शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांचा छळ थांबेल? गोव्यात पर्यटकांना खूपच त्रास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 13:02 IST

संपादकीय: एखाद्या राज्यात पर्यटक येतात तेव्हा त्या राज्याला सर्व बाजूंनी फायदा होत असतो.

गोव्यात पर्यटकांना खूपच त्रास दिला जातो. याविरुद्ध कडक कारवाईची गरज आहेच. मंत्री रोहन खंवटे यांनी पुढाकार घेऊन उत्तर गोव्याच्या किनारपट्टीत कारवाई मोहीम सुरू केली हे दिलासादायक आहे. एखाद्या राज्यात पर्यटक येतात तेव्हा त्या राज्याला सर्व बाजूंनी फायदा होत असतो. आर्थिक उपक्रमांना चालना मिळते. महसूल प्राप्ती होते, शिवाय छोटे विक्रेते, रेस्टॉरंट व्यावसायिक, टॅक्सी व्यावसायिक या सर्वांना पर्यटकांमुळे व्यवसाय मिळतो. पर्यटक माघारी परतताना गोमंतकीयांविषयी चांगली प्रतिमा घेऊन गेले तर त्याचा अधिक लाभ राज्यालाच होतो. 

गोव्यातील पुढील पिढ्यांसाठीही ते लाभदायी ठरेल. दुर्दैवाने अलीकडील काळात पर्यटकांना कटू अनुभव जास्त येऊ लागले आहेत. पर्यटकांना छळणारी गिधाडे काही पोलिस दलांमध्येही आहेत व काही रॉक व्यावसायिक, रेस्टॉरंट व्यावसायिक यांच्यामध्येही आहे. गोव्यात खाण धंदा यापूर्वी बंद पडला, कारण या धंद्यातील काहीजणांचा अतिलोभ ठरावीक कंपन्यांनी अतिलोभाने गोव्याला लुटले परिणामी, क्लॉड अल्वारिस यांना सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. पर्यटन व्यवसाय ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. मात्र, गिधाडांना रोखले नाही तर ही कोंबडीच एक दिवस मृत्युमुखी पडेल.

पर्यटकांचा छळ, किनाऱ्यावरील बेकायदा गोष्टी, डेक बेड्स टाकून किनाऱ्यांवर केली जाणारी अतिक्रमणे याबाबत आपण झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारले आहे, असे खंवटे यांनी काल जाहीर केले. खंवटे यांना स्वतःला हॉटेल व्यवसायाचा अनुभव आहे. त्यांना पर्यटन हा विषय नवीन नाही. ते पर्यटनमंत्री झाल्यापासून राज्यात अनेक नवे उपक्रम सुरू झाले आहेत. त्याबाबत शंकाच नाही, पण वाईट एवढेच वाटते की, विद्यमान सरकार अजूनही पर्यटकांत सुरक्षिततेची भावना निर्माण करू शकलेले नाही. गोव्याकडे मोठ्या संख्येने पोलिस आहेत. या पोलिसांना रस्त्यावर ठेवून पर्यटकांची लुबाडणूक केली जाते. 

महाराष्ट्र, कर्नाटकची गाडी दिसली की, अडवली जाते. कागदपत्रे नाहीत असे सांगून वाहतूक पोलिस किंवा अन्य पोलिसही त्यांना छळतात. गोव्याच्या पोलिस खात्यातील वरिष्ठांचे हे मोठे अपयश आहे. वारंवार याविषयी आवाज उठवूनही पर्यटकांची वाहने अडविणे थांबलेले नाही. कळंगुटहून पणजी व पणजीहून जुनेगोवे आणि तिथून पुढे फोंड्याला जाताना पोलिस किती पर्यटकांची वाहने अडवतात हे स्वतः पाहण्यासाठी एक दिवस मुख्यमंत्री सावंत व मंत्री खंवटे यांनी गुप्तपणे रस्त्याच्या बाजूला उभे राहावे. दुचाक्या घेऊन जे पर्यटक फिरतात, त्यांना पर्रा रस्त्यावर तसेच शिवोली चोपडे भागात तसेच मेरशी जंक्शनकडे उगाच थांबविले जाते. उत्तर व दक्षिण गोव्यात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते, पण तिथली वाहतूक व्यवस्था नीट करण्याकडे पोलिसांचे लक्ष नाही. तालांव देणे किंवा चिरीमिरी उकळणे याकडेच लक्ष आहे. गृहखात्याने पर्यटकांचा छळ त्वरित थांबवावा.

किनाऱ्यांवर डेक बेड्स घालून अतिक्रमणे केली जातात, त्यामुळे फिरताना व्यत्यय येतो ही गोष्ट खरी आहे. मात्र, आता कारवाई केली म्हणजे कायम किनारे मोकळेच राहतील असे म्हणता येत नाही. खंवटे यांनी सातत्याने कारवाई मोहीम हाती घ्यावी. दलालांकडून पर्यटकांना लुटले जातेच. टॅक्सी व्यावसायिकांशी निगडित प्रश्न वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो अजून सोडवू शकलेले नाहीत. आपल्याला गोव्यात टॅक्सी परवडतच नाही असे देशी-विदेशी पर्यटकही सांगतात. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ आल्याने रस्त्यावर वाहतूक खूप वाढली आहे. नव्या टॅक्सी व्यावसायिकांचीही संख्या वाढेल. मात्र, पर्यटकांची लूटमार होणार नाही याची काळजी पर्यटन खात्यालाच घ्यावी लागेल. वाहतूक खाते त्याबाबत अपयशी ठरले आहे. सर्वत्र भिकाऱ्यांची संख्याही वाढलेली आहे.

अगदी पणजीच्या १८ जून रस्त्यापासून कळंगुट ते मोरजीपर्यंतच्या किनाऱ्यांपर्यंत सगळीकडे भिकारी दिसतात. लहान मुलांना कडेवर घेऊन भिकारी फिरतात. पर्यटकांना त्यांच्यापासून खूप उपद्रव होतो. त्याविरुद्ध कारवाई करण्याचे काम पर्यटन खात्याने पोलिसांकडून करून घ्यावे. हॉटेलांमध्ये पर्यटक आपले मौल्यवान सामान ठेवतात. मात्र, खोलीतून हे सामान चोरट्यांकडून किंवा वेटर्सकडून पळविले जाते. हे सगळे गैरप्रकार थांबले नाहीत तर गोव्यात पर्यटकांची संख्या भविष्यात कमी होईल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा