शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

धान उत्पादकांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा होण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 5:00 AM

गोंदिया जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र दिवसेंदिवस धानाच्या एकरी लागवड खर्चात मोठी वाढ होत आहे. त्यातुलनेत धानाला मिळणारा हमीभाव हा फारच अल्प असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी धानाची शेती म्हणजे तोट्याचा सौदा होत चालली होती. याचीच दखल घेत खा. पटेल यांनी धानाला प्रती क्विंटल दोन हजार ५०० रु पये हमीभाव देण्याची मागणी केली होती.

ठळक मुद्दे२१४.८१ कोटींचा निधी प्राप्त : प्रफुल्ल पटेल यांच्या चर्चेनंतर मार्ग मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य सरकारने पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना ५०० बोनस आणि हिवाळी अधिवेशन दरम्यान धानाला प्रती क्विंटल २०० रु पयांची दरवाढ जाहीर केली होती. ‘लॉकडाऊन’मुळे सध्या शेतकरी अडचणीत असून त्यांना बोनसची रक्कम त्वरीत मिळावी यासाठी २ दिवसांपूर्वी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करु न बोनसची रक्कम त्वरीत जमा करण्याची मागणी केली होती. याचीच दखल राज्य सरकारने गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसचे वाटप करण्यासाठी एकूण २१४ कोटी ८१ लाख रु पयांची रक्कम दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे वळती केली आहे.गोंदिया जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र दिवसेंदिवस धानाच्या एकरी लागवड खर्चात मोठी वाढ होत आहे. त्यातुलनेत धानाला मिळणारा हमीभाव हा फारच अल्प असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी धानाची शेती म्हणजे तोट्याचा सौदा होत चालली होती. याचीच दखल घेत खा. पटेल यांनी धानाला प्रती क्विंटल दोन हजार ५०० रु पये हमीभाव देण्याची मागणी केली होती.राज्य सरकारने खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्र ी करणाºया शेतकऱ्यांना प्रती क्विंटल एक हजार ८३५ रु पये हमीभाव जाहीर केला होता. तर खासदार पटेल यांच्या निवेदनाची दखल घेत नागपूर येथील हिवाळी अधिवेशन दरम्यान धानाला प्रती क्विंटल ५०० रु पये बोनस आणि २०० रु पये भाववाढ जाहीर केली होती. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री करणाऱ्या  शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ७०० रु पये अतिरिक्त मिळाल्याने जवळपास दोन हजार ५३५ रु पये मिळण्यास मदत झाली.बोनससह एकूण ७०० रु पयांचा लाभ गोंदिया जिल्ह्यातील ९३ हजार शेतकऱ्यांना मिळणार असून यासाठी १९५ कोटी रु पयांची गरज होती. तर भंडारा जिल्ह्यासाठी जवळपास एवढ्याच रक्कमेची गरज होती. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला.‘लॉकडाऊन’मुळे शेतमालाला मागणी नसल्याने शेतकयांची आर्थिक कोंडी झाली होती. याचीच दखल घेत खा. पटेल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्र व्यवहार आणि फोनवरु न चर्चा करु न बोनसचा निधी त्वरीत देण्याची मागणी केली होती. त्याचीच दखल घेत दोन्ही जिल्ह्यांना हा निधी उपलब्ध करु न देण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील २ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ‘लॉकडाऊन’च्या काळात दिलासा मिळाला असून त्यांनी खा.पटेल यांचे आभार मानले आहे.१०१ कोटी रु पयांचा निधी शेतकºयांच्या खात्यावर वळतागोंदिया जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्र ी करणाऱ्या एकूण ९३ हजार शेतकऱ्यांना बोनसचा लाभ मिळणार असून यासाठी १९५ कोटी रु पयांची गरज होती. यापैकी पहिल्या टप्प्यात शासनाने ११३ कोटी रु पयांचा निधी प्राप्त करु न दिला आहे. तर यापैकी १०१ कोटी ८१ लाख रु पयांचा निधी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्यात आला आहे.‘लॉकडाऊन’च्या काळात धान उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होवू नये, तसेच बोनसची रक्कम त्वरीत मिळावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्याचीच दखल घेत राज्य सरकारने दोन्ही जिल्ह्यांसाठी २१४ कोटी ८१ लाख रु पयांचा निधी उपलब्ध करु न देत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.- प्रफुल्ल पटेल, खासदार.

टॅग्स :Farmerशेतकरीprafull patelप्रफुल्ल पटेल