लोकमत न्यूज नेटवर्क, वाळपई : प्रजा हीच राजा असून आम्ही सेवक आहोत. जनतेच्या जीवनात चांगला बदल घडवून आणणे हे भाजप सरकारचे ध्येय आहे. मी कायम लोकांसोबत राहीन. सत्तरी व उसगावच्या जनतेची साथ देणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे, असे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे म्हणाले.
काल, मंगळवारी सत्तरी तालुक्यातील पाटवळ खोतोडे. उड्डीवाडा -उसगाव, तसेच गुळेली येथे कार्यक्रम झाले. केंद्र सरकारने अकरा वर्षांत देशात ज्या चांगल्या गोष्टी केल्या, त्याची माहिती मंत्री राणे यांनी यावेळी दिली. सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन व्हायला हवे हा मोदी सरकारचा विचार आहे. तो विचार अंमलात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच विचारधारा आम्ही पुढे नेत आहोत. लोकांना रोजगार संधी मिळेल. सत्तरी व उसगावमधील जनतेला व एकूणच युवा वर्गालाही रोजगार संधी प्राप्त होईल, असेही मंत्री विश्वजीत राणे म्हणाले.
गुळेली येथील जनतेसोबत मी कायम राहीन. जनतेचे सेवक बनून आम्ही काम करत आहोत. केंद्रात भाजपचे सरकार आहे व गोव्यातही भाजपचेच सरकार कायम राहिल. विरोधकांच्या अपप्रचाराकडे कुणी लक्ष देऊ नये. विरोधक विकास कामांना विरोध करतात. ते कधी सत्तेवर येऊ शकत नाहीत असे मंत्री राणे म्हणाले. सत्तरीचा विकास जोरात सुरू असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचेही त्यासाठी चांगले सहकार्य लाभत आहे, असेही मंत्री विश्वजीत राणे म्हणाले.
Web Summary : Minister Vishwajit Rane affirmed his commitment to serving the people, emphasizing the BJP government's goal of improving lives. He highlighted central government initiatives and pledged continued development in Sattari and Usgaon, dismissing opposition criticism and praising the Chief Minister's support.
Web Summary : मंत्री विश्वजीत राणे ने जनता की सेवा के प्रति प्रतिबद्धता जताई। उन्होंने भाजपा सरकार के जीवन सुधार के लक्ष्य को रेखांकित किया। केंद्रीय सरकार की पहलों पर प्रकाश डाला और सत्तरी व उसगांव में विकास का वादा किया, विपक्ष की आलोचना को खारिज किया और मुख्यमंत्री के समर्थन की सराहना की।