सशस्त्र सुरक्षा गार्डच नाही : रिझर्व्ह बँकेच्या नियमांची ऐसीतैसीसुशील जैन - देवरीराष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आणि नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून गणल्या जाणाऱ्या देवरीतील राष्ट्रीयकृत आणि इतर बँकांमध्ये सशस्त्र सुरक्षा रक्षकच नाहीत. त्यामुळे या बँकांच्या आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत या बँकांमधील हजारो खातेदारांची ठेवही किती सुरक्षित आहे, असा प्रश्न कोणालाही पडल्याशिवाय राहात नाही.एकाही बँकेत बंदुकधारी सुरक्षा गार्ड दिसून येत नाही. भारतीय रिझर्व बँकेद्वारे सर्वच बँकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक खबरदाऱ्या घेण्याचे निर्देश असतानाही देवरीत मात्र कोणत्याच बँकेकडून त्यांचे पालन होताना दिजसत नाही. तालुक्यातील सर्वच राष्ट्रीयकृत तसेच खासगी व सहकारी बँका सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत आहेत. मागील काही वर्षापासून तालुक्यात राष्ट्रीकृत व खासगी बँकांची झपाट्याने वाढ होत आहे. बँकेमध्ये खाते उघडण्याकरिता बँक प्रशासन ग्राहकांकडे विनवणी करीत आहे. की त्यामुळे बँकेचे टर्नओव्हर आरबीआईच्या नियमानुसार चालन राहील. जरी बँकेमधील देवाणघेवाणीची प्रक्रिया ग्राहकांसाठी सुलभ असली तरी तालुक्यातील सर्वच बँकेत ग्राहकांचे जमा असलेले करोडो रुपयांच्ळा सुरक्षेकरिता कोणतीच उचित व्यवस्था दिसून येत नाही. राष्ट्रीय बँकासोबतच खासगी बँकेच्या शाखा तालुक्यात सर्वत्र सुरू आहेत. या सर्वच बँका जरी आधुनिक कार्यपद्धतीनुसार चालत असल्या तरीपण सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना क्रीयान्वित नाही.स्थिती ही आहे की, शहरातील सर्वच बँकांचे संचालन सुरक्षा गार्डावीनाच होताना पहायला मिळत आहे. या बँकांमध्ये सरकारी विभागासहीत ग्राहकांच्या करोडो रुपयांची देवाण-घेवाण होत असते. बँक प्रशासन ग्राहकांच्या सुविधायुक्त देवाण-घेवाणीपर्यंतच सीमित आहे. जेव्हा की रिझर्व्ह बँकेने प्रत्येक छोट्या मोठ्या बँकांच्या शाखांना सुरक्षा संबंधी सतर्क राहण्याचे कडक निर्देश दिले आहेत. परंतु रिझर्व बँकेच्या नियमांचे पालन करताना कोणतीही बँक दिसत नाही. यामुळे ग्राहकांना आपल्या जमापूर्तिची नेहमीच काळजी लागलेली असते. उच्चतंत्रज्ञानांतर्गत कम्प्युटरद्वारा संचालित एटीएम शहरातील स्टेट बँक व बँक आॅफ महाराष्ट्र येथे कार्यरत आहे. परंतु तिथे सुद्धा सुरक्षा गार्ड दिसून येत नाही. बँक व्यवस्थापकांना सुरक्षा गार्डाविषयी विचारले असता ते सीसी टिव्ही असल्याचे सांगून पळ काढतात. परंतु सीसी टिव्ही कॅमेरे एखाद्या घटनेला थांबविण्याकरिता किती सक्षम आहेत? हे सांगण्याची गरज नाही. नॅशनल हायवेवर असलेल्या देवरी शहरात केव्हाही बँकेत मोठी अप्रीय घटना घडू शकते यात शंका नाही.
बँकांची सुरक्षा धोक्यात!
By admin | Updated: December 20, 2014 22:41 IST