शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

सुलेमानी संकट; गोव्यातील पोलीस यंत्रणा अन् राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2024 12:06 IST

यावरून एकूणच पोलिस खात्याची व तेथील सर्व वरिष्ठांची विचार करण्याची क्षमताही कळून येते.

गोवा राज्यातील पोलिस यंत्रणा कशी आहे, हे कुणी वेगळे सांगायला नको. केवळ पोलिस शिपाई, हवालदार, उपनिरीक्षक यांच्या स्तरावरील पोलिसांविरुद्ध कारवाई होत असते. काही अत्यंत वरिष्ठ अधिकारी मात्र जिवाचा गोवा करत असतात. हे केवळ आताच नाही, तर पूर्वीपासून घडत आलेले आहे. मुख्य सचिवांकडे गृह खात्याचे सचिवपद असते, पण या राज्यातील एक माजी मुख्य सचिव टीसीपीचा सचिव म्हणूनही काम करताना स्वतःच संशयास्पद जमीन व्यवहार करतो. पूर्वी काही आयपीएस अधिकारी गोव्यात वादग्रस्त ठरलेले आहेत. जमीन हडपप्रकरणी सुलेमान खान नावाच्या मास्टरमाइंडला पकडल्यानंतर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी केवळ एका आयआरबी पोलिसाची नियुक्ती केली जाते. क्राइम ब्रांचच्या कोठडीत केवळ एक आयआरबी पोलिस त्या अट्टल गुन्हेगारावर लक्ष ठेवतो. यावरून एकूणच पोलिस खात्याची व तेथील सर्व वरिष्ठांची विचार करण्याची क्षमताही कळून येते.

केवळ विरोधकांना अद्दल घडविण्यासाठीच पोलिस यंत्रणेचा वापर होऊ लागला, तर मग पोलिस व्यवस्था सडूनच जाते. ती व्यवस्था मग वेगळे काही करत नाही. नोकरीकांडप्रकरणी आमदार गणेश गावकर यांना व एकूणच राजकीय व्यवस्थेला पोलिसांनी अगोदरच क्लीन चीट दिली होती. अर्थात आता विषय तो नाही. आता संकट सुलेमानचे आहे. सुलेमान ज्या कोठडीत होता, त्या कोठडीची चावी एका साध्या आयआरबी पोलिसाकडे. तो हवी तेव्हा कोठडी उघडतो, बंद करतो. सुलेमान अगदी थाटात पोलिसाच्या दुचाकीवर बसून हुबळीला पोहोचतो. रात्रीच्यावेळी मध्ये त्यांना कुणी अडवत नाही, कुणी चौकशी करत नाही. तपास नाक्यावर त्याला कुणी थांबवतही नाही. रात्री पोलिसांचा पहारा सुरू असतो, असे लोक ऐकून होते, पण पोलिस पहारा खरे म्हणजे फक्त दिवसा असतो, पर्यटकांची वाहने थांबवण्यासाठी. गोव्याबाहेरून येणारे परप्रांतीय ट्रक थांबविणे एवढेच पोलिसांचे काम झाले आहे.

समजा रात्रीच्यावेळी सुलेमानच्या मुक्ततेसाठी अचानक गुन्हेगारांच्या टोळीने हल्ला केला असता, तर एकटा अमित नाईक हा एकमेव पोलिस (आता बडतर्फ झालेला) त्या टोळीचा मुकाबला कसा करणार होता? सुलेमानवर अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. तो साधासुधा कैदी नाही, हे पोलिस खात्यातील वरिष्ठांना ठाऊक होते. त्याच्या कोठडीबाहेर कडक पहारा हवा होता. शिवाय एखादा पोलिस अधिकारीही तिथे उपस्थित असणे गरजेचे होते. अमित नाईक सुलेमानला व्यवस्थित अगदी शांतपणे बाहेर काढतो. दुचाकीवर बसवून मस्तपैकी त्याला सोडून येतो. हाच सुलेमान मग दुसऱ्या दिवशी कर्नाटकमध्ये राहून व्हिडीओ काढून गोव्यात पाठवतो आणि पोलिस यंत्रणेच्या चिंधड्या उडवतो. तो भाजपच्या एका आमदाराचेही नाव घेतो. जोशुआंच्या उपस्थितीत आपल्याला पोलिसांनी मारहाण केली, असे तो सांगतो. पोलिस आपल्याला जिवंतच मारू शकतात, अशी भीती आपल्याला होती, असा दावा हा सुलेमान करतो. अर्थात अट्टल गुन्हेगार असलेल्या सुलेमानवर पूर्ण विश्वास कुणीच ठेवणार नाही. ठेवूही नये, मात्र त्याने नेमके जोशुआ यांचेच नाव का घेतले?

विरोधी पक्षांनी क्राइम ब्रांचच्या कोठडी जवळचे व परिसराचे दोन दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज रिलीज करण्याची मागणी केली आहे. सरकारला जर सत्य शोधायचे असेल, तर सरकारने ते फुटेज मागून घ्यावे, वाटल्यास जाहीर करू नये. विरोधकांनाही देऊ नये, पण गृहमंत्र्यांनी ते पाहून खरोखर जोशुआ किंवा अन्य कुणी राजकारणी तिथे आले होते काय, त्यावेळी सुलेमानला कोठडीतून चौकशीसाठी बाहेर काढले होते काय, हे जाणून घेण्याची गरज आहे. सुनील कवठणकरांकडे सुलेमानचा व्हिडीओ कसा पोहचला याची चौकशी करतानाच पोलिसांना सुलेमानच्या दाव्याकडे पूर्ण कानाडोळा करूनही चालणार नाही. कुख्यात गुन्हेगार झाला, तरी खटला उभा राहील तेव्हा न्यायालयदेखील सुलेमानचे दावे ऐकून घेणार आहे. ती एक प्रक्रिया असते. शेवटी हे सुलेमानी संकट गोव्यावर घोंगावत आहे आणि या संकटाला विविध बाजू आहेत. गोव्याचे जमीन हडप प्रकरण साधेसुधे नाही, हे बार्देशमधील लोकांना अधिक चांगले ठाऊक आहे. लोकांचा विश्वास सुलेमानवर नाही. मात्र, सुलेमान आरामात गोव्यातून पळाल्यापासून लोकांचा विश्वास पोलिस यंत्रणेनेही गमावला आहे.  

टॅग्स :goaगोवा