शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

धरण ओव्हर फ्लो अन् पर्यटकांची पावले वळली साळावलीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2024 09:14 IST

पावसाळी पर्यटनाला आला बहर

लोकमत न्यूज नेटवर्क, सांगे : राज्यात रविवारपासून जोरदार पाऊस झाल्याने पर्यटकांना आकर्षित करणारे साळावली धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. त्यामुळे तेथील नैसर्गिक सौंदर्य अधिक फुलले आहे. राज्यात सध्या पर्यटकांसह स्थानिकही पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटनस्थळांना भेटी देत आहेत.

साळावली धरण 'ओव्हर फ्लो' झाल्याने तेथील नजराणा पाहण्यासाठी पर्यटकांची पावले आता साळावलीच्या दिशेने वळू लागली आहे. राज्यात सुरू असणाऱ्या पावसामुळे तेरा दिवस आधीच हे धरण भरले होते. त्यात रविवार (दि. ७ जुलै) दिवसभर मुसळधार पाऊस झाल्याने संध्याकाळी सात वाजून सात मिनिटांनी हे धरण ओव्हर फ्लो झाले. आता हा नजराणा पाहण्यासाठी पर्यटक हळूहळू धरणाकाठी येऊ लागणार आहेत. गेल्या वर्षी २० जुलै २०२३ रोजी धरण ओव्हर फ्लो झाले होते. त्या तुलनेत यंदा तेरा दिवस लवकर धरण ओव्हर फ्लो झाले.

पावसाळी पर्यटनासाठी साळावली धरण प्रसिद्ध आहे. ४२ मीटर उंचीचे पाणी धरणात भरल्यानंतर गोलाकार अशा भिंतीवरून पाण्याचा विसर्ग होताना त्यातून उडणारे पाण्याचे कारंजे अंगावर झेलण्यास पर्यटक धरणावर गर्दी करीत असतात. त्यामुळे हे धरण कधी ओव्हर फ्लो होते, याची पर्यटकांना प्रतीक्षा असते. सुरक्षेच्या दृष्टीने धरणावर वाहने घेऊन जाता येत नसली तरी मोठ्या प्रमाणात धरणाच्या दोन्ही बाजूने पर्यटक आपली वाहने पार्क करून नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी गर्दी करतात.

पर्यटकांसाठी सरकारने सुविधा उभारण्याची मागणी

दक्षिण गोव्यातील पावसाळी पर्यटनापैकी साळावली धरण मुख्य केंद्र असले तरी तेथे आवश्यक सुविधा नाहीत. पाजिमाळ सांगे येथील तीन रस्त्यावर साळावली धरण आणि बॉटनिकाल गार्डनमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी अद्याप स्वागत कमानी उभारली नाही. पाजिमाळ जंक्शन ते साळवलीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा विद्युत दिवे नाहीत. खाण्या-पिण्याची सुविधा उपलब्ध नाहीत.

वाहनाची सुविधा देणे आवश्यक 

धरणाचा आनंद लुटण्यासाठी अबालवृद्ध येत असतात. ज्येष्ठ नागरिकांना वाहनाविना चालत जाणे शक्य होत नसल्याने जलसंपदा खात्याने किमान दोन इलेक्ट्रिक रिक्षा किंवा अन्य वाहनांची सोय करणे आवश्यक आहे. त्यातून सरकारला अधिक महसूल मिळेल व पर्यटकांचीही चांगली सोय होईल.

नोव्हेंबरपर्यंत असते ओव्हर फ्लो

धरणाच्या निमित्ताने बॉटनिकाल गार्डनमध्ये पर्यटकांना फेरफटका मारता येतो. जुलै महिन्यात सुरू होणारा साळवलीचा ओव्हर पत्लो साधारणतः नोव्हेंबरपर्यंत सुरूच असतो. त्याशिवाय कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरूच असतो.

 

टॅग्स :goaगोवाDamधरणtourismपर्यटन