शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल प्रकरणात कारवाई थंडबस्त्यात

By admin | Updated: November 16, 2014 22:51 IST

येथील वार्ड क्र.३ मध्ये घरकूल प्रकरणाची आठ महिन्यांपूर्वी चौकशी होऊन दोषी आढळल्यानंतरही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एका पंचायत समिती

पं.स. सदस्याचे दडपण : बीडीओंकडून सारवासारवअर्जुनी/मोरगाव : येथील वार्ड क्र.३ मध्ये घरकूल प्रकरणाची आठ महिन्यांपूर्वी चौकशी होऊन दोषी आढळल्यानंतरही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एका पंचायत समिती सदस्याच्या दडपणामुळे खंडविकास अधिकाऱ्यांनी कारवाई थंडबस्त्यात ठेवल्याचा आरोप रवि व्यंकटय्या कुदरुपाका यांनी केला आहे.प्राप्त माहितीनुसार, अर्जुनी/मोरगाव येथील वॉर्ड क्र.४ चे रहिवासी अरविंद मार्कंड बोरकर यांना २०१२ -१३ या वर्षात घरकूल मंजूर झाले. घरकुल मंजुरीचे वेळी लाभार्थ्याने वॉर्ड क्र. ४ येथील स्वत:च्या मालकीच्या वर्णनाचा ग्रामविकास अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेला नमूना ८ जोडला. मात्र वॉर्ड क्र. ४ येथील स्वत:च्या मालकीच्या जागेत घरकुलाचे बांधकाम न करता वॉर्ड क्र. ३ (बरडटोली) येथील शासकीय जागेवर बांधकाम केले.बांधकामासाठी लागणारे साहित्य व मजुरीची रक्कम अदा करण्यासाठी लाभार्थ्यांने पं.स.कडे अनुदानाची मागणी केली. सरपंच व ग्राम सचिवाने सहमती दर्शविल्यामुळे लाभार्थ्याला धनादेश क्रमांक ४२२३२ नुसार ३१ जुलै २०१३ रोजी २५ हजार रुपयांचे प्रथम अग्रीम अदा करण्यात आले. ग्रा.पं.चे ग्राम विकास अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांच्या घरकूल बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली. फाऊंडेशन पर्यंत बांधकाम झाल्याचे प्रमाणपत्र ३ जुलै २०१३ रोजी दिले. या आधारावर पं.स. ने धनादेश क्रमांक ४२३३० नुसार आणखी २५ हजारांचे दुसरे अग्रीम २३ आॅगस्ट २०१३ रोजी लाभार्थ्याला दिले.बरडटोली येथील रहिवासी रवि कुदरुपाका यांनी लाभार्थी व ग्राम विकास अधिकाऱ्यांनी शासनाची दिशाभूल केल्यामुळे त्यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची लेखी तक्रार संबंधित विभागाचे अधिकारी व पोलीसांकडे केली. या आधारावर खंड विकास अधिकाऱ्यांनी कनिष्ठ अभियंता टी.पी. कचरे व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आर.एम. इंगळे यांना मौका तपासणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. १९ एप्रिल रोजी अहवाल सादर करण्यात आला. यात लाभार्थी व ग्राम विकास अधिकाऱ्यांना प्रथमदर्शनी दोषी ठरविण्यात आले. २२ एप्रिल रोजी सचिव ग्रा.पं. अर्जुनी/मोरगाव यांना स्पष्टीकरण विचारण्यात आले. त्यांनी १४ मे रोजी स्पष्टीकरण सादर केले. यात लाभार्थ्यांने ज्या ठिकाणी घरकुल बांधकाम करायला पाहिजे होते त्या ठिकाणी केले नाही. त्यांनी दिशाभूल केल्याने पोलीसात तक्रार नोंद करण्याचे कळविले.लाभार्थ्याला यापुढील धनादेश देण्यात येऊ नये असे ग्रा.पं.ने पंचायत समितीला कळविले. त्यानुसार लाभार्थ्याची पुढील देयके अडविण्यात आली. मात्र एक पंचायत समिती सदस्य ही देयके काढून घेण्यासाठी संबंधित यंत्रणेवर दडपण आणत आहे. प्रकरणी वरिष्ठांकडे अहवाल पाठविला आहे. त्याचा अभिप्राय झाल्यानंतर कारवाई करू असे खंड विकास अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांनी संबंधितांविरुद्ध शासकीय नियमाप्रमाणे प्रशासकीय कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश १७ सप्टेंबर रोजी खंड विकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. याला दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही यासंदर्भात कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यात कुठेतरी पाणी मुरत असल्याचा आरोप कुदरुपाका यांनी केला आहे. वरिष्ठांनी याप्रकरणी दखल घेण्याची मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)