शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

शेतकरी अपघात विमा योजनेची प्रकरणे मार्गी लावा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:45 IST

गोंदिया : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यात यावी. अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या ...

गोंदिया : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यात यावी. अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या घटकांना लाभ देण्याचे काम सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने करावे. तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांची परिपूर्ण अंमलबजावणी होत असल्याची खात्री करण्याचे निर्देश जिल्हा पालक सचिव श्याम तागडे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात शनिवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, उपवनसंरक्षक कुलराज सिंग, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तागडे म्हणाले, शासनाच्या महत्त्वाच्या योजना जिल्हास्तरावर संबंधित विभागांकडून नियोजित पध्दतीने राबविणे गरजेचे आहे. प्रशासन आणि लाभार्थ्यांमध्ये समन्वय असणेदेखील गरजेचे आहे. कोणत्याही योजना राबविताना प्रशासन तसेच नागरिकांच्या समस्या शासन स्तरावर पोहचवून त्याचे निदान व पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आढावा बैठकीत प्रामुख्याने जिल्ह्यातील कोविड-१९ व बर्ड फ्लूसंदर्भात माहिती देण्यात आली. यानंतर या आजाराला प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे सादरीकरण करण्यात आले. कृषी विभागातील पीक विमा योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता विशेष लक्ष देऊन पीक विमा योजनेचा लाभ शेतकरी बांधवांना मिळेल, असे निर्देश पालक सचिवांनी दिले. बैठकीत धान खरेदी, शिक्षण, पंचायत, बांधकाम विभाग, नगरपालिका प्रशासन, सहकार विभाग, सिंचन विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, महाआवास योजना इत्यादी विषयांवर आढावा घेऊन सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास सांगितले.

....

गरजू लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवा

जिल्ह्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या योजनेचे जिल्ह्यात विशेष सहाय्य योजनेअंतर्गत सद्यस्थितीत एकूण १,०७,१६२ लाभार्थी आहेत. या योजनांचा लाभ गरजू लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य संबंधित विभागाने प्राधान्याने करण्याचे निर्देश दिले.

....