शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
2
आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२६: नोकरी, व्यवसायात लाभ, नशिबाची साथ; अनुकूल दिवस
3
पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्पर्धा; राज यांनी पाच हजारांना मत विकणाऱ्यांचे कान टोचले
4
'लाडक्या बहिणींना' आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई; डिसेंबरचे १,५०० रुपये देण्यास मुभा
5
'...तर मी वकील, शिंदे कामगार नेते, अजितदादा झाले असते इन्स्पेक्टर': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
६ दिवसांत ५ ग्रहांचे गोचर: ७ राशींची संक्रांत संपणार, लक्षणीय लाभ; पैशांचा ओघ, सुखाचा काळ!
7
डोंबिवलीत निवडणुकीला हिंसक वळण! भाजप उमेदवाराचे पती गंभीर जखमी; कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर राडा
8
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
9
मतदान केंद्रावर मोबाइलबंदी आहे की नाही? निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेशच नाहीत
10
"आमच्या मदतीशिवाय महापौर होऊच शकत नाही"; काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा दावा
11
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
12
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
13
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
14
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
15
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
16
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
17
'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
18
WPL 2026 : आरसीबीच्या ताफ्यातील ब्युटीनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत मैफील लुटली, पण...
19
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
20
KL Rahul Break Kohli Record: बिग सरप्राइज! KL राहुलनं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड! MS धोनी नंबर वन
Daily Top 2Weekly Top 5

"सत्य अणि भाजप यांची सांगड होऊच शकत नाही," राज्यपालांच्या बदलीवरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 21:52 IST

राज्यपाल मलिक हे सत्याचे पालक होते. त्यांनी नेहमीच गोमंतकीयांच्या भावना व अस्मितेचा आदर करत म्हादई, अर्थव्यवस्था व खर्च कपात, कोविड हाताळणी या विषयांवर गोमंतकीयांचे हित जपले. गोवा व गोमंतकीयांना त्यांच्या मार्गदर्शनाची जेव्हा अत्यंत गरज होती नेमकी त्याचवेळी त्यांची बदली होणे हे दु:खदायी आहे.

पणजी - राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या मेघालयमध्ये झालेल्या बदलीवर विरोधी पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. सत्य व भाजप यांची सांगड होऊच शकत नाही व त्यामुळेच राज्यपालांच्या बदलीचा आदेश निघाला, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.कामत म्हणतात की, राज्यपाल मलिक हे सत्याचे पालक होते. त्यांनी नेहमीच गोमंतकीयांच्या भावना व अस्मितेचा आदर करत म्हादई, अर्थव्यवस्था व खर्च कपात, कोविड हाताळणी या विषयांवर गोमंतकीयांचे हित जपले. गोवा व गोमंतकीयांना त्यांच्या मार्गदर्शनाची जेव्हा अत्यंत गरज होती नेमकी त्याचवेळी त्यांची बदली होणे हे दु:खदायी आहे. मलिक यांनी नेहमीच गोव्याच्या भल्यासाठी निर्णय घेतले. सामान्य माणसांचा आदर करणे, पर्यावरण व निसर्गाची राखण करणे अशी त्यांची नेहमीच भावना होती. राज्याच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेबद्दल त्यांना चिंता होती व ते खर्चकपात करा व वायफळ खर्च बंद करा, असा सल्ला सरकारला नेहमी देत होते.गोमंतकीयांच्या ह्रदयात त्यांनी स्थान निर्माण केले असून गोवा त्यांना नेहमीच अभिमानाने व आदराने पाहणार आहे. त्यांच्या बदलीच्या आदेशाने प्रत्येक गोमंतकीयाला धक्काच बसला असल्याचे कामत यांनी म्हटले आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांची संतप्त प्रतिक्रियाकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनीही राज्यपालांच्या बदलीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणतात की, डिफेक्टिव्ह सावंत सरकारची आणखी एक नामुष्की टाळण्यासाठी राज्यपालांची बदली करण्यात आली. मुख्यमंत्री सावंत, प्रधानमंत्री कार्यालय आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मिळून संगनमताने ही बदली केली आहे. भाजप आणि ड्रग माफिया यांचे संबंध काँग्रेसने सोमवारी उघड केल्यानंतर ही बदली झालेली आहे.गोवा फॉरवर्डकडूनही संतापगोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनीही राज्यपालांच्या बदलीवर कडक प्रतिक्रिया दिली आहे. सरदेसाई म्हणतात की, राज्यपाल मालिक हे गोव्यातील कोविड स्थितीवर नेहमीच सत्य बोलले. म्हादईच्या प्रश्नावर त्यांनी कडक भूमिका घेतली. सरकारची आर्थिक स्थिती बिकट असताना नवे राजभवन नको, यावर ते ठाम राहिले. मुख्यमंत्र्यांच्या असंस्कृतपणावरही बोट ठेवले. त्यामुळे त्यांची बदली होणार, हे अपेक्षित होते.दरम्यान, महाराष्ट्रात कोविड पॉझिटिव्हिटचे तसेच मृत्यूचे प्रमाण लक्षणीय असताना व तेथील परिस्थिती हाताळण्यास अपयश आले असताना महाराष्ट्राच्या राज्यपालांवर गोव्याची अतिरिक्त जबाबदारी कशी?,असा सवालही सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे.काय खटकले हे जनतेला कळायला हवे!- मगोप अध्यक्षांची प्रतिक्रियामहाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनीही राज्यपालांच्या बदलीवर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणतात की, राज्यपालांचा दृष्टीकोन गोव्याच्या हिताचा होता. सरकारने त्यांना सहकार्य करायला हवे होते. या सरकारला राज्यपालांचे काय खटकले हे जनतेला कळायला हवे. राज्यपाल गोव्याच्या जनतेचा विश्वास संपादन करून होते. सर्वांना ते सहकार्य करीत होते तसेच म्हणणे नम्रपणे ऐकून घेत होते. पाणी कुठे मूरते हे जनतेला जनतेला कळायला हवे.भाजपला 'रात्रीचा खेळ चाले'करणारे हवेत : शिवसेनेची टीकाशिवसेना राज्य प्रमुख जितेश कामत यांनीही राज्यपालांच्या बदलीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कामत म्हणतात की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना चांगल्या माणसांची ॲलर्जी आहे. मलिक यांनी राज्यपालपदावर लागलेला रबर स्टॅम्पचा कलंक पुसून टाकला होता, पण भाजपला 'रात्रीचा खेळ चाले' करणाऱ्यांची जास्त गरज आहे.

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकारBJPभाजपाcongressकाँग्रेस