‘संतुलित जीवनपद्वती’ने हृदयरोग टाळा

By Admin | Updated: September 24, 2015 02:09 IST2015-09-24T02:09:55+5:302015-09-24T02:09:55+5:30

मानवी शरीरात मेंदू व हृदय ही दोन सर्वात महत्त्वाचे अंगं आहेत. मेंदूची संवेदना व हृदयाची धडधड बंद पडल्यावरच माणसाचा मृत्यू होते. हृदयात सर्व रक्तवाहिन्या मिळतात.

Avoid heart disease by 'balanced life' | ‘संतुलित जीवनपद्वती’ने हृदयरोग टाळा

‘संतुलित जीवनपद्वती’ने हृदयरोग टाळा

आज हृदयरोग जागरुकता दिन : व्यसनांमुळे युवावर्गातही वाढतेय प्रमाण, जिल्ह्यात तज्ज्ञांचा अभाव
देवानंद शहारे  गोंदिया
मानवी शरीरात मेंदू व हृदय ही दोन सर्वात महत्त्वाचे अंगं आहेत. मेंदूची संवेदना व हृदयाची धडधड बंद पडल्यावरच माणसाचा मृत्यू होते. हृदयात सर्व रक्तवाहिन्या मिळतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सांभाळणे आरोग्यदायी जीवनासाठी आवश्यक असते. मात्र आज झालेली असंतुलित जीवनपद्धती हृदयरोगास कारणीभूत ठरत असून युवावर्गही हृदयरोगाला बळी पडत आहे. त्यामुळे संतुलित जीवनपद्धती हाच यावरील ‘रामबाण’ उपाय आहे, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले. हृदयरोग जागरूकता दिनाच्या पार्श्वभूमीवर केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ.प्रगती भोळे यांनी यावर सविस्तर माहिती सांगितली. आपण जसजसे मोठे होत जातो, शरीराच्या वेगवेगळ्या भागातल्या रक्तवाहिन्यांमध्ये आतून कोलेस्टेरॉलचे थरसाठी वाढतात. त्यात कोरोनरी आर्टरीचा (रक्तवाहिनी) देखील समावेश असतो. त्याचा परिणाम रक्त पुरवठ्यावर होतो. त्यामुळे हृदयघात होण्याची शक्यता असते. हृदयरोगाचे वेगवेगळे प्रकार आहेत. पूर्वीच्या काळात ४० वर्षे वयानंतर माणसाला हृदयरोग झाल्याचे आढळत होते. परंतु आधुनिक काळात जीवनशैली व आहार-विहारात झालेला बदल, तसेच शारीरिक श्रमाच्या कमतरतेमुळे व वाढलेल्या व्यवसानिधतेमुळे ३० ते ३५ वयोगटातील युवावर्गातही हृदयरोगाचे प्रमाण आढळून येत आहे. उच्च रक्तदाब व मधुमेहाच्या रूग्णांना हृदयरोगाचा अधिक धोका असतो.
आधुनिक वैद्यकीय पद्धतीत अँजिओग्रॉफी व अँजिओप्लॉस्टीद्वारे हृदयरोगाचे निदान व उपचार केले जाते. हृदयातील धमन्या किंवा वाहिन्यांमध्ये कुठे ब्लॉक असेल तर याचे निदान अँजिओग्रॉफीद्वारे होते. त्यात असलेली समस्या दूर करण्यासाठी अँजिओप्लास्टी केली जाते. मात्र हे ठरविण्याचे अधिकार केवळ तज्ज्ञांना असतात. याशिवाय इतर बाबी न करता सरळ प्रायमरी अँजिओप्लॉस्टीसुद्धा केली जाते, असे डॉ. भोळे यांनी सांगितले.

हृदयरोगाची कारणे
धूम्रपान करणे, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, उच्च कोलेस्टेरॉल, कमी एचडीएल व वाढीव कोलेस्टेरॉल, शारीरिक श्रमाची कमतरता, आनुवंशिकता, तणाव, रागीटपणा व चिंता, तसेच वंशानुगत मुद्द्यांचा समावेश हृदयरोगाच्या कारणांमध्ये आहे. याशिवय तंबाखूचे सेवन, धुम्रपाण करणे, अधिक प्रमाणात तळलेले व स्रिग्ध पदार्थ खाणे, सिडेंटरी (बैठ्या जागेवरील काम), लठ्ठपणा आदी बाबी हृदयरोगासाठी कारणीभूत असतात.
हृदयरोगाची लक्षणे
१. छाती दुखणे. २. दम लागणे. ३. चालताना लवकरच दम भरणे. ४. पायांवर सुज येणे (पुढील पायरी). ५. घाबरल्यासारखे वाटणे. ६. अटॅकप्रसंगी घाम सुटणे. ७. भोवळ येणे.

ध्यान-योगा ठरतो फायदेशिर
सुरुवातीपासूनच ध्यान-धारणा व योगा-प्राणायाम करणाऱ्या व्यक्तीला हृदयरोग होत नाही. ध्यान मनावर नियंत्रण ठेवते तर योगा शरीरावर नियंत्रण ठेवते. यात जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून प्रशिक्षण घेवून ध्यान-योगाचा आपल्या जीवनात समावेश केल्यास हृदयरोग होणे टाळले जावू शकते. रूग्णाने ध्यान-योगा पद्धतीचा अंतर्भाव आपल्या जीवनपद्धतीत केला तर हृदयरोगावर नियंत्रण मिळविले जावू शकते, असे डॉ. भोळे म्हणाल्या.

Web Title: Avoid heart disease by 'balanced life'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.