
16
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
17
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
18
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
19
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
20
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले

प्रशासनाच्या निर्देशानंतरही अनेक ठिकाणी शाळा सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST

महाविद्यालय आणि अंगणवाड्या सुध्दा बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते.मात्र यानंतरही सोमवारी गोंदियासह, सालेकसा, देवरी,आमगावसह काही भागातील शाळा आणि महाविद्यालये सुरूच होती. त्यामुळे त्यांच्यापर्यंत शासनाचे आदेश पोहचले नाही का असा सवाल उपस्थित केला जात असून यावरुन पालकांमध्ये सुध्दा संभ्रमाचे वातावरण होते.

ठळक मुद्देशासन निर्देशाचा पडला विसर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देशात झपाट्याने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रातील सर्वच महापालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्या सुध्दा बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते.मात्र यानंतरही सोमवारी गोंदियासह, सालेकसा, देवरी,आमगावसह काही भागातील शाळा आणि महाविद्यालये सुरूच होती. त्यामुळे त्यांच्यापर्यंत शासनाचे आदेश पोहचले नाही का असा सवाल उपस्थित केला जात असून यावरुन पालकांमध्ये सुध्दा संभ्रमाचे वातावरण होते.कोरोनो आजाराला प्रतिबंध लावण्यासाठी आणि याचा प्रसार रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून विविध उपाय योजना केल्या जात आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने महानगरपालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश सर्व जिल्हा प्रशासनला दिले. तसेच यासंबंधिचे परिपत्रक सुध्दा काढले. मात्र यानंतरही सोमवारी (दि.१६) गोंदिया, देवरी,आमगाव आणि सालेकसा येथील अनेक शाळा आणि महाविद्यालय सुरू होती. तर काही शाळांमध्ये परीक्षा सुध्दा सुरू होत्या. दरम्यान काही पालकांना ही बाब खटकल्याने त्यांनी शाळा आणि महाविद्यालयात जावून याबाबत विचारणा केली तेव्हा मंगळवारपासून शाळा आणि महाविद्यालय बंद ठेऊ असे सांगितले.तर काही शाळेच्या व्यवस्थापनाने आमच्यापर्यंत आदेश पोहचले नसल्याचे सांगितले. दरम्यान पालकांनी आमच्या पाल्यांच्या आरोग्याची जवाबदारी कोण घेणार असा सवाल करीत याची जिल्ह्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली. याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आदेशाचे पालन न करणाºया शाळांवर कारवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आहे.ग्रामीण भागातील शाळा आजपासून बंद राहणारकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने पूर्वी केवळ महानगरपालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत क्षेत्रातील शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सोमवारी (दि.१६) ग्रामीण भागातीलही शाळा, महाविद्यालय,अंगणवाड्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहे. यासंबंधिचे आदेश सुध्दा सोमवारी काढण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा सुध्दा बंद ठेवण्यात याव्या ही पालकांची मागणी मार्गी लागली आहे.मंगळवारपासून (दि.१७) जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये सुध्दा आता बंद राहणार आहे.पाचवी ते नववीपर्यंतच्या परीक्षा सुध्दा ३१ मार्चनंतर घेण्यात येणार आहे.शासकीय कार्यालयांमध्ये उपाय योजना नाहीकोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र दक्षता बाळगण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र विविध कामासाठी नागरिकांची गर्दी होणाऱ्या शासकीय कार्यालयांमध्ये कसलीच उपाय योजना केली जात नव्हती. जि.प., पंचायत समिती कार्यालय, तहसील कार्यालय, प्रशासकीय, बस स्थानक, बँक कार्यालयात मास्क वापरण्याचा अभाव दिसून आला. तर काही कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्वत:च मास्क खरेदी करुन लावले होते.

टॅग्स :corona virusकोरोना