शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

होय, 70 वर्षांपासून आम्ही भोगतोय; कावरे गावात आजही पाणी, वीज नाही, मूलभूत सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 14:45 IST

गेल्या सात वर्षांपासून त्यांच्या सात घरांना नळपाणी किंवा वीजपुरवठा नाही, आणि गावातील लोकांचे म्हणणे आहे की, राजकारणी केवळ निवडणुकीच्या काळात त्यांना आश्वासने देत आहेत, पण अजूनपर्यंत त्यांच्या मूलभूत अधिकारापासून हे गावकरी वंचितच आहेत.

केपे :  मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी १६ हजार लिटरपर्यंत पाणीपुरवठा करण्याची घोषणा केली आहे, पण पण केवळ घोषणा केल्याने सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी प्रत्येक गावांमधील समस्या जाणून घेणे गरजेचे आहे. असेच एक उदाहरण म्हणजे कावरे पिर्ला क्षेत्रातील एक गाव. त्यात धनगर समाजाचे १०० सदस्य पंचायत कार्यक्षेत्रात आहे.गेल्या सात वर्षांपासून त्यांच्या सात घरांना नळपाणी किंवा वीजपुरवठा नाही, आणि गावातील लोकांचे म्हणणे आहे की, राजकारणी केवळ निवडणुकीच्या काळात त्यांना आश्वासने देत आहेत, पण अजूनपर्यंत त्यांच्या मूलभूत अधिकारापासून हे गावकरी वंचितच आहे, आणि त्याबद्दल राग व्यक्त करत असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसून आले.केव्हाना, मायना या दुर्गम जंगली भागात राहून, ते अगदी मूलभूत पायाभूत सुविधांपासून दूर असल्याने आधीपासून या परिस्थितीत संघर्ष करत आहेत. त्यांच्याकडे योग्य रस्ता कनेक्टिव्हिटीची कमतरता आहे, कारण त्यांची घरे केपे शहरापासून १२ किमी आणि मुख्य रस्त्यापासून दोन किमी अंतरावर आहेत.मुख्यमंत्र्यांनी गोवा कुटुंबांना मोफत पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे. हे आमच्यासारख्या ग्रामीण भागाच्या लोकांसाठी वरदान आहे. पण आमची परिस्थिती पाहिली तर सात दशकांपासून सरकार आम्हाला पाणी पुरवण्यात अपयशी ठरले असल्याने ही एक चुटकुली असल्याचे दिसते, असे धनगर (गवळी) रहिवासी भिरू टोको भावधन म्हणाले.सुमारे पाच वर्षांपूर्वी सरकारने विहीर बांधून मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु उन्हाळ्यात हा स्त्रोत सुकून जातो. कोणतीही पाईपलाईन टाकली गेली नाही आणि जानेवारीपर्यंत एका नाल्यातून पाणी उपलब्ध होते. पावसाळा होईपर्यंत आम्ही कसेबसे एकामेकाला आपआपल्या संकटांवर मात करण्यास मदत करतो, परंतु एक एक पाण्याच्या थेंबाला मिळवण्यासाठी आम्ही जंगलात वनात फिरतो. पाणी शोधण्यासाठी खूप दूर जावे लागते, असे दुसरे रहिवासी भागी भावधन म्हणाले.२़ पासून केपे मतदान विभागातून सांगे मतदारसंघाच्या अंतर्गत कामोना येते. आणलेल्या धनगर समाजासाठी इतर परिस्थिती देखील दयनीय आहे. सर्वात जवळची विजेची लाईन दोन किमी अंतरावर आहे, परंतु अद्याप विजेचे खांब उभारलेले नाहीत. आम्ही सात दशकांहून अधिक काळ रात्रीच्या वेळी चिमणीच्या दिव्यांवर जगलो आहोत. २०१६ मध्ये स्थानिक पंचायतीने बसवलेले सौर पॅनेलने केवळ तीन वर्षे काम केले. आता एकही बल्ब पेटवता येत नाही, आणि परिसर उजळवण्यासाठी वारंवार स्मरणपत्रे अपयशी ठरली आहेत. असे, जया भावधन या ६० वर्षीय महिलेने सांगितले.दोन किलोमीटर लांबीचा रस्ता आणि असमान मार्ग खराब अवस्थेत आहे, विशेषत: पावसाळ्यात, दुचाकी वाहनांसाठीही फारसा हा रस्ता उपयोगाचा नाही. सर्व कुटुंबांकडे शेळ्या पाळत होत्या आणि उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांचे दूध विकण्यावर अवलंबून होते पण आता जुन्या शेळ्यांचस गोठाच रिकामा आहेत. जमीनदार आमच्या शेळ्यांना त्यांच्या काजूच्या बागेत फिरू देत नाहीत, म्हणून आम्ही त्यांना विकले. त्यांनी आम्हाला प्रत्येक घरासाठी सुमारे ५०० चौरस मीटर जमीन दिली, परंतु शीर्षक दस्तऐवजांची अद्याप नोंदणी करणे बाकी आहे, हे एका स्थानिकाने सांगितले. शिक्षण घेण्यातही एक अडथळा आहे. काही कुटुंबांनी आपल्या मुलांना ३० किमी अंतरावर असलेल्या वाल्किनी येथे नातेवाईकांच्या घरी पाठवले आहे आणि त्यांना तेथील सरकारी शाळेत दाखल केले आहे. 

टॅग्स :goaगोवाelectricityवीजWaterपाणी