शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

टायगर जिंदा है...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2025 08:23 IST

मनोज परब यांनी १ जानेवारी रोजी 'टायगर जिंदा है' हेच जणू दाखवून दिले.

राजकीय पक्षांनी लहरी असून चालत नाही. सातत्याने सक्रिय राहावे लागते. निवडणुका संपल्या की आपले काम झाले, असा विचार पूर्वी काँग्रेस पक्ष करत होता. गोव्यातील काँग्रेस पक्ष अलीकडे निवडणुका नसल्या तरी आंदोलने करतो. गोव्यात क्रांतीची भाषा करून अनेक मंत्री, आमदारांना पूर्वी घाम फोडलेला आरजी पक्ष मात्र गेले काही महिने निस्तेज बनून राहिला. सर्व चळवळींपासून आरजीने स्वतःला दूर ठेवले. विशेषतः या पक्षाचे प्रमुख नेते मनोज परब यांनी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर गोमंतकीयांना गुडबायच केले होते. त्यांनी गोव्यातील कोणत्याच विषयावर प्रतिक्रिया दिली नव्हती किंवा ते कुठेच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नव्हते. रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्ष निष्क्रिय बनलाय, असा लोकांचा समज झाला होता. अनेकांना त्यामुळे आपला अपेक्षाभंग झाला, असेदेखील वाटले होते. 'एका कापडान बायल म्हातारी जायना' अशी कोंकणीत म्हण आहे. आरजी पक्षाने लोकसभा निवडणुकीतील निकाल अनुभवला आणि आता सारे काही संपले अशा पद्धतीनेच हा पक्ष कोमात गेला, असे गोंयकारांना वाटत होते. लंडनमधील गोंयकारांची फेसबुकी बडबडदेखील त्यामुळे बंद झाली होती. मात्र, मनोज परब यांनी १ जानेवारी रोजी 'टायगर जिंदा है' हेच जणू दाखवून दिले.

'लेट्स रिव्होल्युशनाइज २०२५' असा मेसेज परब यांनी अनेकांना पाठवला. शिवाय फेसबुकवरही तसा संदेश टाकून नव्याने आरजीच्या युवा कार्यकर्त्यांचा उत्साह जागवण्याचा प्रयत्न केला. अनेक नेटिझन्सनी मनोज परब यांच्या संदेशाचे स्वागत केले. आम्ही याचसाठी थांबलो होतो, आता नव्याने काम करूया, असे आरजीच्या पाठीराख्यांनी म्हटले आहे. अर्थात यापुढील कोणतीच कृती योजना परब यांनी अजून जाहीर केलेली नाही.

लोकसभा निवडणुकीत आरजीकडे पैसा नव्हता. शिवाय २०२२ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी आरजीवाल्यांमध्ये जो उत्साह होता, तो नंतर कायम राहिला नव्हता. आरजीला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसणार, असे लोक म्हणत होते. त्या पक्षात फूट पाडण्याचे, कार्यकर्ते फोडण्याचे प्रयत्नही अन्य राजकीय पक्षांनी केले होते. शिवाय आरजीमधील काही जणांची बदनामी करण्याचेही छुपे प्रयत्न झाले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच आरजी जणू भूमिगत झाला होता. मनोज परब अंडरग्राऊंड गेले आहेत, अशी चर्चाही रंगली होती. परब आरजीचे प्रमुखपद सोडतील, अशीही चर्चा होती. आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी मात्र गेले काही दिवस आपल्यापरीने आरजीचे अस्तित्व दाखवून देण्याचा थोडा प्रयत्न केला. बोरकर सांतआंद्रे मतदारसंघात सक्रिय आहेत. शिवाय ते स्वतः अन्य काही विरोधी राजकारण्यांप्रमाणे सेटिंगचे राजकारण करत नाहीत, असे म्हणण्यास वाव आहे. 

आरजी लोकसभा निवडणुकीवेळी इंडिया आघाडीसोबत राहिला नाही. आरजीने स्वतःची वेगळी वाट धरली आहे. आता यापुढेही तीच वाट कायम ठेवली जाते की नाही, हे पाहावे लागेल. मात्र, आरजी भाजपसाठी सॉफ्ट आहे किंवा ती भाजपची बी टीम आहे, असा प्रचार काँग्रेसवाल्यांनी वारंवार केला आहे. आरजीने लोकसभा निवडणुकीवेळी स्वतंत्र उमेदवार देऊनही दक्षिण गोव्यात काँग्रेसचा उमेदवार जिंकला. यामुळे दक्षिण गोव्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह आहे. 

दक्षिणेतील खिस्ती मतदार आपल्या बाजूने आहेत, असे आता काँग्रेसला वाटते. सेक्युलर मतांमध्ये फूट पडली तर त्याचा लाभ भाजपला मिळतो. ख्रिस्ती मतदारांना ती फूट नको आहे, असे सासष्टीतील अनेक काँग्रेस पदाधिकारी मानतात. अर्थात याबाबत अधिक चर्चा व विचारमंथन होण्याची गरज आहे. शेवटी लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणूक या दोन्हीची गणिते पूर्णपणे वेगळी असतात. 

२०२७ सालच्या विधानसभा निवडणुकीत आरजीला स्वतःचा प्रभाव दाखवायचा असेल तर अगोदर लहरी स्वभाव सोडून द्यावा लागेल. एक लढाई हरल्यानंतर सर्व काही संपले, अशी भावना आरजीवाल्यांनी ठेवली तर तो पक्ष वाढूच शकणार नाही. आरजीला सदस्य नोंदणी मोहीम राबवावी लागेल. शिवाय नवे कार्यकर्ते व नव्या नेत्यांना पक्षात आणावेच लागेल. केवळ गोंयकारपणाचे हितरक्षण करण्याच्या वल्गना व आंदोलने करून पक्ष वाढत नसतो. महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या मनसेलाही ते कळून आले आहेच.

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण