शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

टायगर जिंदा है...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2025 08:23 IST

मनोज परब यांनी १ जानेवारी रोजी 'टायगर जिंदा है' हेच जणू दाखवून दिले.

राजकीय पक्षांनी लहरी असून चालत नाही. सातत्याने सक्रिय राहावे लागते. निवडणुका संपल्या की आपले काम झाले, असा विचार पूर्वी काँग्रेस पक्ष करत होता. गोव्यातील काँग्रेस पक्ष अलीकडे निवडणुका नसल्या तरी आंदोलने करतो. गोव्यात क्रांतीची भाषा करून अनेक मंत्री, आमदारांना पूर्वी घाम फोडलेला आरजी पक्ष मात्र गेले काही महिने निस्तेज बनून राहिला. सर्व चळवळींपासून आरजीने स्वतःला दूर ठेवले. विशेषतः या पक्षाचे प्रमुख नेते मनोज परब यांनी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर गोमंतकीयांना गुडबायच केले होते. त्यांनी गोव्यातील कोणत्याच विषयावर प्रतिक्रिया दिली नव्हती किंवा ते कुठेच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नव्हते. रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्ष निष्क्रिय बनलाय, असा लोकांचा समज झाला होता. अनेकांना त्यामुळे आपला अपेक्षाभंग झाला, असेदेखील वाटले होते. 'एका कापडान बायल म्हातारी जायना' अशी कोंकणीत म्हण आहे. आरजी पक्षाने लोकसभा निवडणुकीतील निकाल अनुभवला आणि आता सारे काही संपले अशा पद्धतीनेच हा पक्ष कोमात गेला, असे गोंयकारांना वाटत होते. लंडनमधील गोंयकारांची फेसबुकी बडबडदेखील त्यामुळे बंद झाली होती. मात्र, मनोज परब यांनी १ जानेवारी रोजी 'टायगर जिंदा है' हेच जणू दाखवून दिले.

'लेट्स रिव्होल्युशनाइज २०२५' असा मेसेज परब यांनी अनेकांना पाठवला. शिवाय फेसबुकवरही तसा संदेश टाकून नव्याने आरजीच्या युवा कार्यकर्त्यांचा उत्साह जागवण्याचा प्रयत्न केला. अनेक नेटिझन्सनी मनोज परब यांच्या संदेशाचे स्वागत केले. आम्ही याचसाठी थांबलो होतो, आता नव्याने काम करूया, असे आरजीच्या पाठीराख्यांनी म्हटले आहे. अर्थात यापुढील कोणतीच कृती योजना परब यांनी अजून जाहीर केलेली नाही.

लोकसभा निवडणुकीत आरजीकडे पैसा नव्हता. शिवाय २०२२ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी आरजीवाल्यांमध्ये जो उत्साह होता, तो नंतर कायम राहिला नव्हता. आरजीला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसणार, असे लोक म्हणत होते. त्या पक्षात फूट पाडण्याचे, कार्यकर्ते फोडण्याचे प्रयत्नही अन्य राजकीय पक्षांनी केले होते. शिवाय आरजीमधील काही जणांची बदनामी करण्याचेही छुपे प्रयत्न झाले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच आरजी जणू भूमिगत झाला होता. मनोज परब अंडरग्राऊंड गेले आहेत, अशी चर्चाही रंगली होती. परब आरजीचे प्रमुखपद सोडतील, अशीही चर्चा होती. आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी मात्र गेले काही दिवस आपल्यापरीने आरजीचे अस्तित्व दाखवून देण्याचा थोडा प्रयत्न केला. बोरकर सांतआंद्रे मतदारसंघात सक्रिय आहेत. शिवाय ते स्वतः अन्य काही विरोधी राजकारण्यांप्रमाणे सेटिंगचे राजकारण करत नाहीत, असे म्हणण्यास वाव आहे. 

आरजी लोकसभा निवडणुकीवेळी इंडिया आघाडीसोबत राहिला नाही. आरजीने स्वतःची वेगळी वाट धरली आहे. आता यापुढेही तीच वाट कायम ठेवली जाते की नाही, हे पाहावे लागेल. मात्र, आरजी भाजपसाठी सॉफ्ट आहे किंवा ती भाजपची बी टीम आहे, असा प्रचार काँग्रेसवाल्यांनी वारंवार केला आहे. आरजीने लोकसभा निवडणुकीवेळी स्वतंत्र उमेदवार देऊनही दक्षिण गोव्यात काँग्रेसचा उमेदवार जिंकला. यामुळे दक्षिण गोव्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह आहे. 

दक्षिणेतील खिस्ती मतदार आपल्या बाजूने आहेत, असे आता काँग्रेसला वाटते. सेक्युलर मतांमध्ये फूट पडली तर त्याचा लाभ भाजपला मिळतो. ख्रिस्ती मतदारांना ती फूट नको आहे, असे सासष्टीतील अनेक काँग्रेस पदाधिकारी मानतात. अर्थात याबाबत अधिक चर्चा व विचारमंथन होण्याची गरज आहे. शेवटी लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणूक या दोन्हीची गणिते पूर्णपणे वेगळी असतात. 

२०२७ सालच्या विधानसभा निवडणुकीत आरजीला स्वतःचा प्रभाव दाखवायचा असेल तर अगोदर लहरी स्वभाव सोडून द्यावा लागेल. एक लढाई हरल्यानंतर सर्व काही संपले, अशी भावना आरजीवाल्यांनी ठेवली तर तो पक्ष वाढूच शकणार नाही. आरजीला सदस्य नोंदणी मोहीम राबवावी लागेल. शिवाय नवे कार्यकर्ते व नव्या नेत्यांना पक्षात आणावेच लागेल. केवळ गोंयकारपणाचे हितरक्षण करण्याच्या वल्गना व आंदोलने करून पक्ष वाढत नसतो. महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या मनसेलाही ते कळून आले आहेच.

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण