शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

बबई येथे खताच्या १२७ बॅग जप्त ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : रब्बी हंगाम सुरू झाल्याने आता पिकांसाठी खताची गरज पडणार आहे. ही बाब लक्षात घेत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : रब्बी हंगाम सुरू झाल्याने आता पिकांसाठी खताची गरज पडणार आहे. ही बाब लक्षात घेत खताचा अवैध साठा करून ठेवणाऱ्या एका कृषी केंद्रावर धाड टाकून खताच्या १२७ बॅग जप्त करण्यात आल्या आहेत. गोरेगाव तालुक्यातील ग्राम बबई येथे ही दिनांक २३ व २४ जानेवारी रोजी ही कारवाई करण्यात आली.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात येथील उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक, गोरेगाव तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गोरेगाव तालुक्यातील ग्राम बबई येथे विक्री करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरित्या साठवून ठेवलेला खताचा अवैध साठा जप्त केला. यामध्ये किसान प्लस (२०:२०:०५) या खताच्या १२७ बॅग असून, जप्त केलेल्या खताच्या बॅग पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी श्री किसान बायो एग्रिटेक, जबलपूर कंपनी एजंट व ज्यांच्या घरी साठा सापडला त्यांच्याविरुध्द एफसीओ १९८५ ॲण्ड ईसीए १९५५मधील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रब्बी हंगामाला सुरूवात झाल्याने आता खतांचा काळाबाजार केला जाणार आहे. या खतांच्या काळा बाजारावर कृषी अधिकाऱ्यांची करडी नजर आहे. अशाप्रकारचा साठा किंवा या खताला विक्रीसाठी परवानगी नाही. असे खत विक्री होत असल्यास कृषी विभागाला कळवावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी महेंद्र मडामे यांनी केले आहे.