शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

टायगर जिंदा है...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2025 08:23 IST

मनोज परब यांनी १ जानेवारी रोजी 'टायगर जिंदा है' हेच जणू दाखवून दिले.

राजकीय पक्षांनी लहरी असून चालत नाही. सातत्याने सक्रिय राहावे लागते. निवडणुका संपल्या की आपले काम झाले, असा विचार पूर्वी काँग्रेस पक्ष करत होता. गोव्यातील काँग्रेस पक्ष अलीकडे निवडणुका नसल्या तरी आंदोलने करतो. गोव्यात क्रांतीची भाषा करून अनेक मंत्री, आमदारांना पूर्वी घाम फोडलेला आरजी पक्ष मात्र गेले काही महिने निस्तेज बनून राहिला. सर्व चळवळींपासून आरजीने स्वतःला दूर ठेवले. विशेषतः या पक्षाचे प्रमुख नेते मनोज परब यांनी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर गोमंतकीयांना गुडबायच केले होते. त्यांनी गोव्यातील कोणत्याच विषयावर प्रतिक्रिया दिली नव्हती किंवा ते कुठेच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नव्हते. रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्ष निष्क्रिय बनलाय, असा लोकांचा समज झाला होता. अनेकांना त्यामुळे आपला अपेक्षाभंग झाला, असेदेखील वाटले होते. 'एका कापडान बायल म्हातारी जायना' अशी कोंकणीत म्हण आहे. आरजी पक्षाने लोकसभा निवडणुकीतील निकाल अनुभवला आणि आता सारे काही संपले अशा पद्धतीनेच हा पक्ष कोमात गेला, असे गोंयकारांना वाटत होते. लंडनमधील गोंयकारांची फेसबुकी बडबडदेखील त्यामुळे बंद झाली होती. मात्र, मनोज परब यांनी १ जानेवारी रोजी 'टायगर जिंदा है' हेच जणू दाखवून दिले.

'लेट्स रिव्होल्युशनाइज २०२५' असा मेसेज परब यांनी अनेकांना पाठवला. शिवाय फेसबुकवरही तसा संदेश टाकून नव्याने आरजीच्या युवा कार्यकर्त्यांचा उत्साह जागवण्याचा प्रयत्न केला. अनेक नेटिझन्सनी मनोज परब यांच्या संदेशाचे स्वागत केले. आम्ही याचसाठी थांबलो होतो, आता नव्याने काम करूया, असे आरजीच्या पाठीराख्यांनी म्हटले आहे. अर्थात यापुढील कोणतीच कृती योजना परब यांनी अजून जाहीर केलेली नाही.

लोकसभा निवडणुकीत आरजीकडे पैसा नव्हता. शिवाय २०२२ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी आरजीवाल्यांमध्ये जो उत्साह होता, तो नंतर कायम राहिला नव्हता. आरजीला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसणार, असे लोक म्हणत होते. त्या पक्षात फूट पाडण्याचे, कार्यकर्ते फोडण्याचे प्रयत्नही अन्य राजकीय पक्षांनी केले होते. शिवाय आरजीमधील काही जणांची बदनामी करण्याचेही छुपे प्रयत्न झाले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच आरजी जणू भूमिगत झाला होता. मनोज परब अंडरग्राऊंड गेले आहेत, अशी चर्चाही रंगली होती. परब आरजीचे प्रमुखपद सोडतील, अशीही चर्चा होती. आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी मात्र गेले काही दिवस आपल्यापरीने आरजीचे अस्तित्व दाखवून देण्याचा थोडा प्रयत्न केला. बोरकर सांतआंद्रे मतदारसंघात सक्रिय आहेत. शिवाय ते स्वतः अन्य काही विरोधी राजकारण्यांप्रमाणे सेटिंगचे राजकारण करत नाहीत, असे म्हणण्यास वाव आहे. 

आरजी लोकसभा निवडणुकीवेळी इंडिया आघाडीसोबत राहिला नाही. आरजीने स्वतःची वेगळी वाट धरली आहे. आता यापुढेही तीच वाट कायम ठेवली जाते की नाही, हे पाहावे लागेल. मात्र, आरजी भाजपसाठी सॉफ्ट आहे किंवा ती भाजपची बी टीम आहे, असा प्रचार काँग्रेसवाल्यांनी वारंवार केला आहे. आरजीने लोकसभा निवडणुकीवेळी स्वतंत्र उमेदवार देऊनही दक्षिण गोव्यात काँग्रेसचा उमेदवार जिंकला. यामुळे दक्षिण गोव्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह आहे. 

दक्षिणेतील खिस्ती मतदार आपल्या बाजूने आहेत, असे आता काँग्रेसला वाटते. सेक्युलर मतांमध्ये फूट पडली तर त्याचा लाभ भाजपला मिळतो. ख्रिस्ती मतदारांना ती फूट नको आहे, असे सासष्टीतील अनेक काँग्रेस पदाधिकारी मानतात. अर्थात याबाबत अधिक चर्चा व विचारमंथन होण्याची गरज आहे. शेवटी लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणूक या दोन्हीची गणिते पूर्णपणे वेगळी असतात. 

२०२७ सालच्या विधानसभा निवडणुकीत आरजीला स्वतःचा प्रभाव दाखवायचा असेल तर अगोदर लहरी स्वभाव सोडून द्यावा लागेल. एक लढाई हरल्यानंतर सर्व काही संपले, अशी भावना आरजीवाल्यांनी ठेवली तर तो पक्ष वाढूच शकणार नाही. आरजीला सदस्य नोंदणी मोहीम राबवावी लागेल. शिवाय नवे कार्यकर्ते व नव्या नेत्यांना पक्षात आणावेच लागेल. केवळ गोंयकारपणाचे हितरक्षण करण्याच्या वल्गना व आंदोलने करून पक्ष वाढत नसतो. महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या मनसेलाही ते कळून आले आहेच.

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण