१९० मद्यपी वाहनचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2016 00:03 IST2016-07-24T00:03:46+5:302016-07-24T00:03:46+5:30
मद्याच्या धुंदीत वाहन चालविताना घडणाऱ्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या विरोधात वाहूतक नियंत्रण शाखेने

१९० मद्यपी वाहनचालकांवर कारवाई
ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह : दीड वर्षातील कारवाई
गोंदिया : मद्याच्या धुंदीत वाहन चालविताना घडणाऱ्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या विरोधात वाहूतक नियंत्रण शाखेने मोहीम छेडली असून मागी दीड वर्षात १९० मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले आहे. परिणामी प्राणांतिक अपघाताच्या ११ घटनांमध्ये घट झाली आहे.
मद्याच्या धुंदीत वाहन चालविताना स्वत:चा जीव धोक्यात टाकून इतरांनाही धोका पोहचविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचे धाडसत्र वाहतूक पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी चालविले आहे. मद्याच्या धुंदीत वाहन चालविणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्याचे कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडसत्र चालविल्यामुळे मद्यपी वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.
या कारवाईची धास्ती घेत अनेकांनी मद्यप्रशान करून वाहन चालविण्याचे टाळणे सुरू केले आहे. सन २०१५ या वर्षात दारू पिणाऱ्या १०३ वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात सर्वाधिक गुन्हे गोंदिया शहरात दाखल करण्यात आले.
सन २०१६ च्या जानेवारी महिन्यात १४ गुन्हे, मार्च महिन्यात सात, एप्रिल महिन्यात १०, मे महिन्यात २०, जून महिन्यात २१ व जुलै महिन्यात आतापर्यंत १५ असे ८७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सन २०१४ मध्ये गोंदिया जिल्ह्यात १४३ प्राणांतिक अपघात घडले होते. परंतु ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह संदर्भात कारवाई करण्यात आल्याने सन २०१५ मध्ये १३२ प्राणांतिक अपघात घडले असून ११ गुन्ह्यांची घट आहे. भरधाव वेगात त्यातही मद्याच्या धुंदीत वाहन चालविल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. (तालुका प्रतिनिधी)