शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

होय, 70 वर्षांपासून आम्ही भोगतोय; कावरे गावात आजही पाणी, वीज नाही, मूलभूत सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 14:45 IST

गेल्या सात वर्षांपासून त्यांच्या सात घरांना नळपाणी किंवा वीजपुरवठा नाही, आणि गावातील लोकांचे म्हणणे आहे की, राजकारणी केवळ निवडणुकीच्या काळात त्यांना आश्वासने देत आहेत, पण अजूनपर्यंत त्यांच्या मूलभूत अधिकारापासून हे गावकरी वंचितच आहेत.

केपे :  मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी १६ हजार लिटरपर्यंत पाणीपुरवठा करण्याची घोषणा केली आहे, पण पण केवळ घोषणा केल्याने सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी प्रत्येक गावांमधील समस्या जाणून घेणे गरजेचे आहे. असेच एक उदाहरण म्हणजे कावरे पिर्ला क्षेत्रातील एक गाव. त्यात धनगर समाजाचे १०० सदस्य पंचायत कार्यक्षेत्रात आहे.गेल्या सात वर्षांपासून त्यांच्या सात घरांना नळपाणी किंवा वीजपुरवठा नाही, आणि गावातील लोकांचे म्हणणे आहे की, राजकारणी केवळ निवडणुकीच्या काळात त्यांना आश्वासने देत आहेत, पण अजूनपर्यंत त्यांच्या मूलभूत अधिकारापासून हे गावकरी वंचितच आहे, आणि त्याबद्दल राग व्यक्त करत असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसून आले.केव्हाना, मायना या दुर्गम जंगली भागात राहून, ते अगदी मूलभूत पायाभूत सुविधांपासून दूर असल्याने आधीपासून या परिस्थितीत संघर्ष करत आहेत. त्यांच्याकडे योग्य रस्ता कनेक्टिव्हिटीची कमतरता आहे, कारण त्यांची घरे केपे शहरापासून १२ किमी आणि मुख्य रस्त्यापासून दोन किमी अंतरावर आहेत.मुख्यमंत्र्यांनी गोवा कुटुंबांना मोफत पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे. हे आमच्यासारख्या ग्रामीण भागाच्या लोकांसाठी वरदान आहे. पण आमची परिस्थिती पाहिली तर सात दशकांपासून सरकार आम्हाला पाणी पुरवण्यात अपयशी ठरले असल्याने ही एक चुटकुली असल्याचे दिसते, असे धनगर (गवळी) रहिवासी भिरू टोको भावधन म्हणाले.सुमारे पाच वर्षांपूर्वी सरकारने विहीर बांधून मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु उन्हाळ्यात हा स्त्रोत सुकून जातो. कोणतीही पाईपलाईन टाकली गेली नाही आणि जानेवारीपर्यंत एका नाल्यातून पाणी उपलब्ध होते. पावसाळा होईपर्यंत आम्ही कसेबसे एकामेकाला आपआपल्या संकटांवर मात करण्यास मदत करतो, परंतु एक एक पाण्याच्या थेंबाला मिळवण्यासाठी आम्ही जंगलात वनात फिरतो. पाणी शोधण्यासाठी खूप दूर जावे लागते, असे दुसरे रहिवासी भागी भावधन म्हणाले.२़ पासून केपे मतदान विभागातून सांगे मतदारसंघाच्या अंतर्गत कामोना येते. आणलेल्या धनगर समाजासाठी इतर परिस्थिती देखील दयनीय आहे. सर्वात जवळची विजेची लाईन दोन किमी अंतरावर आहे, परंतु अद्याप विजेचे खांब उभारलेले नाहीत. आम्ही सात दशकांहून अधिक काळ रात्रीच्या वेळी चिमणीच्या दिव्यांवर जगलो आहोत. २०१६ मध्ये स्थानिक पंचायतीने बसवलेले सौर पॅनेलने केवळ तीन वर्षे काम केले. आता एकही बल्ब पेटवता येत नाही, आणि परिसर उजळवण्यासाठी वारंवार स्मरणपत्रे अपयशी ठरली आहेत. असे, जया भावधन या ६० वर्षीय महिलेने सांगितले.दोन किलोमीटर लांबीचा रस्ता आणि असमान मार्ग खराब अवस्थेत आहे, विशेषत: पावसाळ्यात, दुचाकी वाहनांसाठीही फारसा हा रस्ता उपयोगाचा नाही. सर्व कुटुंबांकडे शेळ्या पाळत होत्या आणि उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांचे दूध विकण्यावर अवलंबून होते पण आता जुन्या शेळ्यांचस गोठाच रिकामा आहेत. जमीनदार आमच्या शेळ्यांना त्यांच्या काजूच्या बागेत फिरू देत नाहीत, म्हणून आम्ही त्यांना विकले. त्यांनी आम्हाला प्रत्येक घरासाठी सुमारे ५०० चौरस मीटर जमीन दिली, परंतु शीर्षक दस्तऐवजांची अद्याप नोंदणी करणे बाकी आहे, हे एका स्थानिकाने सांगितले. शिक्षण घेण्यातही एक अडथळा आहे. काही कुटुंबांनी आपल्या मुलांना ३० किमी अंतरावर असलेल्या वाल्किनी येथे नातेवाईकांच्या घरी पाठवले आहे आणि त्यांना तेथील सरकारी शाळेत दाखल केले आहे. 

टॅग्स :goaगोवाelectricityवीजWaterपाणी