शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

वीस वर्षे आमदार, वीस वर्षे पाण्याचाच प्रश्न सोडवतोय- आमदार फ्रान्सिस डिसोझा त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 20:31 IST

अजून मार्च किंवा एप्रिल-मे महिना आलेला नाही पण आतापासूनच राज्यात विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. डिचोलीत लोकांना घागर मोर्चा काढावा लागतो तर म्हापशात स्थानिक आमदार तथा मंत्री फ्रान्सिस डिसोझा हेही पाणी प्रश्नामुळे त्रस्त आहेत.

पणजी - अजून मार्च किंवा एप्रिल-मे महिना आलेला नाही पण आतापासूनच राज्यात विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. डिचोलीत लोकांना घागर मोर्चा काढावा लागतो तर म्हापशात स्थानिक आमदार तथा मंत्री फ्रान्सिस डिसोझा हेही पाणी प्रश्नामुळे त्रस्त आहेत. सरकार मात्र चोवीस तास पाणी पुरविण्याच्या घोषणा गेली पाच वर्षे करत आहे. मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी आपण गेली वीस वर्षे म्हापसा मतदारसंघाचे आमदार आहोत व वीस वर्षे म्हापशातील नळाच्या पाण्याचाच प्रश्न सोडविण्यासाठी काम करतोय पण अजुनही तो प्रश्न सुटत नाही, असे बुधवारी येथे लोकमतला सांगितले.

आरोग्याच्या कारणास्तव तीन महिने विश्रंती घेतल्यानंतर डिसोझा हे आता सरकारी कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ लागले आहेत. बुधवारी त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीतही भाग घेतला. डिसोझा म्हणाले, की नळाद्वारे लोकांना निदान पिण्याचे पाणी तरी व्यवस्थित मिळायला हवे. चोवीस तास पाणी देणो सोडा, सहा तास तरी पाणी मिळायला हवे. तीन तास तरी पाणी पुरवठा व्हायलाच हवा. म्हापशात पाण्याची समस्या तीव्र आहे. सोळा एमएलडी पाणी दिले तरी, ते म्हापशाला पुरणार नाही. या मतदारसंघात एकूण एकवीस हजार घरे आहेत.

नगर विकास मंत्री असलेले डिसोझा म्हणाले, की आपण वीस वर्षे पाण्याच्या समस्येला सामोरे जात आहोत. सातत्याने आपण तो प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतोय. मात्र अजुनही पिण्याच्या पाण्याची नीट व्यवस्था झालेली नाही. अधूनमधून समस्या सुरूच असते. म्हापशात व्यवसायिक उपक्रम वाढले आहेत. शहराचा विस्तार होत आहे. व्यापार, व्यवसायासाठीही पाणी लागतेय. शंभर फ्लॅट असलेल्या इमारती बांधल्या जातात तेव्हा ते बांधकाम करण्यासाठी देखील सगळे नळाचे पाणी वापरले जाते. बांधकाम करण्यासाठी पाणी साठवून ठेवले जाते.

डिसोझा म्हणाले, की तिळारी धरणाचे तरी थोडे पाणी येतेय म्हणून बरे झाले. वास्तविक ते पाणी शेतीसाठी वापरावे असे ठरले होते पण शेतीऐवजी पिण्यासाठीच ते वापरले जात आहे. कारण पिण्यासाठीच वापरणो ते गरजेचे बनले आहे. नळ कोरडे बनले व पाणीच घरात आले नाही तर लोक हैराण होतात.

टॅग्स :goaगोवाWaterपाणी