शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

शिक्षकी पेशा सांभाळताना सामाजिक चळवळींचाही वसा; श्रीमती साबिना मार्टिन्स यांचं प्रेरणादायी कार्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 13:27 IST

महिलांचे प्रश्न असोत की विकासाची दिशा ठरविणारा प्रादेशिक आराखड्याचा विषय असो, चळवळ्या व्यक्तिमत्त्व असलेल्या श्रीमती मार्टिन्स यांचा नेहमीच पुढाकार असतो. 

पणजी : गेली तब्बल ३१ वर्षे शिक्षकी पेशा सांभाळताना श्रीमती साबिना मार्टिन्स अनेकदा आक्रमक होऊन सरकारविरुद्धही संघर्षाची भूमिका घेत असतात. गोव्याची पेटती मशाल म्हणून त्यांना ओळखले जाते. अशा प्रकारे सामाजिक जाणीवेने झपाटून एखादीच महिला पुढे येते. गोव्यात महिलांचे प्रश्न असोत की विकासाची दिशा ठरविणारा प्रादेशिक आराखड्याचा विषय असो, चळवळ्या व्यक्तिमत्त्व असलेल्या श्रीमती मार्टिन्स यांचा नेहमीच पुढाकार असतो. तत्परता आणि कणखरपणा, हाती घेतलेल्या कार्यावरील निष्ठा आणि त्यासाठी लागणारी कष्टवृत्ती असे सर्व गुण श्रीमती मार्टिन्स यांच्या अंगी आहेत. ‘लोकमत’च्या या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. चळवळींमध्ये कशा काय आलात या प्रश्नावर साबिना म्हणाल्या की,‘१९८0 साली त्यावेळच्या प्रोग्रेसिव्ह स्टुडंटस युनियन (पीएसयु) या विद्यार्थी संघटनेतून विविध प्रश्नांवरील आंदोलनात हिरीरीने भाग घेतला. कॅपिटेशन फी, विद्यार्थ्यांना बसगाड्यांवर अर्ध्या तिकिटाची मागणी, विद्यापीठ फीवाढ या प्रश्नावर त्यावेळी रस्त्यावर उतरलो. गोव्याच्या वेगवेगळ्या भागात पथनाट्यांमध्येही सहभाग घेतला त्यानंतर संघर्ष नाट्य मंच तसेच सिटिझन्स फॉर सिव्हिल लिबर्टिज अ‍ॅण्ड डेमोक्रेटिक राइटस या संघटनेतही काम केले. ‘बायलांचो साद’ ही संघटना कधी स्थापन केली, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, महिलांवरील अत्याचाराविरुध्द लढा देण्यासाठी १९८६ साली या संघटनेची स्थापना केली. गेल्या १२ आॅक्टोबर रोजी या संघटनेला ३२  वर्षे पूर्ण होत आहेत. गोव्याच्या विकासाची दिशा ठरविणाºया २0२१ च्या प्रादेशिक आराखडा आंदोलनातही त्यांचा मोठा सहभाग आहे. या एकमेव कारणासाठी स्थापन झालेल्या गोवा बचाव अभियानच्या त्या निमंत्रक आहेत. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की,‘१९८७ साली शिक्षकीपेशा सुरु केला. हायरसेकंडरी आणि सेकंडरी स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केले. रसायनशास्राच्या शिक्षिका म्हणून सध्या कार्यरत असून पीएचडीही घेतली आहे. १९९६ साली शारदा मंदिर हायस्कूलमध्ये रुजू झाले. म्हापशातील सेंट झेवियर्स हायरसेकंडरीत दोन वर्षे विद्यादान, वास्कोतही सेंट जोझेफ विद्यालयात शिकविले. नोकरी, व्यवसाय सांभाळून तुम्ही चळवळींना कसा काय वेळ देऊ शकता असे त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, ‘दुपारपर्यंत आपण शाळेत असते त्यामुळे अगदी तातडीचे आणि महत्त्वाचे काही असले तरच आपण त्या कामासाठी बाहरे पडते पण सहसा शाळेकडे दुर्लक्ष करीत नाही. मुलांना शिकविण्याच्या बाबतीत कोणताही परिणाम होणार नाही याबाबत नेहमीच कटाक्ष असतो. अनेकदा खास करुन महिलांवरील अत्याचारांबाबत तातडीने दखल घ्यावी लागते अशावेळी गत्यंतर नसते.’गोवा बचाव अभियानतर्फे प्रादेशिक आराखड्याच्या विषय त्यांनी उचलून धरला. राज्याच्या विकासाची दिशा ठरविणारा हा आराखडा समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊनच अंमलात आणावा, अशी त्यांची मागणी आहे. विकासकामे व्हावीत, पण पर्यावरण सांभाळूनच असे त्यांचे म्हणणे आहे.‘बायलांचो साद’ या संघटनेचे वैशिष्ट्य म्हणजे या संघटनेला अध्यक्ष नाही किंवा सचिवही नाही. सरकारचे कोणतेही आर्थिक पाठबळ नाही. कार्यकर्त्यांच्या देणग्यांवरच ही संघटना चालते तसेच या संघटनेची नोंदणीसुध्दा नाही. महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत साबिना या फारच संवेदनशील आहेत.  

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकार