शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
2
मोठी दुर्घटना! राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळले, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, मदतकार्य सुरू
3
दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपद राहणार ४ महिने रिक्त;  विधानसभेतील पदाचा निर्णयही प्रलंबित
4
झारखंडमधील ACB पथकाने अटक केलेला अमित साळुंखे कोण?; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
5
घटनेच्या उद्देशिकेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द हटवणार का?; केंद्र सरकारने संसदेत दिले उत्तर
6
Piaggio ने आणली नवीन इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर! 'आपे ई-सिटी अल्ट्रा' आणि 'आपे ई-सिटी FX मॅक्स', किंमत आणि फीचर्स काय?
7
अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र सरकारतर्फे अभ्यासक्रम पुरवणार; आशिष शेलारांचे आश्वासन
8
थायलंड-कंबोडिया संघर्ष दुसऱ्या दिवशीही सुरूच; आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू; UN'ने बोलावली आपत्कालीन बैठक
9
NSDL IPO: बहुप्रतीक्षित एनएसडीएल आयपीओचा प्राईज बँड निश्चित; GMP किती, कधीपासून गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या
10
पहिला श्रावणी शनिवार: अश्वत्थ मारुती व्रताचरण; कसे करावे पूजन? पाहा, व्रतकथा अन् महात्म्य
11
आता नाशिकची वाईन अन् केरळची ताडी थेट ब्रिटनमध्ये मिळणार! यूकेमध्ये विक्रीचा मार्ग मोकळा
12
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
13
ना स्टॅाक ना SIP.., रिटर्नसाठी PPF सर्वांचा बॅास; केवळ १ लाखातून बनेल १ कोटींचा फंड
14
ओलाचा बैल केला, शेतीला जुंपला! ईलेक्ट्रीक स्कूटरने ३० एकर शेत नांगरले; शेतकरी म्हणाले...
15
OYO कांड! विवाहित प्रेयसीसोबत पकडले, प्रियकराने विवस्त्रावस्थेतच हायवेवरून धूम ठोकली... 
16
लिव्ह इनमधील २४ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू; सैयारा सिनेमा पाहून काय घडले? पोलीस हैराण 
17
Stock Market Today: शेअर बाजारात मोठी घसरण, ३०० अंकांपेक्षा जास्त घसरण; Nifty २५००० च्या खाली, NBFC Stocks आपटले
18
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
19
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
20
'सैयारा'चा अहान पांडे चेन स्मोकर होता? युट्यूबरने केली पोलखोल; म्हणाला, "वर्कशॉपवेळी तर..."

हिंदुत्वाच्या रक्षणासाठी एकत्र या: टी. राजासिंग; कुडचडेत बजरंग दल, विहिंपच्या सभेला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2024 10:34 IST

रविवारी कुडचडे येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने गीता जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, कुडचडे : 'देशाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तसेच जेव्हा एखाद्या हिंदूवर अन्याय होतो त्याला उत्तर देण्यासाठी आपण सज्ज हवे. संघटीत होऊन हिंदूंनी रक्षणासाठी पुढे यावे' असे प्रतिपादन हिंदूत्ववादी नेते टी. राजा सिंग यांनी केले.

रविवारी कुडचडे येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने गीता जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. लढा देण्यासाठी गोव्यात लोक कितीही कमी असले तरी मनुष्यबळ महाराष्ट्र, कर्नाटकातून आणू' असे ते म्हणाले.

टी. राजासिंग म्हणाले की, 'जेव्हा धर्मांतर होत होते, तेव्हा ते रोखण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. ते आमचे दैवत आहेत. जर शिवाजी महाराज नसते तर हिंदू संपले असते. आज तशीच स्थिती आहे. बजरंग दल आहे म्हणून हिंदू आहे. बजरंग दलाच्या कामामुळेच गोमाता जीवंत आहेत. आधी हिंदू बना आणि मग राजकारणी व्हा असे आमचे म्हणणे आहे. धर्माचे रक्षण करायचे असेल तर विश्व हिंदू परिषदेत सहभागी व्हा.' दरम्यान, दुपारी तीन वाजता तिस्क सावर्डेपासून २८०० गणवेशधारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी विराट शौर्य संचलन केले. पारंपरिक समई प्रज्वलित करून 'हो जाओ तैयार साथियो...' या गीताने व शिगमोत्सवातील रोमटामेळ तथा ढोल ताशांच्या गजरात कार्यक्रमाची सुरवात झाली. राजेंद्र पवार, मोहन आमशेकर, संकेत आर्सेकर आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी भगवदगीता पूजन करण्यात आले. 'दंड व खङ्ग प्रतिक्षित प्रयोग' करण्यात आला.

राजेंद्र पवार म्हणाले, 'हिंदू समाजाने संघटीत होऊन एकत्र येण्याचे गरज आहे. बजरंग दल मेक इन इंडियाचे काम करीत आहे. सेवा, सुरक्षा आणि संस्कृती टिकवायचे हा बजरंग दलाचा नारा आहे. मोहन आमशेकर म्हणाले की, 'राम मंदिराची स्थापना झाली आणि आमचे संकट दूर झाले आहे. दुर्गा वाहिनीचे काम प्रत्येकाने करायला पाहिजे. आत्मरक्षणासाठी आमच्याकडे शस्त्र पाहिजे. जोपर्यंत आम्ही संघटीत होत नाही, तोपर्यंत अन्याय होत राहील. संकेत आर्सेकर म्हणाले की, 'हिंदू टिकून राहण्यासाठी संघटन गरजेचे आहे.

रक्षणासाठी हिंदूंनी शस्त्रविद्या शिकावी 

टी. राजासिंग म्हणाले की, 'आज अनेक घरांत रामायण, भगवतगीता पुस्तके पहायला मिळत नाही हे आमचे दुर्दैव आहे. भारतात मुस्लिम धर्माचा प्रसार करण्याचे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत. आज बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. ते बंद करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी रौद्ररुप घेण्याची गरज आहे. बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी बजरंग दल तयार आहे. आपल्या रक्षणासाठी शस्त्रविद्या शिका.'

टॅग्स :goaगोवाHinduहिंदूHindutvaहिंदुत्व