शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

पुतळाप्रश्नी काँग्रेसचा विधानसभेत ठराव, सरकारची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 9:10 PM

विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 19 रोजी सुरू होत आहे. काँग्रेसच्या सर्व सोळाही आमदारांनी मिळून येत्या अधिवेशनात स्वर्गीय जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ाविषयी ठराव मांडण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला

पणजी : विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 19 रोजी सुरू होत आहे. काँग्रेसच्या सर्व सोळाही आमदारांनी मिळून येत्या अधिवेशनात स्वर्गीय जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ाविषयी ठराव मांडण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभा प्रकल्पासमोर व्हायला हवा अशी काँग्रेसची भूमिका असून तशी मागणी करणारा ठराव अधिवेशनात मांडला जाईल असे काँग्रेसने जाहीर केले. सरकारमध्ये या विषयावर दोन गट असल्याने अधिवेशनात पुतळाप्रश्नी सरकारची कसोटी लागेल हे स्पष्ट झाले.

शुक्रवारी पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पात काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. त्यानंतर विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, नीळकंठ हळर्णकर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. काँग्रेसच्या सोळाही आमदारांनी मिळून खासगी ठराव अधिवेशनात मांडवा व सरकारला पुतळा उभा करण्यास भाग पाडावे, असे काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत ठरल्याचे कवळेकर यांनी सांगितले. जनमत कौलामध्ये सिक्वेरा यांचे मोठे योगदान आहे, असे ते म्हणाले.

गोवा फॉरवर्ड पक्षाने यापूर्वी विधानसभेसमोर सिक्वेरा यांचा पुतळा व्हायलाच हवा अशी भूमिका घेतली आहे. भाजपने मात्र कुणाचाच पुतळा नको, भाऊसाहेब बांदोडकर यांचा आहे तेवढा पुरे, अशी भूमिका घेतली आहे. कुणीही विधानसभेत पुतळ्य़ासाठी ठराव मांडल्यास आपण पाठींबा देईन, असे गोवा फॉरवर्डचे नेते मंत्री विजय सरदेसाई यांनी यापूर्वी जाहीर केले आहे. यामुळे या विषयावरून विधानसभेत सरकारमधील फुट पहायला मिळेल काय असा प्रश्न राजकीय क्षेत्रत आता चर्चेत येणार आहे.

टॅक्सी व्यवसायिकांच्या स्पीड गवर्नरचा विषयही काँग्रेसच्या बैठकीमध्ये चर्चेस आला. गोव्यात नोंदणी झालेल्या टॅक्सींना स्पीड गवर्नरपासून मोकळीक द्यायला हवी. सध्या रस्त्यांवरून धावणा:या टॅक्सींना स्पीड गवर्नर नको, त्यासाठी केंद्र सरकारने मोटर वाहन कायद्यात दुरुस्ती करावी अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे करावी, असाही ठराव काँग्रेस पक्षाने घेतला असल्याचे शांताराम नाईक यांनी स्पष्ट केले. फेरीबोटीवर असलेल्या खलाशांना सीडीएसचे नूतनीकरण करण्यासाठी दहावी शिक्षित असल्याचे प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे हे खलाशी बोटीवर आहेत पण अशा प्रकारच्या प्रमाणपत्रची सक्ती कधीच करण्यात आली नव्हती. आता आम्ही दहावी शिकणार तरी कधी असा प्रश्न खलाशांनी विचारला आहे. आमची त्यांना सहानुभूती आहे व त्यामुळे काँग्रेस पक्ष पत्र लिहून दहावी शिक्षणाची अट मागे घ्यावी अशी विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना करील, असे काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले.