शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
2
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
3
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
4
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
5
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
6
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
7
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
8
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
9
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
10
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
11
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
12
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
13
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
14
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
15
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
16
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
17
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
18
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
19
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
20
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

राज्य पोलीस तक्रार निवारण प्राधिकरणावर ११ महिने अध्यक्ष नाही; काँग्रेसकडून संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 1:23 PM

राज्य पोलीस तक्रार निवारण प्राधिकरणावर गेले ११ महिने अध्यक्ष नसल्याने पोलिसांकडून होणाऱ्या अन्यायाबाबत दाद मागणे लोकांना कठीण बनले आहे.

ठळक मुद्देराज्य पोलीस तक्रार निवारण प्राधिकरणावर गेले ११ महिने अध्यक्ष नसल्याने पोलिसांकडून होणाऱ्या अन्यायाबाबत दाद मागणे लोकांना कठीण बनले आहे.विरोधकांवर खोटे गुन्हे घालण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात आहे आणि याविरुद्ध दाद मागण्यासाठी कोणतीही सोय नसल्याने सत्ताधारी राजकारण्यांचे फावले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रोहित ब्रास डिसा यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पत्र लिहून राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावर लवकरात लवकर अध्यक्ष नेमावा, अशी मागणी केली आहे.

पणजी - राज्य पोलीस तक्रार निवारण प्राधिकरणावर गेले ११ महिने अध्यक्ष नसल्याने पोलिसांकडून होणाऱ्या अन्यायाबाबत दाद मागणे लोकांना कठीण बनले आहे.

प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना असे म्हटले आहे, की सरकार पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून राजकीय विरोधकांना संपवू पाहत आहेत. विरोधकांवर खोटे गुन्हे घालण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात आहे आणि याविरुद्ध दाद मागण्यासाठी कोणतीही सोय नसल्याने सत्ताधारी राजकारण्यांचे फावले आहे. निवृत्त न्यायमूर्ती आर. एम. एस. खांडेपारकर यांनी ११ महिन्यांपूर्वी अध्यक्षपद सोडल्यानंतर हे पद रिकामीच आहे.

ते म्हणाले की, केवळ पर्वरी आणि फातोर्डा येथीलच नव्हे, तर पणजी तसेच अन्य ठिकाणी पोलिसांचा वापर राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी केला जातो. काँग्रेस भवनवर पणजीत मोर्चा आणून हल्ला चढविणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही. पोलीस कारवाईसाठी टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. राज्य पोलीस तक्रार निवारण प्राधिकरणाकडे अनेक अर्ज पडून आहेत. या लोकांना न्याय कधी मिळणार असा सवाल चोडणकर यांनी केला.

काँग्रेसचे प्रवक्ते रोहित ब्रास डिसा यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पत्र लिहून राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावर लवकरात लवकर अध्यक्ष नेमावा, अशी मागणी केली आहे. काही मंत्री पोलिसांचा वापर करून राजकीय विरोधकांचा छळ करीत आहेत. पर्वरी येथे खुद्द भाजपा पदाधिकाऱ्यावर हल्ला झाला आणि याची तक्रार करण्यासाठी गेलेल्या भाजपा कार्यकर्त्यांना एका मंत्र्याने जेरीस आणले. खुद्ध सरकारमध्येच ही स्थिती आहे. दक्षिण गोव्यातील एका मंत्र्याने नुवे येथे ख्रिसमस पार्टी पोलिसांना पाठवून बंद पाडली. या सर्व प्रकारांविरुद्ध दाद मागण्यासाठी प्राधिकरणावर अध्यक्षच नसल्याने लोकांची अडचण झाली आहे.

दरम्यान, राज्य मानवी हक्क आयोगालाही वाली नसल्याने तेथेही हक्कांसाठी धाव घेणाऱ्या लोकांची परवड झाली आहे. मूलभूत हक्कांसाठी लढण्याचा मार्गही राहिलेला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसgoaगोवाPoliceपोलिस