शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

गोव्यात खाण कंपन्यांकडून कामगार कपात सुरू, सेझाकडून नोटीस जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 20:20 IST

राज्यात खनिज खाण बंदी लागू झाल्यानंतर काही कंपन्यांनी कामगार कपात सुरू केली आहे.

पणजी : राज्यात खनिज खाण बंदी लागू झाल्यानंतर काही कंपन्यांनी कामगार कपात सुरू केली आहे. सेझा(वेदांता) कंपनीने प्रथम कामगार कपातीला आरंभ करताना बुधवारी नोटीस जारी केली व उद्यापासून कामावर येऊ नका, असे सर्व कर्मचारी आणि कामगारांना कळवले आहे. यामुळे खळबळ माजली. दरम्यान, खाण बंदी असली तरी, लिज क्षेत्रबाहेर ठेवलेल्या खनिजाची वाहतूक करण्यास खाण खात्याने मुभा दिल्याने सुळकर्ण येथे एक कंपनी खनिजाची वाहतूक करू लागली आहे.

खाणींवर जे काम करतात, त्यांनी कामावर येऊ नये. सर्वोच्च न्यायालयाने व खाण खात्याने खनिज उत्खनन बंद करण्याचा आदेश दिलेला आहे. त्यामुळे आम्ही मनुष्यबळ कमी करत असल्याचे खाण कंपन्यांनी नोटीशीत म्हटले आहे. खाणींच्या सुरक्षेसाठीचे काम हे खाण कंपन्यांना करावे लागेल. तशी मुभा सरकारने दिली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कामासाठी जे कर्मचारी लागतील, त्या कर्मचा:यांना आम्ही नंतर व्यक्तीश: पत्र पाठवून बोलावून घेऊ, असे सेझा मायनिंग कॉर्पोरेशनने म्हटले आहे. डिचोलीहून कामगार कपात सुरू आहे.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण खाणबंदी लागू केलेली असताना दक्षिण गोव्यातील सुळकर्ण येथे माईनस्केप ही कंपनी खनिज वाहतूक कशी काय सुरू ठेवू शकते असा प्रश्न गोवा फाऊंडेशनसह आणखी काहीजणांनी उपस्थित केला आहे. खाण खात्याचे संचालक प्रसन्ना आचार्य यांना लोकमतने याविषयी विचारले असता, त्यांनी लिज क्षेत्रबाहेर ठेवल्या गेलेल्या खनिजाची जेटीर्पयत वाहतूक करता येते असे सांगितले. आचार्य यांनी सरकारी बैठकीचे इतिवृत्तही सादर केले. मुख्य सचिव धर्मेद्र शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील सचिव कृष्णमूर्ती यांच्या सहभागाने गेल्या 16 रोजी जी तातडीची बैठक झाली होती, त्या बैठकीवेळी लिज क्षेत्रबाहेरील खनिजाची (जर रॉयल्टी भरलेली असेल तर)वाहतूक करता येते असे ठरलेले आहे. इतिवृत्तात तसे नमूद करण्यात आले आहे. खाण बंदीच्या काळात ट्रक मालक, बार्ज मालक आदींना व्यवसाय मिळावा या हेतूने खनिज लिज क्षेत्रबाहेरील मालाची वाहतूक करता येते. अॅडव्हकेट जनरलांनीही तसाच सल्ला दिला आहे, असे बैठकीच्या इतिवृत्तात नमूद करण्यात आले आहे. 

क्लॉडकडून आक्षेप या प्रतिनिधीने गोवा फाऊंडेशनचे प्रमुख क्लॉड अल्वारीस यांना विचारले असता, ते म्हणाले की खाण बंदी जेव्हा लागू होते, त्यावेळी लिज क्षेत्रच्या आतिल व लिज क्षेत्रच्या बाहेरील माल असा फरक शिल्लक राहतच नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडय़ानुसार खरे म्हणजे कोणतीच खनिज वाहतूक चालू शकत नाही. लिजेस रद्द झालेली असल्याने लिजांच्या सीमाही रद्द झाल्या. मग लिज क्षेत्रच्या आतिल व बाहेरील असे म्हणताच येणार नाही. सुळकर्ण येथे जे काही सुरू आहे ते अत्यंत आक्षेपार्हही आहे, असे अल्वारीस म्हणाले. खाण खात्याची देखरेख नसताना कथित लिज क्षेत्रबाहेरीलही खनिजाची वाहतूक करता येत नाही. बाहेरील खनिज नेण्याच्या नावाखाली आतिलही खनिज नेले जाईल. खाण कंपन्यांनी लिजेस मोकळी केल्यानंतर आता त्यांनाच पुन्हा खाणींमधून पाणी बाहेर काढण्याची मुभा देणो देखील पूर्णपणे आक्षेपार्ह आहे.