शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
2
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
3
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
4
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
5
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
6
Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
7
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
8
Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!
9
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
10
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
11
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
12
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
13
Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!
14
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
15
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
16
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
17
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
18
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
19
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
20
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या

हिंदुत्वाच्या रक्षणासाठी एकत्र या: टी. राजासिंग; कुडचडेत बजरंग दल, विहिंपच्या सभेला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2024 10:34 IST

रविवारी कुडचडे येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने गीता जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, कुडचडे : 'देशाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तसेच जेव्हा एखाद्या हिंदूवर अन्याय होतो त्याला उत्तर देण्यासाठी आपण सज्ज हवे. संघटीत होऊन हिंदूंनी रक्षणासाठी पुढे यावे' असे प्रतिपादन हिंदूत्ववादी नेते टी. राजा सिंग यांनी केले.

रविवारी कुडचडे येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने गीता जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. लढा देण्यासाठी गोव्यात लोक कितीही कमी असले तरी मनुष्यबळ महाराष्ट्र, कर्नाटकातून आणू' असे ते म्हणाले.

टी. राजासिंग म्हणाले की, 'जेव्हा धर्मांतर होत होते, तेव्हा ते रोखण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. ते आमचे दैवत आहेत. जर शिवाजी महाराज नसते तर हिंदू संपले असते. आज तशीच स्थिती आहे. बजरंग दल आहे म्हणून हिंदू आहे. बजरंग दलाच्या कामामुळेच गोमाता जीवंत आहेत. आधी हिंदू बना आणि मग राजकारणी व्हा असे आमचे म्हणणे आहे. धर्माचे रक्षण करायचे असेल तर विश्व हिंदू परिषदेत सहभागी व्हा.' दरम्यान, दुपारी तीन वाजता तिस्क सावर्डेपासून २८०० गणवेशधारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी विराट शौर्य संचलन केले. पारंपरिक समई प्रज्वलित करून 'हो जाओ तैयार साथियो...' या गीताने व शिगमोत्सवातील रोमटामेळ तथा ढोल ताशांच्या गजरात कार्यक्रमाची सुरवात झाली. राजेंद्र पवार, मोहन आमशेकर, संकेत आर्सेकर आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी भगवदगीता पूजन करण्यात आले. 'दंड व खङ्ग प्रतिक्षित प्रयोग' करण्यात आला.

राजेंद्र पवार म्हणाले, 'हिंदू समाजाने संघटीत होऊन एकत्र येण्याचे गरज आहे. बजरंग दल मेक इन इंडियाचे काम करीत आहे. सेवा, सुरक्षा आणि संस्कृती टिकवायचे हा बजरंग दलाचा नारा आहे. मोहन आमशेकर म्हणाले की, 'राम मंदिराची स्थापना झाली आणि आमचे संकट दूर झाले आहे. दुर्गा वाहिनीचे काम प्रत्येकाने करायला पाहिजे. आत्मरक्षणासाठी आमच्याकडे शस्त्र पाहिजे. जोपर्यंत आम्ही संघटीत होत नाही, तोपर्यंत अन्याय होत राहील. संकेत आर्सेकर म्हणाले की, 'हिंदू टिकून राहण्यासाठी संघटन गरजेचे आहे.

रक्षणासाठी हिंदूंनी शस्त्रविद्या शिकावी 

टी. राजासिंग म्हणाले की, 'आज अनेक घरांत रामायण, भगवतगीता पुस्तके पहायला मिळत नाही हे आमचे दुर्दैव आहे. भारतात मुस्लिम धर्माचा प्रसार करण्याचे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत. आज बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. ते बंद करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी रौद्ररुप घेण्याची गरज आहे. बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी बजरंग दल तयार आहे. आपल्या रक्षणासाठी शस्त्रविद्या शिका.'

टॅग्स :goaगोवाHinduहिंदूHindutvaहिंदुत्व