शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
7
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
8
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
9
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
10
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
11
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
12
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
13
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
14
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
15
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
17
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
18
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
19
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
20
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा

कॉँग्रेसचा भारत बंद आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:30 AM

देशातील जनतेला भरमसाठ खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपच्या हुकुमशाही राजवटीमुळे देशाची आर्थिक स्थिती पूर्णत: ढासळली आहे. जगाचा पोशिंदा ...

देशातील जनतेला भरमसाठ खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपच्या हुकुमशाही राजवटीमुळे देशाची आर्थिक स्थिती पूर्णत: ढासळली आहे. जगाचा पोशिंदा गेल्या ११ महिन्यांपासून दिल्लीत ठाण मांडून बसलेला आहे, तरीही या जुलमी सरकारला त्यांची कीव येत नाही. उलट त्यांचा क्रूर पध्दतीने छळ केला जात आहे. केंद्रातील मोदी सरकारने या देशातील सर्व सरकारी यंत्रणा ताब्यात घेऊन देश बर्बाद करण्याचा घाट घातला आहे. देशातील सर्व सार्वजनिक उपक्रम जसे रेल्वे, बँका, विमानसेवा, रस्ते, विमा कंपन्या, सार्वजनिक उद्योग, दूरसंचार आणि बंदरे अशी एक - एक करुन विकत आहे. अदानीच्या मालकीच्या गुजरातमधील मुंद्रा बंदरातून २१ हजार कोटींच्या ड्रग्जची तस्करी सापडली आहे. तरुणांना दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देऊ, असे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारने असलेल्याही नोकऱ्या संपुष्टात आणल्या आहेत. या अशा मार्गाने देशातल्या तरुणांना बेरोजगार करुन त्यांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न मोदींच्या कटकारस्थानी सरकारकडून सातत्याने सुरु आहेत. भाजप सरकारविरोधात देशातील सर्व शेतकरी संघटना व डाव्या आघाड्यांनी तीव्र आवाज उठवला असून, सोमवारी (दि. २७) भारत बंदचे आवाहन केले आहे. या भारत बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. एन. डी. किरसान, आमदार सहेसराम कोरोटे, प्रदेश सचिव अमर वराडे व पी. जी. कटरे, माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी केले आहे.