शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

गोवा - भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांना आम्ही रोखू शकत नाहीः मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 15:58 IST

स्वतःहून भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांना कोण काय करणार असेही ते म्हणाले. 

पणजीः गोव्यातील लोक पोर्तुगीज नागरिकत्व स्विकारून विदेशातच स्थायिक होत असले तरी त्याविषयी सरकार काहीच करू शकत नाही असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सांगितले. स्वतःहून भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांना कोण काय करणार असेही ते म्हणाले. 

भारतीय नागरिकत्व सोडून पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारणाऱ्यांची संख्या दर वर्षी वाढत असल्यामुळे या विषयी पूर्वीही चिंता व्यक्त केली जात होती आणि आताही केली जात आहे. परंतु हे प्रकार कुणीच रोखू शणार नाहीत. कारण विदेशी नागरिकत्वासाठी भारतीय नागरिकत्व सोडणे हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. मग ते कोणत्याही कारणासाठी असो, नोकरी धंद्यासाठी असो किंवा इतर कारणांसाठी. त्यांनी नागरिकत्व स्वःहून सोडलेले असते. त्यामुळे या बाबतीत सरकार काहीही करू शकतनाही असे त्यांनी सांगितले. विरोधी आमदारांनी संयुक्तरित्या हा प्रश्न विचारला होता. त्यात वेन्झी विएगश, विरेश बोरकर आणि एल्टन डिकॉस्टा यांचा समावेश होता. विदेशी भारतीयांच्या समस्यांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. त्या संबंधी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की विदेशी भारतीयांच्या समस्यांसंबंधी मात्र गोवा सरकार काही तरी मार्ग काढू शकतो. आमदार वेन्झी विएगश यांनी गोव्यात रोजगार संधी उपलब्ध नसल्यामुळे लोक विदेशात जात असल्याचे सांगितले. त्यासाठी नाईलाजाने भारतीय नागरिकत्व त्यांना सोडावे लागते असेही ते म्हणाले. विरेश बोरकर यांनीही त्यांच्या सूरात सूर मिळविताना म्हणाले की त्यांना भारतीय नागरिकत्व सोडावे लागू नये. मात्र कायद्यात त्या शिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे त्यांना विदेशी नागरिकत्व मिळाल्यानंतर भारतीय नागरिकत्व सोडून द्यावेच लागते ही वस्तुस्थिती आहे.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत