शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

गोव्यात खाण कंपन्यांकडून कामगार कपात सुरू, सेझाकडून नोटीस जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 20:20 IST

राज्यात खनिज खाण बंदी लागू झाल्यानंतर काही कंपन्यांनी कामगार कपात सुरू केली आहे.

पणजी : राज्यात खनिज खाण बंदी लागू झाल्यानंतर काही कंपन्यांनी कामगार कपात सुरू केली आहे. सेझा(वेदांता) कंपनीने प्रथम कामगार कपातीला आरंभ करताना बुधवारी नोटीस जारी केली व उद्यापासून कामावर येऊ नका, असे सर्व कर्मचारी आणि कामगारांना कळवले आहे. यामुळे खळबळ माजली. दरम्यान, खाण बंदी असली तरी, लिज क्षेत्रबाहेर ठेवलेल्या खनिजाची वाहतूक करण्यास खाण खात्याने मुभा दिल्याने सुळकर्ण येथे एक कंपनी खनिजाची वाहतूक करू लागली आहे.

खाणींवर जे काम करतात, त्यांनी कामावर येऊ नये. सर्वोच्च न्यायालयाने व खाण खात्याने खनिज उत्खनन बंद करण्याचा आदेश दिलेला आहे. त्यामुळे आम्ही मनुष्यबळ कमी करत असल्याचे खाण कंपन्यांनी नोटीशीत म्हटले आहे. खाणींच्या सुरक्षेसाठीचे काम हे खाण कंपन्यांना करावे लागेल. तशी मुभा सरकारने दिली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कामासाठी जे कर्मचारी लागतील, त्या कर्मचा:यांना आम्ही नंतर व्यक्तीश: पत्र पाठवून बोलावून घेऊ, असे सेझा मायनिंग कॉर्पोरेशनने म्हटले आहे. डिचोलीहून कामगार कपात सुरू आहे.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण खाणबंदी लागू केलेली असताना दक्षिण गोव्यातील सुळकर्ण येथे माईनस्केप ही कंपनी खनिज वाहतूक कशी काय सुरू ठेवू शकते असा प्रश्न गोवा फाऊंडेशनसह आणखी काहीजणांनी उपस्थित केला आहे. खाण खात्याचे संचालक प्रसन्ना आचार्य यांना लोकमतने याविषयी विचारले असता, त्यांनी लिज क्षेत्रबाहेर ठेवल्या गेलेल्या खनिजाची जेटीर्पयत वाहतूक करता येते असे सांगितले. आचार्य यांनी सरकारी बैठकीचे इतिवृत्तही सादर केले. मुख्य सचिव धर्मेद्र शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील सचिव कृष्णमूर्ती यांच्या सहभागाने गेल्या 16 रोजी जी तातडीची बैठक झाली होती, त्या बैठकीवेळी लिज क्षेत्रबाहेरील खनिजाची (जर रॉयल्टी भरलेली असेल तर)वाहतूक करता येते असे ठरलेले आहे. इतिवृत्तात तसे नमूद करण्यात आले आहे. खाण बंदीच्या काळात ट्रक मालक, बार्ज मालक आदींना व्यवसाय मिळावा या हेतूने खनिज लिज क्षेत्रबाहेरील मालाची वाहतूक करता येते. अॅडव्हकेट जनरलांनीही तसाच सल्ला दिला आहे, असे बैठकीच्या इतिवृत्तात नमूद करण्यात आले आहे. 

क्लॉडकडून आक्षेप या प्रतिनिधीने गोवा फाऊंडेशनचे प्रमुख क्लॉड अल्वारीस यांना विचारले असता, ते म्हणाले की खाण बंदी जेव्हा लागू होते, त्यावेळी लिज क्षेत्रच्या आतिल व लिज क्षेत्रच्या बाहेरील माल असा फरक शिल्लक राहतच नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडय़ानुसार खरे म्हणजे कोणतीच खनिज वाहतूक चालू शकत नाही. लिजेस रद्द झालेली असल्याने लिजांच्या सीमाही रद्द झाल्या. मग लिज क्षेत्रच्या आतिल व बाहेरील असे म्हणताच येणार नाही. सुळकर्ण येथे जे काही सुरू आहे ते अत्यंत आक्षेपार्हही आहे, असे अल्वारीस म्हणाले. खाण खात्याची देखरेख नसताना कथित लिज क्षेत्रबाहेरीलही खनिजाची वाहतूक करता येत नाही. बाहेरील खनिज नेण्याच्या नावाखाली आतिलही खनिज नेले जाईल. खाण कंपन्यांनी लिजेस मोकळी केल्यानंतर आता त्यांनाच पुन्हा खाणींमधून पाणी बाहेर काढण्याची मुभा देणो देखील पूर्णपणे आक्षेपार्ह आहे.