शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

धरण ओव्हर फ्लो अन् पर्यटकांची पावले वळली साळावलीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2024 09:14 IST

पावसाळी पर्यटनाला आला बहर

लोकमत न्यूज नेटवर्क, सांगे : राज्यात रविवारपासून जोरदार पाऊस झाल्याने पर्यटकांना आकर्षित करणारे साळावली धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. त्यामुळे तेथील नैसर्गिक सौंदर्य अधिक फुलले आहे. राज्यात सध्या पर्यटकांसह स्थानिकही पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटनस्थळांना भेटी देत आहेत.

साळावली धरण 'ओव्हर फ्लो' झाल्याने तेथील नजराणा पाहण्यासाठी पर्यटकांची पावले आता साळावलीच्या दिशेने वळू लागली आहे. राज्यात सुरू असणाऱ्या पावसामुळे तेरा दिवस आधीच हे धरण भरले होते. त्यात रविवार (दि. ७ जुलै) दिवसभर मुसळधार पाऊस झाल्याने संध्याकाळी सात वाजून सात मिनिटांनी हे धरण ओव्हर फ्लो झाले. आता हा नजराणा पाहण्यासाठी पर्यटक हळूहळू धरणाकाठी येऊ लागणार आहेत. गेल्या वर्षी २० जुलै २०२३ रोजी धरण ओव्हर फ्लो झाले होते. त्या तुलनेत यंदा तेरा दिवस लवकर धरण ओव्हर फ्लो झाले.

पावसाळी पर्यटनासाठी साळावली धरण प्रसिद्ध आहे. ४२ मीटर उंचीचे पाणी धरणात भरल्यानंतर गोलाकार अशा भिंतीवरून पाण्याचा विसर्ग होताना त्यातून उडणारे पाण्याचे कारंजे अंगावर झेलण्यास पर्यटक धरणावर गर्दी करीत असतात. त्यामुळे हे धरण कधी ओव्हर फ्लो होते, याची पर्यटकांना प्रतीक्षा असते. सुरक्षेच्या दृष्टीने धरणावर वाहने घेऊन जाता येत नसली तरी मोठ्या प्रमाणात धरणाच्या दोन्ही बाजूने पर्यटक आपली वाहने पार्क करून नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी गर्दी करतात.

पर्यटकांसाठी सरकारने सुविधा उभारण्याची मागणी

दक्षिण गोव्यातील पावसाळी पर्यटनापैकी साळावली धरण मुख्य केंद्र असले तरी तेथे आवश्यक सुविधा नाहीत. पाजिमाळ सांगे येथील तीन रस्त्यावर साळावली धरण आणि बॉटनिकाल गार्डनमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी अद्याप स्वागत कमानी उभारली नाही. पाजिमाळ जंक्शन ते साळवलीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा विद्युत दिवे नाहीत. खाण्या-पिण्याची सुविधा उपलब्ध नाहीत.

वाहनाची सुविधा देणे आवश्यक 

धरणाचा आनंद लुटण्यासाठी अबालवृद्ध येत असतात. ज्येष्ठ नागरिकांना वाहनाविना चालत जाणे शक्य होत नसल्याने जलसंपदा खात्याने किमान दोन इलेक्ट्रिक रिक्षा किंवा अन्य वाहनांची सोय करणे आवश्यक आहे. त्यातून सरकारला अधिक महसूल मिळेल व पर्यटकांचीही चांगली सोय होईल.

नोव्हेंबरपर्यंत असते ओव्हर फ्लो

धरणाच्या निमित्ताने बॉटनिकाल गार्डनमध्ये पर्यटकांना फेरफटका मारता येतो. जुलै महिन्यात सुरू होणारा साळवलीचा ओव्हर पत्लो साधारणतः नोव्हेंबरपर्यंत सुरूच असतो. त्याशिवाय कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरूच असतो.

 

टॅग्स :goaगोवाDamधरणtourismपर्यटन