शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जिल्ह्यात वर्षभरात ९७२ गर्भपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:27 IST

संतती ही ईश्वराची देण आहे असे म्हटले जाते. परंतु या ईश्वराच्या इच्छेला बदलणाऱ्यांची संख्या कमी नाही. कुटुंबाचा वारस म्हणून मुलांच्या हव्यासापायी अनेकदा गर्भपात केले जाते. मागील वर्षभरात जिल्ह्यात ९७२ तरूणी व महिलांनी गर्भपात केल्याची बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देविविध अडचणींमुळे गर्भपात : शासकीयपेक्षा खासगी केंद्रात तीनपट गर्भपात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : संतती ही ईश्वराची देण आहे असे म्हटले जाते. परंतु या ईश्वराच्या इच्छेला बदलणाऱ्यांची संख्या कमी नाही. कुटुंबाचा वारस म्हणून मुलांच्या हव्यासापायी अनेकदा गर्भपात केले जाते. मागील वर्षभरात जिल्ह्यात ९७२ तरूणी व महिलांनी गर्भपात केल्याची बाब पुढे आली आहे.जिल्ह्यात गर्भपाताची आकडेवारी पाहिल्यावर अशिक्षित समाजाच्या तुलनेत सुशिक्षीत समाजात अधिक गर्भपात होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ पर्यंत ९७२ तरूणी व महिलांनी गर्भपात केला आहे.यातील ९२५ गर्भपात केवळ १२ आठवड्यात झाले आहेत. तर ४७ गर्भपात १२ ते २० आठवड्याच्या आत झाले आहेत. शासन निर्णयानुसार माता गर्भातील बाळाला त्रास असल्यास विशेष तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गर्भपात करू शकतात. गर्भवती महिलांचा १२ आठवड्यात केलेल्या गर्भपाताचा आकडा सर्वाधीक आहे. गर्भवती मातेला त्रास किंवा बाळाला त्रास असल्यास १२ ते २० आठवड्याच्या आत गर्भपात केले जाते. परंतु जोपर्यंत विशेषतज्ज्ञ परवनागी देत नाही तोपर्यंत गर्भपात करता येत नाही. गर्भपातामुळे मुलींच्या जन्मदरात घट होत आहे. जिल्ह्यात १२ शासकीय व २० खासगी रूग्णालयांना शासनातर्फे गर्भपात केंद्र मंजूर केले आहेत.यात गोंदिया येथील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय, तिरोडा उपजिल्हा रूग्णालय, देवरी ग्रामीण रूग्णालय, चिचगड ग्रामीण रूग्णालय, अर्जुनी मोरगाव ग्रामीण रूग्णालय, नवेगावबांध ग्रामीण रूग्णालय, सालेकसा ग्रामीण रूग्णालय, आमगाव ग्रामीण रूग्णालय, सडक-अर्जुनी ग्रामीण रूग्णालय, गोरेगाव ग्रामीण रूग्णालय, रजेगाव ग्रामीण रूग्णालय व बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खासगी रूग्णालयांचा समावेश आहे. जिल्ह्यात या रूग्णालया व्यतिरिक्त गर्भपात होत असतील तर ते अवैध गर्भपात आहेत.२४ वर्षाखालील महिलांचे २१५ गर्भपातजिल्ह्यात मागील वर्षी ९७२ गर्भपात करण्यात आले. यातील २१५ गर्भपात २४ वर्षातील तरूणी व महिलांचे आहेत. यात १५ वर्षापेक्षा कमी वयाची एक मुलगी, १५ ते १९ वर्षातील २१, २० ते २४ वर्षातील १९३ तरूणी-महिलांचा समावेश आहे. २५ ते २९ वर्षातील ३६६ महिलांचा गर्भपात करण्यात आला. ३० ते ३४ वर्षातील २७१ गर्भपात झाले. ३५ ते ३९ वर्षातील ९४ महिला, ४० ते ४४ वर्षातील २१ व ४५ व त्यापेक्षा अधिक वयाच्या ३ महिलांचे गर्भपात करण्यात आले. ६६ महिलांना गर्भधारणेचा धोका, १४४ महिलांचे शारीरिक आरोग्य, ९२ महिलांचे मानसिक आरोग्य, ३९ बालकांना धोका असल्याने व ६१८ महिलांची कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याने गर्भपात करण्यात आले. ११ बलात्कार पिडितांचा गर्भपात करण्यात आला.६५ टक्के गर्भपात खासगी रूग्णालयातजिल्ह्यात एक वर्षात झालेल्या ९७२ गर्भपातांपैकी ६३१ (६४.९१ टक्के) गर्भपात खासगी रूग्णालयात करण्यात आले. शासकीय रूग्णालयात २२८ गर्भपात करण्यात आले. गर्भपात करणाऱ्या महिलांमध्ये ९०४ विवाहित, ४९ अविवाहित, तर १९ अज्ञात महिला व तरूणींचा समावेश आहे.

टॅग्स :Abortionगर्भपात