शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

गोव्यात भंडारी समाजाचे आता तीन मंत्री!; २५ टक्के प्रमाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 10:54 PM

गोव्यात मिलिंद नाईक यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भंडारी समाजाच्या एकूण मंत्र्यांची संख्या आता तीन झाली आहे. दक्षिण गोव्यात आगामी लोकसभा निवडणुकीत भंडारी समाजाच्या मतांवर डोळा ठेवून या समाजाला आणखी एक मंत्रिपद दिले गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

पणजी : गोव्यात मिलिंद नाईक यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भंडारी समाजाच्या एकूण मंत्र्यांची संख्या आता तीन झाली आहे. दक्षिण गोव्यात आगामी लोकसभा निवडणुकीत भंडारी समाजाच्या मतांवर डोळा ठेवून या समाजाला आणखी एक मंत्रिपद दिले गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. १२ सदस्यीय मंत्रिमंडळात आता भंडारी मंत्र्यांचे प्रमाण २५ टक्के झाले आहे. 

राज्यात भंडारी समाजाची लोकसंख्या २७ टक्के आहे. तेवढे आरक्षणही या समाजाला मिळत आहे. मंत्रिमंडळात जलस्रोतमंत्री विनोद पालयेंकर आणि गृहनिर्माणमंत्री जयेश साळगांवकर हे दोघे भंडारी समाजाचे मंत्री होते. त्यात आता मिलिंद यांची भर पडली आहे. समाजातर्फे या गोष्टीचे स्वागत करण्यात आले. 

गोमंतक भंडारी समाजाचे महासचिव उपेंद्र गांवकर यांनी मिलिंद यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल स्वागत केले आहे. ते म्हणाले की, ‘मडकईकर यांच्याकडील समाज कल्याण खाते मिलिंद यांना मिळाल्याने ते समाजाला अत्यंत उपयुक्त ठरेल. समाजाची अनेक कामे रेंगाळत पडली आहेत. पर्वरी येथे भंडारी समाजासाठी जागा दिली जावी, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी रेंगाळत पडली आहे. सरकारने २७ टक्के राखीवता दिली असली तरी अंमलबजावणीच्या बाबतीत टाळाटाळ केली जाते. उपजिल्हाधिका-यांकडून जातीचे दाखले देण्याबाबत दिरंगाई केली जाते. या सर्व गोष्टी आम्ही आमच्या समाजाच्या मंत्र्यांकडे मांडणार आहोत.’

राज्यात भंडारी समाजाची संख्या मोठी आहे. समाजाच्या दोन गटांमध्ये अलीकडेच समेट होऊन दोन्ही गट एकत्र आल्याने आता दुरावाही राहिलेला नाही. समाजाला मंत्रिमंडळात पुरेसे स्थान मिळायला हवे, अशी समाजाची नेहमीच मागणी राहिलेली आहे. 

टॅग्स :goaगोवा