शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतेय नुकसान भरपाई, तुम्हाला मदत मिळाली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 17:12 IST

१० हजार ६७४ हेक्टरमधील पिके झाली होती बाधित : ४० हजार शेतकऱ्यांना बसला होता फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सन २०२४ मध्ये सप्टेबर व ऑक्टोबर झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने अनुदान मंजूर केले आहे. यासाठीचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्तसुद्धा झाला आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जात आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची रक्कम बँक खात्यावर जमा झाली का याची पडताळणी करून घ्यावी. 

गोंदिया जिल्ह्यात सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात धान इतर पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे कृषी व महसूल विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून पंचनामे करून अहवाल तयार करण्यात आला होता. तो अहवाल शासनाला पाठविण्यात आला. त्यात अतिवृष्टीमुळे १० हजार ६७४ हेक्टरमधील पिके बाधित झाल्याने २६ कोटी २९ लाख २७ हजार रुपयांचे नुकसान झाले होते. तर यामुळे जिल्ह्यातील २७ हजार शेतकरी बाधित झाले होते. यानंतर ऑक्टोबर महिन्यातसुद्धा पिकांचे नुकसान झाल्याने १३ हजार शेतकरी बाधित झाले होते. तर ८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यासाठीसुद्धा जिल्हा प्रशासनाने शासनाकडे निधीची मागणी केली होती. यानंतर शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्याने मदतीची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा झाली नव्हती. ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांनी आपले बँक खाते तपासून घेऊन रक्कम जमा झाली का याची पडताळणी करावी.

केवायसी नाही, मग अनुदान नाहीगोंदिया जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही केवायसी केली नसल्यामुळे त्यांचे नुकसानीचे अनुदान लटकले आहे. केवायसी केल्याशिवाय संबंधित शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त होणार नाही. त्यामुळे वेळेमध्ये ही प्रक्रिया करून घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी सेतु, सीएससी किंवा महा ई-सेवा केंद्र या ठिकाणी आपली केवायसी करून घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरीfarmingशेती