शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

१२२ प्रवाशांचा विलगीकरणाचा कालावधी संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 5:00 AM

जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधीत रुग्ण शहरातील गणेशनगर येथे आढळला होता. त्यानंतर जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने कोरोना बाधीत युवकाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील पाच सदस्य आणि चार मित्रांचे नमूने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. यासर्वांचा प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त झाला असून या सर्वांचे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने नमुने निगेटीव्ह आढळले.

ठळक मुद्देआतापर्यंत १७ जणांचे नमुने निगेटिव्ह : ५७४ व्यक्ती निगरानीत, पालावरील नागरिकांचे सर्वेक्षण केले सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात परदेशातून व बाहेर राज्यातून येणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. जिल्ह्यात २२२ प्रवाशी विदेशातून जिल्ह्यात आले होते. तर त्यांच्या संपर्कात एकूण ९४५ व्यक्ती आढळून आल्या होता. यापैकी १२२ प्रवाशांचा १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी मंगळवारी (दि.३१) संपला. त्यामुळे आता १०० विदेशी प्रवाशी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या ४७४ जण अशा एकूण ५७४ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्या प्रशासनाच्या देखरेखखाली आहेत.जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधीत रुग्ण शहरातील गणेशनगर येथे आढळला होता. त्यानंतर जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने कोरोना बाधीत युवकाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील पाच सदस्य आणि चार मित्रांचे नमूने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. यासर्वांचा प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त झाला असून या सर्वांचे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने नमुने निगेटीव्ह आढळले. तर जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने एकूण १८ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी १७ नमुने निगेटीव्ह तर केवळ १ जणांचा नमुना पाझिटिव्ह आढळला. जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण विदेशातून २२२ प्रवाशी आले तर त्यांच्या संपर्कात ९४५ जण आले होते. मात्र यापैकी १२२ प्रवाशांचा विलगीकरणाचा कालावधी ३१ मार्च रोजी संपला.त्यामुळे आता केवळ १०० विदेशातून आलेल्या प्रवाशांच्या संपर्कात आलेले ४७४ अशा एकूण ५७४ जणांंना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर प्रशासनाची नजर आहे. विशेष मागील पाच दिवसात जिल्ह्यात एकही कोरोनाचा नवीन रुग्ण अथवा संशयीत रुग्ण आढळून आला आहे. मात्र प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे.केटीएसमध्ये शंभर खाटांचे कक्ष सज्जराज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दररोज वाढ होत आहे. मंगळवारी हा आकडा ३०२ वर पोहचला.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे उपाय योजना केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात शंभर खाटांचे विशेष कक्षाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.इतर राज्य व जिल्ह्यातून परतले ९ हजार नागरिककोरोनामुळे देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व उद्योग धंदे बंद पडल्याने रोजगारासाठी इतर जिल्ह्यात व राज्यात गेलेले मजूर व कामगार आपल्या जिल्ह्यात परतत आहे. ३१ मार्चपर्यंत एकूण ९०१३ जण आलेले आहेत. तर विदेशातून २२२ जण परतले आहे. या सर्वांवर प्रशासनाने नजर ठेवली आहे.पोलिसांनी उचलली कठोर पाऊलेलॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन शासन आणि प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र यानंतरही नागरिक बिनधास्तपणे घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी सुध्दा विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाईचा फास आवळला असून त्यांना आता प्रसाद देण्यास सुरूवात केली आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस