शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

धरण ओव्हर फ्लो अन् पर्यटकांची पावले वळली साळावलीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2024 09:14 IST

पावसाळी पर्यटनाला आला बहर

लोकमत न्यूज नेटवर्क, सांगे : राज्यात रविवारपासून जोरदार पाऊस झाल्याने पर्यटकांना आकर्षित करणारे साळावली धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. त्यामुळे तेथील नैसर्गिक सौंदर्य अधिक फुलले आहे. राज्यात सध्या पर्यटकांसह स्थानिकही पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटनस्थळांना भेटी देत आहेत.

साळावली धरण 'ओव्हर फ्लो' झाल्याने तेथील नजराणा पाहण्यासाठी पर्यटकांची पावले आता साळावलीच्या दिशेने वळू लागली आहे. राज्यात सुरू असणाऱ्या पावसामुळे तेरा दिवस आधीच हे धरण भरले होते. त्यात रविवार (दि. ७ जुलै) दिवसभर मुसळधार पाऊस झाल्याने संध्याकाळी सात वाजून सात मिनिटांनी हे धरण ओव्हर फ्लो झाले. आता हा नजराणा पाहण्यासाठी पर्यटक हळूहळू धरणाकाठी येऊ लागणार आहेत. गेल्या वर्षी २० जुलै २०२३ रोजी धरण ओव्हर फ्लो झाले होते. त्या तुलनेत यंदा तेरा दिवस लवकर धरण ओव्हर फ्लो झाले.

पावसाळी पर्यटनासाठी साळावली धरण प्रसिद्ध आहे. ४२ मीटर उंचीचे पाणी धरणात भरल्यानंतर गोलाकार अशा भिंतीवरून पाण्याचा विसर्ग होताना त्यातून उडणारे पाण्याचे कारंजे अंगावर झेलण्यास पर्यटक धरणावर गर्दी करीत असतात. त्यामुळे हे धरण कधी ओव्हर फ्लो होते, याची पर्यटकांना प्रतीक्षा असते. सुरक्षेच्या दृष्टीने धरणावर वाहने घेऊन जाता येत नसली तरी मोठ्या प्रमाणात धरणाच्या दोन्ही बाजूने पर्यटक आपली वाहने पार्क करून नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी गर्दी करतात.

पर्यटकांसाठी सरकारने सुविधा उभारण्याची मागणी

दक्षिण गोव्यातील पावसाळी पर्यटनापैकी साळावली धरण मुख्य केंद्र असले तरी तेथे आवश्यक सुविधा नाहीत. पाजिमाळ सांगे येथील तीन रस्त्यावर साळावली धरण आणि बॉटनिकाल गार्डनमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी अद्याप स्वागत कमानी उभारली नाही. पाजिमाळ जंक्शन ते साळवलीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा विद्युत दिवे नाहीत. खाण्या-पिण्याची सुविधा उपलब्ध नाहीत.

वाहनाची सुविधा देणे आवश्यक 

धरणाचा आनंद लुटण्यासाठी अबालवृद्ध येत असतात. ज्येष्ठ नागरिकांना वाहनाविना चालत जाणे शक्य होत नसल्याने जलसंपदा खात्याने किमान दोन इलेक्ट्रिक रिक्षा किंवा अन्य वाहनांची सोय करणे आवश्यक आहे. त्यातून सरकारला अधिक महसूल मिळेल व पर्यटकांचीही चांगली सोय होईल.

नोव्हेंबरपर्यंत असते ओव्हर फ्लो

धरणाच्या निमित्ताने बॉटनिकाल गार्डनमध्ये पर्यटकांना फेरफटका मारता येतो. जुलै महिन्यात सुरू होणारा साळवलीचा ओव्हर पत्लो साधारणतः नोव्हेंबरपर्यंत सुरूच असतो. त्याशिवाय कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरूच असतो.

 

टॅग्स :goaगोवाDamधरणtourismपर्यटन