शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
5
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
6
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
7
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
8
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
9
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
10
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
11
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
12
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
13
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
14
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
15
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
16
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
17
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
18
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
19
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

पूर्व विदर्भातील ९७८ मामा तलाव झाले गायब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:20 IST

अंकुश गुंडावार गोंदिया : पूर्व विदर्भात सर्वाधिक धानाचे उत्पादन घेतले जाते जाते. सिंचनाची सोय आणि धानपिकांसाठी अनुकूल वातावरण हे ...

अंकुश गुंडावार

गोंदिया : पूर्व विदर्भात सर्वाधिक धानाचे उत्पादन घेतले जाते जाते. सिंचनाची सोय आणि धानपिकांसाठी अनुकूल वातावरण हे त्या मागील कारण आहे. तसेच पूर्व विदर्भात माजी मालगुजारी तलाव (मामा) मोठ्या प्रमाणात आहे. या मामा तलावांची शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी मदत होते. परंतु या तलावांच्या संवर्धनाकडे लघु पाटबंधारे विभाग आणि जि.प.चे दुर्लक्ष झाल्याने पूर्व विदर्भातील ९७८ मामा तलाव गायब झाल्याची बाब पुढे आली आहे.

पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मामा तलावांची संख्या सर्वाधिक आहे. मामा तलावांची संख्या अधिक असल्याने हे जिल्हे तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. या तलावांमुळे मासेमारी आणि दुबार पीक घेण्यासाठी सुध्दा शेतकऱ्यांना मदत होत असते. पूर्वी या मामा तलावांचा मालकी हक्क त्या गावातील मालगुजरांकडे होता. त्यानंतर सरकारने या तलावांचा मालगुजारी हक्क संपुष्टात आणला. शंभर हेक्टरपर्यंतचे तलाव जिल्हा परिषदेकडे आणि त्यापेक्षा अधिक क्षेत्र असलेले तलाव लघु पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरीत केले. मात्र कालातंराने या तलावांकडे दोन्ही विभागांचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे काही तलावांवर अतिक्रमण झाले. तर काहींनी तलावात शेती करुन हे तलावच गायब करुन टाकले. मात्र मागील तीन-चार वर्षात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीनंतर या मामा तलावांचे महत्त्व शासनाला कळायला लागले. त्यानंतर राज्य सरकारने मामा तलावांचे संवर्धन करण्यासाठी पाऊले उचलली. या तलावांचे संवर्धन आणि पुनरुज्जीवित करण्यासाठी पावले उचलली. लघु पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने तलाठ्यांच्या रेकाॅर्डनेुसार नोंद असलेल्या मामा तलावांची गणना केली.

त्यात एकूण ६७३४ मामा तलावांपैकी प्रत्यक्षात ५७५६ मामा तलावच अस्तित्वात असल्याची बाब पुढे आली. तर सर्वाधिक मामा तलावांवर गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात अतिक्रमण झाले असल्याची बाब पुढे आली. दरम्यान, हा अहवाल सुध्दा राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र अद्यापही यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही.

....................

संवर्धन करणार केव्हा

बरेचदा शेतकऱ्यांना एका पाण्याने पिके गमाविण्याची वेळ येते. तेव्हा या मामा तलावांची शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी मोठी मदत होते. मात्र मागील दहा-पंधरा वर्षांपासून मामा तलावांच्या संवर्धनाकडे जिल्हा परिषद आणि लघु पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले. त्यामुळेच सिंचनासाठी महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या तलावांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

.............

जिल्हानिहाय मामा तलावांची संख्या

जिल्हा गणनेपूर्वी गणनेनंतर

भंडारा १४८४ १०२५

गोंदिया १७९८ १३९२

चंद्रपूर १६७८ १६७८

गडचिरोली १६६८ १६४५

नागपूर २१६ २१६

.........................................................

एकूण ६८३४ ५८५६