शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

गोव्यात पावसाने झोडपले; नदी धरणांच्या पाण्याची पातळी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 15:26 IST

पुढील पाच दिवस राज्यात जाेरदार पावसाची शक्यता

नारायण गावस

पणजी: राज्यात पावसाचा जाेर वाढला असून सर्वत्र पावसाने झाेडपून काढले आहे. राज्यात नद्या, बंधारे तसेच धरणांची पाण्याची पातळी वाढली आहे. राज्यभरात ग्रामीण भागापासून शहरापर्यंत सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील पाच दिवस राज्यात जाेरदार पावसाची शक्यता वर्तवली असून राज्य हवामान खात्याने येलो अलर्टही जारी केला आहे.

नदी धरणाच्या पाण्याची पातळी वाढली

गेले आठ दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे राज्यातील धरणांची पातळी वाढू लागली आहे. सत्तरीत सध्या मुसळधार पाऊस पडत असल्याने म्हादई नदीची पातळी वाढली आहे. त्याच प्रमाणे अंजूणे धरणाची पाण्याची पातळी वाढत आहे.  तसेच चाेर्ला घाटात दरडी पडण्याच्या घटना घडत आहे.  अंजूणे धरणाप्रमाणे साळावली, आमथाने, पंचवाडी तसेच इतर धरणांची पाणतळीही वाढत आहे. राज्यातील नद्या उपनद्यांना पुर यायला सुरुवात झाली आहे. बहुतांश भागात शेती बागायती पाण्याखाली  गेल्या आहेत. .याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.  

ठिकठिकाणी पडझड

गेले आठ दिवस राज्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटना वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.  त्याचप्रमाणे चाेर्ला घाटात तसेच इतर ठिकाणी दरडी काेसळण्याच्या घटना घडल्या आहेत.  जाेरदार पावसाने लाेकांच्या घरावर झाडे पडून नुकसान हाेण्याच्या घटना राज्यभरातून समाेर येत आहेत. अग्निशमन दलाला विविध ठिकाणाहून अशा घटनांचे कॉल येत असून  त्यांच्याकडून ते दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे. 

राज्यात आतापर्यंत ४५ इंच पावसाची नोंद

राज्यात १ जून ते ५ जुलैपर्यंत ४५ इंच पावसाची नोंद झाली आहे सर्वाधिक पाऊस वाळपई केंद्रावर नोंद झाला आहे. वाळपईत ५५ इंचा पेक्षा जस्त पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासातही वाळपईत ५.२९ इंच तर सांगेत ४.८१ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर त्याच्या खालोखाल म्हापसा ४.२९ इंच पावसाची नोंद  झाली आहे. राज्यात आज शुक्रवार ऑरेंज अलर्ट असून पुढील चार दिवस यलो अलर्ट जारी केला आहे.

टॅग्स :goaगोवाRainपाऊस