शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गोव्यात पावसाने झोडपले; नदी धरणांच्या पाण्याची पातळी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 15:26 IST

पुढील पाच दिवस राज्यात जाेरदार पावसाची शक्यता

नारायण गावस

पणजी: राज्यात पावसाचा जाेर वाढला असून सर्वत्र पावसाने झाेडपून काढले आहे. राज्यात नद्या, बंधारे तसेच धरणांची पाण्याची पातळी वाढली आहे. राज्यभरात ग्रामीण भागापासून शहरापर्यंत सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील पाच दिवस राज्यात जाेरदार पावसाची शक्यता वर्तवली असून राज्य हवामान खात्याने येलो अलर्टही जारी केला आहे.

नदी धरणाच्या पाण्याची पातळी वाढली

गेले आठ दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे राज्यातील धरणांची पातळी वाढू लागली आहे. सत्तरीत सध्या मुसळधार पाऊस पडत असल्याने म्हादई नदीची पातळी वाढली आहे. त्याच प्रमाणे अंजूणे धरणाची पाण्याची पातळी वाढत आहे.  तसेच चाेर्ला घाटात दरडी पडण्याच्या घटना घडत आहे.  अंजूणे धरणाप्रमाणे साळावली, आमथाने, पंचवाडी तसेच इतर धरणांची पाणतळीही वाढत आहे. राज्यातील नद्या उपनद्यांना पुर यायला सुरुवात झाली आहे. बहुतांश भागात शेती बागायती पाण्याखाली  गेल्या आहेत. .याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.  

ठिकठिकाणी पडझड

गेले आठ दिवस राज्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटना वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.  त्याचप्रमाणे चाेर्ला घाटात तसेच इतर ठिकाणी दरडी काेसळण्याच्या घटना घडल्या आहेत.  जाेरदार पावसाने लाेकांच्या घरावर झाडे पडून नुकसान हाेण्याच्या घटना राज्यभरातून समाेर येत आहेत. अग्निशमन दलाला विविध ठिकाणाहून अशा घटनांचे कॉल येत असून  त्यांच्याकडून ते दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे. 

राज्यात आतापर्यंत ४५ इंच पावसाची नोंद

राज्यात १ जून ते ५ जुलैपर्यंत ४५ इंच पावसाची नोंद झाली आहे सर्वाधिक पाऊस वाळपई केंद्रावर नोंद झाला आहे. वाळपईत ५५ इंचा पेक्षा जस्त पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासातही वाळपईत ५.२९ इंच तर सांगेत ४.८१ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर त्याच्या खालोखाल म्हापसा ४.२९ इंच पावसाची नोंद  झाली आहे. राज्यात आज शुक्रवार ऑरेंज अलर्ट असून पुढील चार दिवस यलो अलर्ट जारी केला आहे.

टॅग्स :goaगोवाRainपाऊस