शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार पत्रकार जमतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 22:32 IST

कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघटनेच्या अधिवेशनासाठी मी गेल्या आठवड्यात म्हैसूरला जाऊन आलो. तेथे हजारोंच्या संख्येने पत्रकार जमलेले पाहून मला आश्चर्यच वाटले.

- राजू नायककर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघटनेच्या अधिवेशनासाठी मी गेल्या आठवड्यात म्हैसूरला जाऊन आलो. तेथे हजारोंच्या संख्येने पत्रकार जमलेले पाहून मला आश्चर्यच वाटले.कर्नाटक हे प्रगतीशील राज्य आहे. तेथील वृत्तपत्रसृष्टीही समृद्ध आहे. परंतु, एका अधिवेशनासाठी एवढ्या मोठ्या संख्येने पत्रकार जमणे हा विक्रमच म्हणावा लागेल. देशात अनेक मोठी राज्ये आहेत. त्यांचीही एवढी मोठी अधिवेशने होत नाहीत. कर्नाटकातील अधिवेशनासाठी गोव्यातून मी व श्रीलंका व नेपाळचाही प्रत्येकी एक प्रतिनिधी आला होता.मी माझ्या भाषणात पत्रकारांचा महासंघ बनविण्याची आवश्यकता मांडली. गोव्यासह पश्चिम व दक्षिण राज्यांचे परस्परांशी संबंधित अनेक प्रश्न आहेत, त्यावर नेते खल करतातच; परंतु पत्रकारांनाही भूमिका मांडण्यासाठी परस्पर सौहार्दाने काम करता आले पाहिजे. म्हादईचा प्रश्न आहे. गोवा व कर्नाटकने या बाबतीत अत्यंत टोकाची भूमिका घेतली आहे. कर्नाटकात तर हिंसाचाराची भाषा केली जाते. गोव्यासारख्या चिमुकल्या राज्याने या प्रश्नावरील कायदेशीर बाबींवरच १० कोटींपेक्षा जास्त खर्च केला आहे. वास्तविक दोन्ही राज्यांमधील पत्रकार एकत्र येऊन परिस्थितीचे तटस्थ अवलोकन करू शकतात. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, केरळला ग्रासणारा प्रश्न आहे तो पश्चिम घाटांच्या संवर्धनाचा. केरळमध्ये गेल्या पावसाळ्यात प्रलय येऊन जो हाहा:कार निर्माण झाला त्याला केरळ राज्याने पश्चिम घाटांवर केलेली कुरघोडी कारण झाली. केरळने वारेमाप धरणे बांधली व पश्चिम घाटांना वेसण घालण्याचा जो प्रयत्न केला तो अश्लाघ्य होता, असे आता सांगितले जाते.पत्रकार अभिनिवेशाने आपल्याच राज्याची भूमिका पुढे दामटतात. विस्तृत भूमिका मांडली जात नाही. पर्यावरणाच्या प्रश्नाबाबत तर असा अभिनिवेश योग्य नाही. दुर्दैवाने पत्रकारांना एका व्यासपीठावर आणून त्यांना विषयाची जाणीव करून दिली तरी खूप काही होऊ शकेल.म्हैसूर अधिवेशनात पत्रकारांसाठी आचारसंहिता, वेतनवाढ, पत्रकार भवन आदींची चर्चाही झाली. कर्नाटकाचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी प्रचारी थाटाचे भाषण केले. पत्रकारांची नेतेमंडळी राजकारण्यांचा अनुनय करीत होती, ते खटकले; परंतु राज्याच्या कानाकोपऱ्यातील पत्रकारांची उपस्थिती आणि त्यांचा चर्चेतील सहभाग वैशिष्ट्यपूर्ण आणि दिलासादायक होता. कर्नाटकातील प्रमुख वृत्तपत्रे चार-पाचच आहेत, त्यातही कानडी वृत्तपत्रे अग्रेसर आहेत; परंतु प्रत्येक जिल्ह्यात तीन-चार कानडी वृत्तपत्रे निघतात आणि ती दमदारपणे वाचकांवर गारुड घालून आहेत, हे चित्र निश्चित आम्हा पत्रकारांसाठी अभिमानास्पद होते.

टॅग्स :Mediaमाध्यमेKarnatakकर्नाटक