शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

गोवा - भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांना आम्ही रोखू शकत नाहीः मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 15:58 IST

स्वतःहून भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांना कोण काय करणार असेही ते म्हणाले. 

पणजीः गोव्यातील लोक पोर्तुगीज नागरिकत्व स्विकारून विदेशातच स्थायिक होत असले तरी त्याविषयी सरकार काहीच करू शकत नाही असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सांगितले. स्वतःहून भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांना कोण काय करणार असेही ते म्हणाले. 

भारतीय नागरिकत्व सोडून पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारणाऱ्यांची संख्या दर वर्षी वाढत असल्यामुळे या विषयी पूर्वीही चिंता व्यक्त केली जात होती आणि आताही केली जात आहे. परंतु हे प्रकार कुणीच रोखू शणार नाहीत. कारण विदेशी नागरिकत्वासाठी भारतीय नागरिकत्व सोडणे हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. मग ते कोणत्याही कारणासाठी असो, नोकरी धंद्यासाठी असो किंवा इतर कारणांसाठी. त्यांनी नागरिकत्व स्वःहून सोडलेले असते. त्यामुळे या बाबतीत सरकार काहीही करू शकतनाही असे त्यांनी सांगितले. विरोधी आमदारांनी संयुक्तरित्या हा प्रश्न विचारला होता. त्यात वेन्झी विएगश, विरेश बोरकर आणि एल्टन डिकॉस्टा यांचा समावेश होता. विदेशी भारतीयांच्या समस्यांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. त्या संबंधी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की विदेशी भारतीयांच्या समस्यांसंबंधी मात्र गोवा सरकार काही तरी मार्ग काढू शकतो. आमदार वेन्झी विएगश यांनी गोव्यात रोजगार संधी उपलब्ध नसल्यामुळे लोक विदेशात जात असल्याचे सांगितले. त्यासाठी नाईलाजाने भारतीय नागरिकत्व त्यांना सोडावे लागते असेही ते म्हणाले. विरेश बोरकर यांनीही त्यांच्या सूरात सूर मिळविताना म्हणाले की त्यांना भारतीय नागरिकत्व सोडावे लागू नये. मात्र कायद्यात त्या शिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे त्यांना विदेशी नागरिकत्व मिळाल्यानंतर भारतीय नागरिकत्व सोडून द्यावेच लागते ही वस्तुस्थिती आहे.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत