शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

तिप्पट अर्ज असतानाही ३६ जिल्ह्यातील १९ हजार बालके आरटीईच्या प्रवेशापासून वंचित!

By नरेश रहिले | Updated: October 5, 2023 13:07 IST

प्रक्रिया उशिरा होत असल्याचा फटका

नरेश रहिले

गोंदिया : आरटीई अंतर्गत २५ टक्के दुर्बल घटकातील बालकांना मोफत प्रवेश देण्यासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांत १ लाख १ हजार ८४७ जागा भरायच्या होत्या. त्यापैकी ८२ हजार ८१७ जागांवर प्रवेश घेण्यात आले, तर, १९ हजार ३० जागा अजूनही रिक्तच आहेत. महाराष्ट्रातील ३६ पैकी एकाही जिल्ह्यात आरटीईच्या जागा शंभर टक्के भरल्या गेल्या नाहीत. आरटीईची प्रवेश प्रक्रियाच उशिरा होत असल्याने याचा फटका बालकांना बसत आहे.

शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत निःशुल्क शिक्षण मिळत असल्याने आरटीईअंतर्गत अनेक पालकांनी पाल्यांचे अर्ज भरले. महाराष्ट्रातील आरटीईच्या १ लाख १ हजार ८४७ जागांसांठी ३ लाख ६४ हजार ४१३ विद्यार्थ्यांचे अर्ज करण्यात आले. जागांपेक्षा तीन पट अधिक अर्ज असतानाही तब्बल १९ हजार जागा रिक्त आहेत. जागांची मागणी करणारे विद्यार्थी असतानाही १९ हजार जागा रिक्त असणे ही बाब महाराष्ट्राला न शोभणारी आहे. आरटीईच्या जागा ढिसाळ नियोजनामुळे भरल्या जात नाही. त्यामुळे राज्यस्तरावरून ही प्रक्रिया बंद करून जिल्हास्तरावरूनच भरती करण्याची मागणी होत आहे.

राज्यातील ८ हजार ८२४ शाळांत आरटीई अंतर्गत १ लाख १ हजार ८४७ जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. यासाठी राज्यभरातून ३ लाख ६४ हजार ४१३ अर्ज आले होते. यातील १ लाख ३४ हजार ३८५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. मात्र, मनासारखी शाळाच मिळाली नसल्याने १९ हजार ३० जणांनी प्रवेश नाकारला आहे. केवळ ८२ हजार ८१७ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला आहे. आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. अनेकांचा भ्रमनिरास झाल्याने दूरवरच्या शाळेत नंबर लागल्याने पालकांनी शाळांना नाकारले आहे.

चांगल्या शाळांच नाही

आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश दिला जातो. त्या बालकांचे पैसे शासन त्या शाळांना देते. शासन आरटीईचे पैसे देत नसल्यामुळे राज्यातील अनेक नामवंत शाळा या फंदात पडत नाही.

आरटीईकडे पाठ

आरटीई अंतर्गत मुलांचा क्रमांक लागूनही प्रवेश निश्चित करण्यात आला नाही. काही पालकांना ती शाळा आवडत नाही तर काही पालकांना ती शाळा लांब वाटत असल्याने त्या शाळांत आपल्या पाल्यांचा प्रवेश घेतला नाही.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीgondiya-acगोंदियाRight To Educationशिक्षण हक्क कायदा