शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
5
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
6
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
7
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
8
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
9
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
10
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
11
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
12
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
13
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
14
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
15
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
16
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
17
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
18
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
19
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
20
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मीठ खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीत काही किराणा व्यावसायीकांनी अव्वाच्या सव्वा दराने वस्तूंची विक्री करुन चांदी करुन घेतली. त्यानंतर आता मिठाची टंचाई निर्माण होणार आहे, त्यामुळे मीठ मिळणार नाही अशी अफवा ग्रामीण भागात पसविण्यात आली. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून खरोखरच मीठ मिळणार नाही म्हणून मिठाचे पुडे आणि पोती नागरिक खरेदी करुन ठेवीत आहे.

ठळक मुद्देटंचाईची अफवा : ग्रामीण भागात विक्रमी विक्री, अफवांवर विश्वास ठेवू नका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लॉकडाऊमुळे मिठाची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होणार असल्याची अफवा जिल्ह्यातील ग्रामीण फसरविण्यात आली. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून ग्रामीण भागातील नागरिक मिठाची खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी करीत आहे. त्यामुळे मागील दोन दिवसात दुकानांमधून विक्रमी मिठाची विक्री झाली आहे.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीत काही किराणा व्यावसायीकांनी अव्वाच्या सव्वा दराने वस्तूंची विक्री करुन चांदी करुन घेतली. त्यानंतर आता मिठाची टंचाई निर्माण होणार आहे, त्यामुळे मीठ मिळणार नाही अशी अफवा ग्रामीण भागात पसविण्यात आली. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून खरोखरच मीठ मिळणार नाही म्हणून मिठाचे पुडे आणि पोती नागरिक खरेदी करुन ठेवीत आहे.देवरी तालुक्यातील ककोडी सारख्या दुर्गम भागात तर १० रुपयांचा मिठाचा पुडा ३० रुपयांना विक्री केला जात आहे. तर १६० रुपयांना मिळणारी ठोकळ मिठाची पोती ३०० रुपयांना विक्री केली जात आहे. हाच प्रकार मंगळवारी सडक अर्जुनी तालुक्यात दिवसभर पाहयला मिळायला. डव्वा, म्हसवानी परिसरातील नागरिकांनी मिठाची खरेदी करण्यासाठी किराणा दुकानांमध्ये गर्दी केली होती.अर्जुनी मोरगाव आणि सालेकसा, देवरी तालुक्यात सुध्दा हे चित्र होते. नेहमी एक दोन मिठाचे पुडे खरेदी करणारे ग्राहक चक्क मिठाची चुंगडीच विकत घेवून जात होते. मिठाशिवाय जेवणाला सुध्दा चव येत नसल्याने स्वंयपाकातील महत्त्वपूर्ण घटक असल्याने अनेकांनी टंचाई निर्माण झाली तर काय करायचे या काळजीपोटी अनेकांनी मिठाची अतिरिक्त खरेदी करुन ठेवली होती. त्यामुळे किराणा दुकानादारांकडून सुध्दा मोठ्या प्रमाणात मिठाची मागणी केली जात आहे.दरम्यान काही सुज्ञ नागरिकांनी याची जिल्हाधिकारी आणि पुरवठा विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी सर्व तहसीलदारांना यासंदर्भात निर्देश देऊन नियंत्रण ठेवण्यास सांगितले. मिठाची टंचाई नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगितले.मिठाच्या स्टॉकची माहिती घेणारजिल्हा पुरवठा विभागाकडून आत्तापर्यंत जिल्ह्यात किती प्रमाणात मिठाचा साठा आहे. याची माहिती घेतली जात नव्हती. तशी वेळ कधीच आली नव्हती. मात्र मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मिठाच्या टंचाईच्या अफवेने प्रशासनाची सुध्दा झोप उडाली आहे. त्यामुळे आता मिठाच्या स्टॉकची माहिती घेतली जात आहे. मिठाची टंचाई निर्माण होण्याची कुठलीच शक्यता नसली तरी लोक अफवेला बळी पडून मोठ्या प्रमाणात मिठाची खरेदी करीत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात मिठाचा भरपूर साठा असून मिठाची टंचाई निर्माण होण्याचा प्रश्नच नाही. काही अज्ञात लोकांनी मिठाच्या टंचाईची अफवा फसरविल्याने ग्रामीण भागातील लोकांची दिशाभूल होत आहे. मात्र खोट्या अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच नागरिकांनी अशा खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये. मिठाची टंचाई निर्माण होण्याचा प्रश्नच नाही.- डी.एस.वानखेडेजिल्हा पुरवठा अधिकारी गोंदिया.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या