शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
3
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
4
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
5
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
6
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
7
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
8
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
9
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
10
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
11
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
20
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तापमानात घट - उकाडा मात्र कायम

By admin | Updated: June 4, 2014 00:10 IST

२५ मे पासून सुरू असलेला नवतपा कसा तरी सरला असून यानंतर तापमानात घट झाली आहे. असे असतानाही मात्र उकाडा अद्याप कायम असून जीव आताही कासावीस होत आहे. तापमानात घट झाली

गोंदिया : २५ मे पासून सुरू असलेला नवतपा कसा तरी सरला असून यानंतर तापमानात घट झाली आहे. असे असतानाही मात्र उकाडा अद्याप कायम असून जीव आताही कासावीस होत आहे. तापमानात घट झाली तरीही उन्हाची तीव्रता काही कमी होण्याचे नाव घेत नसल्याने नागरिक त्रस्त झाले असून  उकाड्यापासून मुक्तता मिळावी यासाठी नागरिक आता पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. यंदाच्या उन्हाळ्य़ात मार्च व एप्रिल महिन्यात थोडी फार पावसाची रिमझिम झाली. यामुळे काही दिवस तापमान कमी जाणवले मात्र त्यानंतर रविराज चांगलेच तापले व आता काही शांत होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळेच जिल्ह्याचा पार ४२ ते ४३ डिग्रीच्या घरात गेला होता. एवढय़ा तापमानात जीव कासावीस होऊ लागल्याने सर्वांनाच एक-एक दिवस जड होऊ लागला. त्यात उन्हाळ्याचा खरा महिना म्हणजे मे महिना असतो. मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच सूर्यदेवाने आपला कोप दाखविला. त्यात महिन्याच्या शेवटी २५ मे पासून नवतपा सुरू झाला व तापमानाने हद करून टाकली. यंदाच्या नवतपात तर जिल्ह्यातील तापमानाचा पारा चांगलाच वर चढला. ४५ डिग्रीच्या घरात गेलेल्या तापमानाने जिल्हावासी होरपळून गेले होते. उन्हाला बघता शहरात अघोषित संचारबंदीसदृश स्थिती दुपारच्या वेळी बघावयास मिळत होती. नवतपाचे नऊ दिवस अशा प्रकारेच चांगले तापले व उष्णतेची लाटच अवघ्या विदर्भात पसरल्याचे दिसून येऊ लागले. आता नवतपा संपला असून त्यानुसार सूर्यदेवाचा कोपसुद्धा काही प्रमाणात कमी झाल्याचे बघावयास मिळत आहे. नवतपा संपताच उष्णतेची लाट कमी झाल्याचे दिसून येत असून त्यामुळे तापमानातही घट झाली आहे. नवतपात रात्रीच्या वेळी अंगाला चटके लागायचे व उष्ण वारे वाहत असल्याचा अनुभव यंदा मिळाला. मात्र नवतपा सरताच वातावरण बदलले. रात्रीला थोड्या फार प्रमाणात थंड वारे वाहत आहेत. असे असताना मात्र दिवस तसाच कठीण जात आहे. तापमानात घट झाली असली तरीही उकाडा काही कमी झालेला नाही. यामुळे नागरिकांची पंचाईत अद्याप संपलेली नाही. उन्हाचे चटके आजही लागत असल्याने घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. कित्येक तर दिवसा बाहेर निघणे टाळत आहेत. यामुळे दुपारच्या वेळी  अघोषित संचारबंदी दिसून येते. सायंकाळी कसे तरी नागरिक आपले दिवसभराचे काम आटोपायला निघतात. आता लोकांची सहनशीलता संपली असून कधी पाऊस पडतो व या उकाड्यापासून मुक्तता मिळते याची वाट सर्वच बघत आहेत.  (शहर प्रतिनिधी)