कार्बन प्रदूषण शून्य टक्क्यांवर आणणार; मुख्यमंत्र्यांचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 07:09 IST2025-06-06T07:09:12+5:302025-06-06T07:09:56+5:30
प्रदूषणमुक्त आणि हरित साखळी बनवण्यासाठी पालिकेला १० ई-कचरा वाहने प्रदान

कार्बन प्रदूषण शून्य टक्क्यांवर आणणार; मुख्यमंत्र्यांचा निर्धार
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : राज्यातील पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सरकार वेगवेगळ्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करीत आहे. कार्बन प्रदूषण शून्य टक्क्यावर आणण्याचा सरकारचा निर्धार आहे चबरोबरच स्वच्छ, सुंदर साखळी साकारणे शक्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. साखळी येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शाश्वत विकास व सफाईसाठी, साखळी कचरामुक्त करण्यासाठी पालिकेच्या वचनबद्धतेचे कौतुक केले. आगामी १० दिवसांत सरकार विविध पर्यावरणपूरक उपक्रमांची घोषणा आणि अंमलबजावणी करणार आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले.
सामाजिक सेवा
कचरा व्यवस्थापनाच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी साखळी नगरपालिकेला १० इलेक्ट्रिक कचरा संकलन वाहने प्रदान केली. या वाहनांच्या चाव्या मुख्यमंत्री सावंत यांनी नगराध्यक्षा सिद्धी प्रभू यांच्याकडे सुपूर्द केल्या. साखळी पालिकेला १० वाहने पुरस्कृत करून वेर्णातील मोलबायो डायग्नोस्टिक्स कंपनीने सामाजिक सेवा उपक्रमात योगदान दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
हरित वाहने उपलब्ध
नगराध्यक्षा सिद्धी प्रभू म्हणाल्या, पालिकेला दहा कचरा वाहने प्रदान करून मोठे योगदान दिले आहे. पालिका सर्व प्रकारे लोकांना सहकार्य करीत आहे. हरित वाहने उपलब्ध झाल्याने प्रदूषणमुक्तीला हातभार लागले व आर्थिक बचत होईल. सोलर पॅनल वापरून प्रदूषण रोखणे व बचत करण्यासाठी विशेष योगदान देणार आहे.
स्वच्छ, सुंदर गोव्यासाठी
प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारून प्लास्टिकमुक्त, कचरामुक्त घर, गावाचा संकल्प केला तर सुंदर, स्वच्छ गोव्याचे स्वप्न साकारेल असे आवाहन नगराध्यक्षांनी केले. आनंद काणेकर यांसह नगरसेवक, कार्यकर्ते, अधिकारी उपस्थित होते.