शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

पुढील तीन दिवस मुसळधार; राज्यात सोमवारपर्यंत ऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 14:28 IST

राज्यात गेला आठवडाभर पाऊस पडत असल्याने ठिकठिकाणी पूर आलेला आहे. अनेक लोकांच्या घरात पाणी शिरल्याने लाेकांची  मातीची घरे कोसळली.

पणजी: राज्यात पुढील तीन दिवस  हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असून तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन दिवस मुसळधार पडणार असल्याने मच्छिमाऱ्यांनी खोल सम्रुदात न जाण्याचा इशाराही हवामाने खात्याने दिला आहे.  गेले आठ दिवस राज्यात मुसळधार सुरुच असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात १ जून ते आतापर्यंत ६८.३३ पावसाची नोंद झाले आहे.

मुसळधार पावसाने ठिकठिकणी पूर

राज्यात गेला आठवडाभर पाऊस पडत असल्याने ठिकठिकाणी पूर आलेला आहे. अनेक लोकांच्या घरात पाणी शिरल्याने लाेकांची  मातीची घरे कोसळली. घरांवर झाडे उन्मळून पडून माेठ्या प्रमाणात लाेकांचे नुकसान झालेले आहे. वित्त हानी प्रमाणे जीवित हानी झाली आहे. गेल्या आठवड्या भरात राज्यात मुसळधार पावसाने ५ जणांचा बळी घेतला आहे. अनेक मुक़्या जनावरांचाही बळी या पावसात गेलेला आहे. तसेच पडझडीमुळे कराेडाे  रुपयांची  या पुराच्या पावसाने नुकसान झाली आहे. 

धरणे भरली नद्यांची पातळी वाढली

राज्यात गेले आठ दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसाने राज्यातील सर्व धरणे भरली आहे. साळावली धरण भरले तसेच अंजुणे  धरण ९० टक्के भरले असून या धरणातून  कधीही पाणी  साेडले जाऊ शकते. तसेच इतर लहान धरणेही भरली आहेत. धरणाप्रमाणे राज्यातील सर्व नद्या तसेच उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पावसाने नदी  किनारी असलेल्या शेती बागायतींना मोठा फटका बसला आहे.

आतापर्यंत  ६८.३३ इंच पाऊस

राज्यात १ जून ते १३ जूलै पर्यंत ६८.३३ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर वाळपई केंद्रात ८१.५४ इंच सर्वाधिक जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे साखळी, सांगे, केपे, काणकोण, मडगाव या केंद्रावरही  मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे.

टॅग्स :goaगोवाRainपाऊस